व्हिएस न्युज - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी माझ्यासाठी राजकारण नवे नाही. पण थोडा उशीरच झाला, माझा राजकीय प्रवेशच हा मोठा विजय असल्याचे सांगत आपल्या राजकीय प्रवेशावर आज शिक्कामोर्तब केले. पण येत्या ३१डिसेंबरला यासंबंधित अधिकृत घोषणा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र पक्ष काढणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले असून चाहत्यांना त्यासाठी ३१ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. रजनीकांत आजपासून पुढचे सहा दिवस चेन्नईत त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या भेटीसाठी राघवेंद्र कल्याणा मंडपममध्ये १८ जिल्ह्यांतून हजारो चाहते आले आहेत.
कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केल्यानंतर रजनीकांत यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. राजकारणात ते कधी येणार याचीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांसह तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातही होती. आज त्यांच्याही राजकारणातील प्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला. माझ्यासाठी राजकारण नवे नाही. पण थोडा उशीर झाला आहे. माझा प्रवेशच मोठा विजय आहे. यासंदर्भातील मी ३१ डिसेंबरला निर्णय जाहीर करेन, असे रजनीकांत म्हणाले. चाहत्यांशी काही दिवसांपूर्वी संवाद साधताना, रजनीकांत म्हणाले होते की, राजकारणात जर मी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सदैव दूर ठेवेन.