व्हीएस न्यूज - महात्मा गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला तर सर्वाधिक नुकसान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) झाल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेचे संघाशी संबंध असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले. मी आज देशातील नागरिकांना आणि माध्यमांना विचारू इच्छिते की, गांधीजींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?. आम्ही तुरूंगात गेलो, आमच्यावर बंदी लादण्यात आली आणि आजही आम्ही त्रास सहन करत आहोत. देशाला त्रास भोगावा लागला. संघ आणि जनसंघालाही यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, असे त्यांनी म्हटले.
महात्मा गांधींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करून नवीन राजकीय संघटना उभी केली पाहिजे, अशी घोषणा गांधीजींनी केली होती, असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरण यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा चौकशी करावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी न्यायमित्रही नियुक्त केला आहे. नेमके याचवेळी उमा भारती हे वक्तव्य केले आहे. गांधींची हत्या गोडसेनी जरी केली असली तरी त्याला भडकवण्याचे काम कोणी केले, असा सवाल उमा भारती यांनी यावेळी उपस्थित केला. नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनजवळ ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002