व्हीएस न्यूज – जगभरात जलद गतीने प्रगती करणा-या अर्थव्यवस्थांचा विचार करता भारत २०१८ मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत सँक्टम वेल्थ मॅनेजमेंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यावर्षी भारतीय भांडवली बाजार जगात पाचवा सर्वात मोठा भांडवली बाजार होणार आहे. ज्यावेळी जगभरातील देश आर्थिक संकटांशी सामना करत असतील त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था मात्र जलद गतीने पुढे झेपावत असेल असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालानुसार, ज्यावेळी विकसित देशांचा विकासदर २ ते ३ टक्क्य़ांशी रेंगाळत असेल त्यावेळी भारताचा विकासदर हा ७.५ टक्क्य़ांवर पोहोचलेला असणार आहे. या व्यतिरिक्त इतर विकसनशील देशांच्या तुलनेतही भारत पुढेच असणार आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी चीनच्या विकासदराची गती धीमी झालेली असेल. भारतीय भांडवली बाजारात इक्विटीच्या माध्यमातून मिळणारा परतावा देखील ६ ते ८ टक्क्य़ांपर्यंत असेल असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. खरे तर हे निश्चित उत्पन्नाबाबतच शक्य असते. तथापि, जर भारतात महागाई वाढलेली असली, किंवा किंमती वाढलेल्या असल्या, तर मात्र बाजाराची गती त्या प्रमाणात असणार नाही, असेही पुढे म्हटलेले आहे. या वर्षी शेअर बाजारात जलद गती पाहायला मिळू शकते. निफ्टीने जलदगतीने उसळी मारलेली आहे. सध्या निफ्टी १०,४९० ते १०,५८० इतका आहे. या वर्षीच्या शेवटापर्यंत तो ११,२०० पासून ते ११,५०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002