व्हीएस न्यूज - भीमा कोरेगांव घटना का घडली, सरकारचा कुठेच धाक राहिला नाही. महिला वर्ग सुरक्षित नाही. भीमा कोरेगांव प्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवला परंतू पंतप्रधानांनी अजून एक शब्द काढलेला नाही. एरवी मन की बात करणारे पंतप्रधान भिमा कोरेगावच्या प्रश्नावर गप्प का असा सवाल माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. ते रायगड जिल्ह्यातील माणगाव नगरपंचायत हद्दीतील विवीध विकास कामांच्या शुभांरभ सोहळ्यानंतर आयोजीत जाहिर सभेत बोलत होते.
केंद्रात व राज्यात भाजप व शिवसेना सत्तेवर आहे. या सरकारने जनतेला दिलेली आश्वसने पाळलेली दिसत नाहीत. गुजरातने त्यांना नाकारले. समविचारी पक्षांनी एकत्रित निवडणूका लढवल्या असत्या तर गुजरातचे चित्र आज वेगळे असते. आताच्या सरकारला मुंबई गोवा महामार्गाचे काम साडेतीन वर्षांत करता आलेले नाही. त्यावर कोणीच काय बोलत नाही. साडेतीन वर्षांत सरकार आपली टिमकी वाजवत आहे. पण त्यांची विकासकामे काहीच दिसत नाही. शिवसेना भाजप सरकारने कोकणावर अन्याय केला आहे. शेतकरयांच्या आत्महत्तयेचे प्रमाण वाढले आहे. विजेच्या संदर्भातील प्रश्न बिकट झाले आहे. लोकांना भूलभुलया करण्याचे काम हे सरकार करीत आहे.
उध्दव ठाकरे भाजप वर टिका करतात पण सत्तेतून बाहेर पडण्याची हिम्मत करत ना्ही. मेक इन इंडियाच्या नावाखाली अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी गुजरातला पळविले आहेत. या काळात समाजाचा कोणताही घटक समाधानी नाही. शेतकरी समाधानी नाही. त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. उस उत्पादक कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी १०० दिवसात महागाई कमी होणार असे सांगितले होते. सत्ता येऊन १००० दिवस झाले अजून महागाई कमी झालेली नाही.उलट जास्त प्रमाणात महागाई झालेली आहे. गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने महिला वर्ग नाराज आहे. आमच्या काळातील कित्येक योजना आहेत त्या योजनांची फक्त नांवे या सरकारने बदलली आहेत. शेतकरयांचा पेकाट या सरकारने मोडला आहे. या मुख्यमंत्र्यांना शाश्वत शेती काय समजणार असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. कमला मिल प्रकरणात वरिष्ठ अधिकारयांवर राजकीय दबाव आहे.त्यांनी तो वेळीच स्पष्ट करणे गरजेच आहे असेही मतही त्यांनी यावेळी मांडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अनील तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, माणगावचे नगराध्यक्ष आनंद यादव उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002