देशातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना एकाही व्यक्तीला सोडणार नाही – मोदी
नवी दिल्ली
2018-01-29
व्हीएस न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच दिल्लीत झालेल्या एनसीसीच्या कार्यक्रमात जो कोणीही भ्रष्टाचार करेल त्याला तुरुंगात टाकणार ही काळ्या दगडावरची रेष असून ती व्यक्ती मग कोणीही असो, त्या व्यक्तीला सोडणार नाही. सध्याच्या घडीला देशात भ्रष्टाचार करणारे तीन माजी मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. त्यामुळे यापुढे एकाही भ्रष्टाचारी माणसाला माफ करणार नसल्याचे म्हटले आहे.
भ्रष्टाचार आणि काळा पैशाचे उच्चाटन होईपर्यंत या विरोधात सुरु झालेली लढाई थांबणार नाही. तरुणाईने देखील या लढाईत सहभाग घेतला पाहिजे असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एक काळ असा होता की भ्रष्टाचाराची केवळ चर्चा होत असे आणि लोक म्हणत असत की यात तर मोठ्या लोकांची नावे आहेत त्यांना काहीही होणार नाही. पण तीन माजी मुख्यमंत्री भ्रष्टाचार केल्यामुळेच सध्या तुरुंगात असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.