व्हीएस न्यूज - भीमा कोरेगाव येथे घडलेली घटना निंदनीय आहे. त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. परंतू त्या घटनेनंतर बुधवारी 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. परंतू शहरातील सर्व समाजातील तरुण वर्गांमध्ये हिंसक जातीयवादास हातभार लागेल अशी विचारसरणी वाढत आहे हे चिंताजनक आहे. असे मत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी व्यक्त केले.
शनिवारी (दि. 6 जानेवारी 2018) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची ‘सामाजिक सलोखा बैठक’ घेण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, मानव कांबळे, संयोजक आनंद कुदळे, रामदास मोरे, प्रताप गुरव, सोलमन पास्टर, चंद्रकांत डोके, प्रदिप पवार, संतोष जोगदंड, सिध्दीकी शेख, प्रताप सोनवणे, सुरेश गायकवाड, गिरीष वाघमारे, गुलाब पानपाटील, संदीप कुदळे, महेश भागवत, दिलीप गायकवाड, आकाश कांबळे, अब्दुल शेख आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भापकर म्हणाले की, शहरातील सामाजिक सलोखा वाढीस लागण्यासाठी शहरातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध पक्षांच्या पदाधिकारी व मुख्य कार्यकर्त्यांनी आप आपल्या परिसरात जाऊन तरुणवर्गाचे सामाजिक एकोपा वाढीस लागावा यासाठी प्रबोधन करावे, असे भापकर म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002