व्हीएस न्यूज - यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद ही २६ टक्क्यांनी वाढली असल्यामुळे हा अर्थसंकल्प चांगला आहे. पण अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी अनेक योजना तसेच त्यासाठी निधीची तरतुदी केली जाते, पण तो निधी खर्च का केला जात नाही ? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.
डॉ. गोऱ्हे यांनी महिलांसाठी असलेल्या अनेक योजना या तळागाळापर्यंत पोहचत नाहीत याविषयी मुंबई मराठी पत्रकार संघात ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपली खंत व्यक्त केली. त्यांनी केंद्र सरकारच्या काही योजनांचे स्वागत करत अनेक योजनांवर जोरदार टीका केली.
मागील अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्वाची असलेली मनोधैर्य योजनेत करण्यात आलेली तरतूद खर्च झाली नाही. तसेच यावेळी गोऱ्हे यांनी त्यात आणि निर्भया योजनेत निधीची कपात केल्याने नाराजी व्यक्त केली. सौभाग्य योजना आणि महिलांना वीज पूरविणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनावर टीका केली. ग्रामीण विकास आणि त्यासाठीच्या योजनांत महिलांना कुठेही स्थान नाही. सुकन्या योजना, मागास मुलींना शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा, वाचनालय आणि प्रत्येक दिवसाच्या हजेरीसाठीचा निधी कसा मिळत नाही हे पुणे जिल्ह्यातील उदाहरण देऊन सांगितले. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री-पुरुष समानतेचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002