व्हीएस न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘चाय पे चर्चा’ या मोहिमेची सुरुवात केली. पण मोदी यांनी आता पक्षातील खासदारांना ‘लंच पे चर्चा’ या चर्चासत्राचे आयोजन करायला सांगितले आहे. जनतेपर्यंत अर्थसंकल्पातील योग्य बाबी पोहोचविण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सूचना भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केल्या. राहुल गांधी यांची वर्तणूक लोकशाहीविरोधी असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले. यावेळी बैठकीत राहुल गांधी राफेल कराराशी संबंधित करत असलेल्या टीकेला सामोरे जाण्याची सूचनाही त्यांनी खासदारांना केल्या. सुत्रांनी दिलेल्या माहिट्रीपलुसार मोदींनी अर्थसंकल्प हा सामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पाच्या फायद्यांची माहिती जनतेला देण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी खासदारांना केले.