व्हिएस न्यूज -आज सकाळी एक प्रवासी राजस्थानमध्ये बस नदीत कोसळून झालेल्या अपघातमध्ये ३० प्रवाशी ठार झाले आहेत. सवाईमाधोपूर-लालसोट मार्गावर दुबी येथे हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार एक ३४ आसनांची प्रवासी बस सवाई माधोपूर येथून लालसोटकडे निघाली होती. ही बस त्यावेळी दुबी येथील बनास नदीच्या पुलावर आली असता, बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती बस पुलावरून ५० फुट खोल असलेल्या नदीत कोसळली. ही बस नदीमध्ये पाण्याची पातळी जास्त असल्याने पाण्यात बुडाली. या अपघातामध्ये ३० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
माधोपूर पोलिसांनी या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे. पोलीस मृतदेह बाहेर काढत असून आतापर्यंत जखमी अवस्थेतेतील एकही प्रवासी आढळला नाही. मृतांची अद्याप ओळख पटली नाही.