स्वत:च्या फायद्यासाठी मोदी सरकारकडून ट्रीपल तलाकचा वापर
नवी दिल्ली
2018-01-04
व्हीएस न्यूज – केंद्रातील मोदी स्वत:च्या फायद्यासाठी मुस्लिम महिला (विवाह संरक्षण हक्क) विधेयकाचा वापर करत असल्याचा आरोप जमियत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना मेहमूद मदनी यांनी केला आहे. तसेच मुख्य विषयापासून देशातील नागरिकांचे लक्ष्य वळविण्यासाठी सरकारने विधेयकाचा घाट घातल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभेत मुस्लिम महिला (विवाह संरक्षण हक्क) विधेयक मांडल्यानंतर प्रचंड गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मदनी यांनी त्या पार्श्वभूमीवर माध्यमांसमोर हा आरोप केला आहे. ट्रीपल तलाकच्या घटनांचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ स्वत:चे हित साधण्याकरता सरकार विधेयकाचा वापर करत असल्यामुळे त्याचा मुस्लिम महिलांना विशेष फायदा होणार नाही. तसेच याकरिता केवळ कायदेशीर पातळीवर केलेल्या बदलाने प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज असल्याचे मौलाना मेहमूद मदनी यांनी म्हटले आहे. ट्रीपल तलाक कायदा संमत करणे योग्य निर्णय आहे. पण, संमत करण्यामागचा सरकारचा उद्देश योग्य नसल्याचा आरोप मदनी यांनी यावेळी बोलताना केला.