व्हीएस न्यूज - नागालँड राज्य विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला आहे. यात भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांचाही समावेश असणार आहे. राज्यात येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून या निर्णयामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
राज्यातील आदिवासी संघटनांनी प्रथम नागा समस्येवर तोडगा काढावा आणि मगच निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली होती. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांची बैठक सोमवारी झाली. त्यात आदिवासी संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर प्रसिद्ध जालेल्या निवेदनावर 11 पक्षांच्या स्वाक्षऱ्या असून नागा पीपल्स फ्रंट, नॅशनल पीपुल्स पार्टी आणि आम आदमी पक्ष हेही यांच्या प्रतिनिधींच्याही त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. कोणत्याही उमेदवाराने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरू नये, असे आवाहन या पक्षांनी केले आहे. तसेच आपण कोणत्याही उमेदवाराला तिकिट देणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
भाजपचे नागालँड प्रभारी राम माधव यांनी 22 जानेवारी रोजी दीमापुर येथे सांगितले होते, की राज्यातील नवे सरकार नागा समस्येवर तोडगा काढेल आणि त्यासाठी निवडणुका होणे ही पहिली घटनात्मक गरज आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002