व्हीएस न्यूज - अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. लवकरच राज्यसरकार जिल्ह्याच्या विभाजनाची लोकांची मागणी पुर्ण करणार असल्याचा दावाही राम शिंदे यांनी केला. दोन भागात क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन होणार आहे. जिल्ह्याचे विभाजन नगर दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात व्हावे ही अनेक वर्षापासून लोकांची मागणी असून एवढ्या मोठ्या जिल्ह्यात सुविधा देण्यास सध्या प्रशासनालाही अडचणी येत असल्यामुळे लवकरच जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याचा दावा राम शिंदे यांनी शिर्डीत असताना केला आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस हेरगीरी करत असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले असून पोलिसांचे विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत जाणे म्हणजे त्यांचा कामाचा भाग असल्याचे म्हणत गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पोलिसांचे समर्थन केले आहे.
शिवसेना साडे तीन वर्षांपूर्वी विरोधी पक्षात होती ते सत्तेत कधी आले हे त्यांना कळलेच नाही. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असून जे येतील त्यांना सोबत घेऊ, जे येणार नाही त्यांना सोडून भाजपा २०१९ला पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002