काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप
व्हिएस न्यूज – राजकीय फायद्यासाठी भाजप खोटे बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे, शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थान करत असल्याचा आरोप कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेस पक्षाला १३३ र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. अध्यक्ष म्हणून पक्षाच्या स्थापना सोहळ्याला राहुल यांनी पहिल्यांदाच संबोधित केलं. आपल्या देशाची पायाभरणी करणा-या घटनेलाच आज भाजपपासून धोका निर्माण झाला आहे. भाजपचे नेतेही त्यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. घटना बदलण्यासाठी गुपचूप कारस्थानं सुरू असून घटनेला वाचविण्याची आपल्यावरच जबाबदारी असल्याचंही राहुल यांनी सांगितलं. ह्यआज देशाशी धोकेबाजी केली जात आहे.
भाजप राजकीय फायद्यासाठी खोटं बोलत असून त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपण भलेही काही चांगलं केलं नसेल, भलेही आपण निवडणुकांमध्ये पराभूत झालो असू. पण आपण सत्याची कास सोडता कामा नये, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, राहुल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना ह्यजेटलाइ ( जेट असत्य) असं संबोधून त्यांची संभावना केली होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002