व्हीएस न्यूज - गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी यांनी रविवारी शनिवारवाड्यावर आयोजित परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच भीमा कोरेगाव येथे दोन गटांमध्ये वाद झाला. मेवानी आणि जेएनयू छात्र संघटनेचे उमर खालिद हे या घटनेला जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार अक्षय बिक्कड आणि आनंद धोंड यांनी केली आहे.
शनिवारवाड्यावर भीमा कोरेगावच्या संग्रामाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या एल्गार परिषदेत त्यांनी भडकावू भाषण दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, पुढील कार्यवाहीसाठी तो विश्रामबाग पोलिसांकडे पाठवला आहे, असे डेक्कनचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले; पण विश्रामबागचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी अशा स्वरूपाची तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही, असे स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज - पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी रास्ता रोको केला. चौकात भीमसैनिकांनी ठिय्या मांडला असून चौकातून सर्व मार्गानी येणारी वाहने अडवून निषेध नोंदविण्यात येत आहे. चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भीमा कोरेगाव मधील घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले असून विश्रांतवाडी परिसरातील मुख्य चौकात निषेध करण्यासाठी जमाव जमला आहे. व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी 1997 मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 2012 मध्ये कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती करून त्यांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्यास सुरूवात केली. मात्र फेब्रुवारी 2017 मध्ये चार सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक झाली. त्यानुसार 32 निवडणूक प्रभाग झाले आहेत. ही प्रभाग रचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये,तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
ही नवीन आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतीदिनापासून म्हणजे 9 ऑगस्ट 2017 पासून अस्तित्वात आली आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना प्रशासनाने कामकाजाच्या सोईसाठी 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग' आणि 'ह' अशी नावे दिली आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना नावे नसल्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडत आहे. त्यामुळे या कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे दिल्यास ते नागरिकांना सहज लक्षात ठेवता येईल. तसेच क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचाही गौरव होईल. त्यानुसार 'अ' क्षेत्रीय कार्यालयाला पन्हाळगड, 'ब' क्षेत्रीय कार्यालयाला पुरंदर, 'क' क्षेत्रीय कार्यालयाला सिंहगड, 'ड' क्षेत्रीय कार्यालयाला रायगड, 'इ' क्षेत्रीय कार्यालयाला शिवनेरी, 'फ'क्षेत्रीय कार्यालयाला देवगिरी, 'ग' क्षेत्रीय कार्यालयाला सिंधुदुर्ग आणि 'ह' क्षेत्रीय कार्यालयाला प्रतापगड हे नाव देण्यात यावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. दरम्यान, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रभाग कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेची आठ प्रशासकीय कार्यालये लवकरच गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.
व्हीएस न्यूज - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये, तसेच मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, असे प्रतिपादन अॅड. मंजुषा इधाटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धा परीक्षा केंद्रात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अॅड प्रा. आण्णासाहेब ठोसर, अॅड मंजुषा इधाटे, अलका जोशी, नागरिक व अभ्यासक विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी अॅड मंजुषा इधाटे म्हणाल्या, मानवी हक्काच्या रक्षणासाठी न्यायालयांचा उपयोग होतो. मानव अधिकार म्हणजे सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होय. सन्मानाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये कुटुंब निर्माण करण्याचा कुटुंबात राहण्याचा, जीवन समृद्ध करण्यासाठी व जीवनाचा विकास करण्यासाठी म्हणून शिक्षण घेण्याचा अधिकार यामध्ये येतो. शिक्षण घेतल्यावर आवडीचा व्यवसाय करण्यासाठी व त्यासाठी मुक्त संचार करण्याचा तसेच स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार म्हणजे मानव अधिकार होय, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी अॅड प्रा.आपासाहेब ठोसर म्हणाले, राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बहुतेक नागरिकांना या विषयाचे ज्ञान नसल्याने ते वंचित राहतात. कायदा म्हणजे सागर आहे. कशासाठी व कोणासाठी जगायचे याचे तत्वज्ञान मानव अधिकारामध्ये आहे. सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घटना आहे. मानव अधिकारांचे संरक्षण व्हावे असेही ते यावेळी म्हणाले. मानवी हक्क दिनानिमित्त अलका जोशी यांनीही माहिती दिली. मानवी मूल्यांना बाधा न पोहचता प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य हि घटनेने दिले आहे. आजच्या युवा पिढीने मानवी हक्क व कर्त्यव्याची जाणीव परिसरातील नागरिक व मित्र परिवारांना करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असेही यावेळी अलका जोशी यांनी सांगितले. यावेळी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचनही करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी यांनी केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002