पाकिस्तानचे चार तुकडेच होतील… वाचा कोण म्हणाले असे…
मुंबई
2017-12-27
व्हीएस न्यूज – आता थेट पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारले पाहिजे, असे ज्येष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.
स्वामी यांनी पाकिस्तानचे चार तुकडे करावे अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. स्वामी यांनी अशी खळबळजनक प्रतिक्रिया कुलभूषण जाधव याची पत्नी आणि मातेला दिलेल्या अयोग्य वागणुकीमुळे दिली आहे. भारताने पाकिस्तानबरोबर युद्ध करण्यासाठी चांगलीच तयारी करावी असेही ते म्हणाले. पाकिस्तानने भारताच्या भावना दुखावल्या असून त्याला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे असेही स्वामी म्हणाले आहेत.