व्हीएस न्यूज – गंभीर संकटात देश असताना पकोडे- भजी या चर्चेत सर्वांना गुंतवून ठेवायचे आणि जवानांनी काश्मीरात रोज शहीद व्हायचे. सत्तेत येऊन मोदी सरकारला चार वर्षे झाली असून उकळत्या तेलातच काश्मीर प्रश्नाचा पकोडा फुटला, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला फटकारले आहे.
काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकारवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. जगात पाकिस्तानला एकाकी पाडल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. पण भारताची साडी पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी काश्मीरमध्ये रोज सोडत असल्यामुळेच तिरंग्यास मान खाली घालावी लागते, असे शिवसेनेने म्हटले आहे.
हाताबाहेर जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती गेली असून दिल्लीच्या धमक्या पोकळ ठरवल्या जात आहे. या बलाढ्य देशाला सीमेवरील घटना मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. पकोडे व भजी तळण्यावर देशात राजकीय चर्चा सुरु आहे. सरकारच्या वतीने पाकला चोख उत्तर देऊ असे रोज सांगितले जाते. मग सरकारला अजून उत्तर सापडत नाही का?, दहशतवाद्यांसमोर काँग्रेसने गुडघे टेकल्याचा आरोप करणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले का?, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले का?, असे प्रश्नच शिवसेनेने सरकारला विचारले आहेत. देशातील गंभीर प्रश्नांवरून लक्ष उडावे यासाठी वैचारिक पकोड्यांचे तळणे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पाकिस्तानचा पराभव करून इंदिरा गांधी यांनी फाळणी केली. अमेरिका त्यावेळी भारताविरोधात पाकच्या बाजूने होती. आता अमेरिकेसह बहुसंख्य देश मोदींच्या तालावर नाचतात असे सांगितले जाते. पण परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही, असे शिवसेनेने नमूद केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002