व्हीएस न्यूज - टपाल खात्यात काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने नवीन गणवेश आणला असून पोस्टातील कर्मचारी आता खादीच्या वर्दीत दिसणार आहेत. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी पोस्टमनच्या नवीन गणवेशाचे उद्घाटन केले. ‘पंतप्रधानांनी खादीला प्रोत्साहन देले आहे. आम्ही सुमारे 25 दिवसांपूर्वी ही प्रक्रिया सुरू केला आणि खाकी रंगात खादीच्या कपड्यात समोर येण्याचा निर्णय घेतला. खादी आणि टपाल खात्यासाठी मोठ्या प्रमाणात संभावना आहेत,’ असे ते म्हणाले. या गणवेशाचे डिझाईन राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने (एनआयएफटी) तयार केले आहे. नव्या गणवेशात पोस्टमनच्या डोक्यावर गांधीटोपीऐवजी पी-कॅप असेल. पोस्टमन आणि पोस्टवुमन यांच्यासाठी गणवेशाचा रंग एकच राहील आणि त्यावर ‘इंडिया पोस्ट’ चा लोगो असेल. खांद्यावर लाल पट्टी लावलेली असेल.
टपाल खात्यात गेल्या काही वर्षांपासून तळाच्या कर्मचाऱ्यांबाबत गणवेशाबाबत गोंधळाची परिस्थिती होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कर्मचारी वेगवेगळ्या रंगाचा गणवेश घालत होते. या पावलामुळे सरकारला 31 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला एका वर्षात एक जोडी गणवेश व स्वेटर मिळणार आहेत. त्याचा पुरवठा खादी ग्रामोद्योग मंडळ करणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002