व्हीएस न्यूज – पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने हाजी अली ट्रस्टला धार्मिक स्थळे आणि तेथील परिसर स्वच्छ आणि सुंदर असायलाच हवा, असे म्हणत दणका दिला आहे. समुद्र हाजी अली दर्ग्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषित होत असल्याचे म्हणत हरित लवादाने हाजी अली ट्रस्टला नोटीस बजावली असून परिसर प्रदूषणरहित आणि स्वच्छ, सुंदर कसा राहील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
रोज हाजी अली दर्ग्याला मुस्लीम बांधवांसह हजारो पर्यटक देखील भेट देतात. पण दर्गा ट्रस्टकडून हाजी अली दर्ग्याला भेट देणाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक स्वच्छतेकडे मोठे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. दर्ग्यातून आठवड्याला २० हजार लिटर मलमूत्र समुद्रात सोडले जात असल्यामुळे समुद्राचे पाणी प्रदूषित होत चालले आहे.
समुद्रात दर्ग्यात चढवण्यात येणाऱ्या चादरीसह पाण्याच्या बाटल्याही फेकण्यात येत असल्यामुळे प्रदूषणात आणखी भर पडत असल्याचेही समोर आले आहे. अॅड. सरोदे यांनी हीच बाब लक्षात घेत या अस्वच्छतेसह समुद्राच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी हरित लवादात याचिका दाखल केली होती. लवादाने या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारची चांगलीच कान उघडणी करत यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र ५ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच हाजी अली ट्रस्टला नोटीस बजावली आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी ५ मार्चला होणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002