व्हीएस न्यूज - राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेच (आरएसएस) भारतातील लोकांना संविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर सुरक्षित ठेवल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.टी.थॉमस यांनी व्यक्त केले आहे. धर्मनिरपेक्षतेचा विचार धर्मापासून दूर ठेवला जाऊ नये, असेही ते म्हणाले. केरळमधील कोट्टयम येथे आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरात ३१ डिसेंबर रोजी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. मला जर आणीबाणीपासून सुटका करण्याचे श्रेय कोणा एका संस्थेला द्यावयाचे म्हटले तर मी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देईन, असे सांगत आपल्या स्वंयसेवकांमध्ये राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी संघ शिस्तबद्धता शिकवते.
पुढे ते म्हणाले, आपल्यावर साप विषाचा उपयोग होणाऱ्या हल्ल्याविरोधात हत्यार म्हणून करतात. पण एखाद्यावर हल्ला करण्यासाठी मानवाची शक्ती तयार केलेली नाही. मी आरएसएसचे कौतुक शारीरिक शक्तिचा अर्थ हल्ल्यांपासून स्वत:ला वाचवणे असा आहे. असे सांगण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी करतो. एखाद्या हल्ल्यावेळी देश आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी आरएसएसचे शारीरिक प्रशिक्षण असते, असे मला वाटते.
मला कोणी जर विचारले की, भारतात लोक सुरक्षित आहेत का?, तर मी सांगेन की, देशात एक संविधान आहे, लोकशाही आहे, सैन्यदल आहे आणि चौथा संघ आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही आणीबाणीविरोधात आरएसएसच्या मजबूत आणि संघटीत कार्याची चाहूल लागली होती. तेव्हाच त्यांना समजले होते की, आणीबाणीचे प्रकरण जास्त दिवस चालू शकणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002