व्हिएसन्यूज - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले आहेत. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या बंदची हाक दिली आहे. काही वेळापूर्वीच होणाऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच या महाराष्ट्र बंदला राज्यातील सगळ्या संघटनांनी सहकार्य करावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सोमवारी झालेल्या घटनेनंतर आज राज्यभरात कार्यकर्त्यांनी बंद पुकारला असेल तर मागे घ्यावा, आंदोलन थांबवावे असेही आवाहन त्यांनी केले. सोमवारी उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात दुपारी दोन वाजेपर्यंत मिळालेली नव्हती असेही त्यांनी म्हटले आहे. शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडी यांनी हा हिंसाचार घडवून आणला असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.