व्हीएस न्यूज - जीवनात सकारत्मकतेची ताकद येण्यासाठी अध्यात्मिक योग, ध्यानधारणा गरजेची आहे. चांगले विचार आचरण, संवाद संस्कार यातूनच प्रेम आपुलकी वाढते. चांगले कर्म चांगली दिशा देऊ शकतात. डॉक्टर ताण तणाव, क्रोध, अहंकार, स्वार्थ दूर करूनच रुग्णांच्या वेदना दूर करू शकतात यासाठी मनशक्ती जागरूक ठेवण्याची गरज आहे त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा, असे मत बी के शिवानी दीदी यांनी व्यक्त केले. डॉ. डी. वाय पाटील मेडिकल महाविद्यालय व संशोधन केंद्रात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या बी के शिवानी दीदी यांनी 'आत्मविश्वास व सकारत्मकता' या विषयी व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ पी. एन राजदान तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्यानी उपस्थित होते....Read More
व्हीएस न्युज - पिडीत वंचित वर्गाचा विकास करण्यासाठी मला काम करायचे आहे. उत्कृष्ठ लोकनेता होणे हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होते. ते पुर्ण करण्यासाठी मी भविष्यात काम करील. लोकप्रतिनिधी घडविणारे त्यांचे व्यक्तीमत्वं होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणा-यांवर मी अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रहाटणी, पुणे येथे केले.
व्हीएस न्यूज - संकेतस्थळावर हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरात पाहून दोन उच्च शिक्षित तरूणांची 60 हजार रूपयांची फसवणूक सराईत गुन्हेगाराने केली. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी उघडकीस आली. दिपेश सोनी (रा. पिंपरी) असे फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर भोसरीसह चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी सोनी हा चतुःश्रृगी पोलीसांच्या कोठडीत आहे. याप्रकरणी नदिन गंवडी (वय-25, रा. कर्वेनगर) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. 6 ते 26 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडला. फौजदार आर. बी. सोडनवर यांनी माहिती दिली. फिर्यादी गंवडी हा बीई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत आहे. तो व त्याचा अभिजीत बाबासाहेब पाटील पार्टटाईम नोकरीच्या शोधात होते. लिंक इन या संकेतस्थळावर त्यांनी चिंचवड येथील रिव्हर व्हयु हॉटेलमध्ये नोकरी लावण्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही जाहिरात पाहून फिर्यादी व त्याच्या मित्राने आरोपी सोनीशी संपर्क साधला. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सोनीने दोघांकडून प्रत्येकी 30 हजार असे 60 हजार रूपये घेतले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - ज्ञानदीप इंग्लिश स्कुलचे वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन उत्साहात विविध उपक्रमांनी पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे, माजी अध्यक्ष राहुल चिताळकर, प्रशांत पाटील, परशु केकाण, पूजा ठवरे, यशस्वी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, अंकुश पांढरे, भागवत काटकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसह शालेय वैयक्तिक व सामाहिक स्पर्धा, खेळ, मनोरंजनात्मत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी पल्लवी जाधव, हेमांगी शिंदे, शीतल जगताप, पूजा ठवरे, हेमलता राऊत, रुपाली गजरमल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मारुती बोन्द्रे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी तर आभार अनिल नाटेकर यांनी मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - धार्मिक व सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची ताकद महिलांच्या सामूहिक नेतृत्वात असून त्यास प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी नुकतेच केले. श्री जगद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्वान महीलांचा व उत्कृष्ट महीला बचतगटांचा सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका सुलक्षणा धर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. लक्ष्मण रानवडे, ऍड. सुनिता रानवडे आदी मान्यवर उपस्थित होते. एच. ए. कॉलनीतील स्वरांजली महिला बचत गट, छाया सिनलकर, रंजना मुळिक, सुरेखा कामठे, संस्कृती महिला बचत गट वनमाला वाघमारे यांना जिजाऊ सावित्री उत्कृष्ठ कार्य पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात आले. तर सायुजता दोडके यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बहल