यापूर्वीच ३ लाखांहून अधिक बनावट कंपन्यांचे परवाने रद्द
कंपन्यांनाही काढावे लागणार ‘आधार कार्ड’
व्हीएस न्यूज - देशातील बहुतांश नागरिकांकडे स्वत:चा एक क्रमांक आहे म्हणजेच आधार कार्ड आहे. पण आता सरकार लवकरच कंपन्यांना त्यांचा स्वतंत्र ओळख क्रमांक देणार आहे. देशातील बहुतांश नागरिकांकडे स्वत:चा एक क्रमांक आहे म्हणजेच आधार कार्ड आहे. पण आता सरकार लवकरच कंपन्यांना त्यांचा स्वतंत्र ओळख क्रमांक देणार आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी वर्ष २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना आता कंपन्यांनाही आधार कार्ड काढावे लागणार असल्याची घोषणा केली.
सरकार सर्व कंपन्यांना स्वत:चे एक ओळखपत्र देण्यासाठी आधारसारखी एक योजना आणणार आहे. सरकारला आधारच्या माध्यमातून सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार आणि सबसिडीतील गळती कमी करण्यास मदत झाली. आता सरकार आधार कार्डच्या माध्यमातून खासगी कंपन्यांमधील भ्रष्टाचार आणि बनावट कंपन्यांवर लगाम लावण्यासाठी सरसावले आहे. सरकारने यापूर्वीच तीन लाखांहून अधिक बनावट कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. सरकारने नोटाबंदीनंतर संशयित व्यवहार झालेल्या कंपन्यांविरोधातमोठी कारवाई केलेली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002