जामखेड येथील राष्ट्रवादीच्या नऊ नगरसेवकांवर टांगती तलवार.
जामखेड
2018-01-09
व्हीएस न्यूज - जामखेड नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टी कडून निवडून आलेले दहा पैकी नऊ नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला मतदान केले.त्यामुळे नऊ नगरसेवकांवर राष्ट्रवादीने शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीच्या नऊ नगरसेवकांवर टांगती तलवार उभी राहिली आहे.
जामखेड नगरपरिषदेत एकुण २१ नगरसेवक आहेत या मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस कडुन दहा, भाजप कडून तीन, म न से एक शिवसेना चार व अपक्ष तीन असे बलाबल होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्कालिन नेते माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपचे तीन व एक अपक्ष नगरसेवक वगळून सतरा नगरसेवकांनी मोट बांधून अपक्ष निवडून आलेल्या प्रीती विकास राळेभात तर उपनगराध्यक्ष पदी मेहरूनिस्सा कुरेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. यामुळे जामखेड नगरपरिषदेत माजी मंत्री सुरेश धस यांना एकहाती सत्ता मिळवण्यास यश आले. मात्र दिड वर्षातचत आंतर्गत वादा मुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या विद्या राजेश वाव्हळ यांच्यासह नगरसेवक गुलशन हीरामन अंधारे,गणेश उत्तमराव आजबे,, खान फरिदा असिफ, निखिल मुकूंद घायतडक, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात,संदीप सुरेश गायकवाड, सुमन अशोक शेळके, या नऊ नगरसेवकांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली.
पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नगरसेवकांना बरोबर घेऊन सतरा नगरसेवक एकञ आणले. नगरअध्यक्षा प्रती राळेभात व उपनगराध्यक्षा कुरेशी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठराव दाखल होण्यापूर्वीच नगराध्यक्षा प्रीती राळेभात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपच्या नगरअध्यक्षा पदासाठी नऊ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना दांडी मारली होती. जाहीरपणे भाजप चिन्ह आसलेले डीजीटल बोर्ड छापून लावण्यात आले.या प्रकरणाचा अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पाठवला होता. या मुळे वरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडुन आलेल्या या नऊ नगरसेवकांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.नऊ नगरसेवकांन विरोधात स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयात तक्रारी केल्या होत्या.त्यानुसार वरीष्ठ पातळीवरुन कमीटीने या कारवाई करण्यासाठी पक्षविरोधी कारवाईचा अहवाल मागवला आहे. पक्ष विरोधात भुमिका घेतल्याने नऊ नगरसेवकांन बाबत पुरावे गोळा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनकडे दाखल करण्यात येणार आहे.त्यानंतर लगेच त्यांच्यावर कारवाई होणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी चे प्रभारी तालुका अध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी दिली आहे.