पुढे म्हणाल्या, गेली एकवीस वर्षे महिलांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ऍड. रानवडे हे पुरस्कार देऊन करत असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या समाजरुपी कार्याची दखल राज्य शासनानेही नुकतीच घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुमारे एक हजार महिला उपस्थित होत्या. यावेळी सुलक्षणा धर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. लक्ष्मण रानवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजिता ऍड. सुनिता रानवडे यांनी आभार मानले. चॉंद शेख, देवेंद्र गावंडे, सुधीर कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले....Read More
व्हीएस न्यूज - ज्येष्ठ नागरिक हे या वयातही तरुणांना लाजवतील अशा उत्साहात सामाजिक कार्य करतात, ही बाब निश्चितच भूषणावह आहे. तरीदेखील महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी तरतूद करून मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबत जागरूकता दाखवून निधीचा योग्य विनियोग करावा, असे आवाहन माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनी येथे केले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, गोलांडे इस्टेट, सुदर्शननगर यांनी आयोजित केलेल्या वर्धापनदिन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोलांडे बोलत होते. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाला स्वतःची वास्तू मिळाली; तसेच त्याची अधिकृत शासकीय नोंदणी झाली याबद्दल गोलांडे यांनी समाधान व्यक्त केले. उद्योजक स्वानंद राजपाठक यांनी, "अध्यात्माबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाची शिदोरी तरुण पिढीला द्यावी. कारण त्या ज्ञानाचा उपयोग अनेक विधायक कामांसाठी होऊ शकतो" असे विचार मांडले. रवींद्र कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त करून स्वरचित कविता सादर केली. याप्रसंगी आशा कुलकर्णी, शालिनी कुलकर्णी आणि रवींद्र कुलकर्णी यांनी भक्तिरचना सादर केल्या. विजय राजपाठक, सच्चिदानंद दिवेकर, कविता कोल्हापुरे, दत्तात्रय पुजार यांनी संयोजनात सहकार्य केले. अशोक कपोले यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा चाफे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली....Read More
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने पाणी दरवाढ मोठ्या प्रमाणात करून फक्त सहा हजार लिटर पाणी मोफत देण्याचे शहरवासियांना अमिष दाखविले आहे. परंतू, मोफत पाणी फक्त पाच दिवसात संपणार असून सत्ताधारी भाजपाने त्याआडून मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी केला आहे. बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार जणांच्या कुटूंबाला यापुर्वी सरासरी महिन्याला 75 रूपये मासिक बिल येत होते. परंतू, सत्ताधारी भाजपाने पाण्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ प्रस्तावित केली आहे. दरवाढ केल्यानंतर जनतेमध्ये रोष निर्माण होऊ नये यासाठी सहा हजार लीटर पाणी मोफत देण्याचे आमिष दाखविले आहे. परंतू, हे सहा हजार लीटर पाणी अवघ्या चार ते पाच दिवसात संपणार आहे. त्यामुळे ही योजना फसवी असून पाणी दरवाढ मागे घेण्याची मागणी बकाल यांनी केली आहे. यापुर्वीही तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने पाण्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचे नियोजन केले. परंतू, जनतेने पाणी दरवाढ मागे घेण्यास भाग पाडले होते. त्याचप्रमाणे भाजपलाही दरवाढ मागे घेण्यास भाग पाडणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ...Read More
व्हीएस न्यूज - बाबुरावजी घोलप यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी घोलप महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मेळाव्यात भाग घेतला. या मेळाव्यास राहुल जवळकर आणि माजी नगरसेविका वैशाली जवळकर, राम जांभूलकर, महविद्यालय विकास समिती सदस्य अभिजित शिर्के, प्रसाद जाधव, अपर्णा भालेराव यांच्यासह माजी विद्यार्थी हजार होते. प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा प्रकाश पांगारे यांनी तर आभार प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विजय घारे व प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी योगदान दिले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. ढगे, डॉ.एल. के. निकम उपस्थित होते....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002