व्हिएस न्यूज – सुंजवान हल्ल्यावरील संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान जणू वेडापिसा झाला आहे. भारताचे आक्रमक वागणे, रणनीतिक चूक किंवा कोणतीच चुकीची कारवाई सहन केली जाणार नाही. त्यांच शब्दात भारताला त्यांच्या प्रत्येक कारवाईचे उत्तर दिले जाईल,असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी दिला आहे.
निर्मला सीतारामन यांनी सुंजवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल, असे म्हटले होते. पाकिस्तान सरकारने यावर मंगळवारी भारताला त्याच शब्दांत प्रत्युत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर म्हणाले, भारताचे आक्रमक वागणे,रणनीतिक चूक किंवा कोणतीच चुकीची कारवाई सहन केली जाणार नाही. त्यांच शब्दांत भारताला त्यांच्या प्रत्येक कारवाईचे उत्तर दिले जाईल. अजूनही भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची भीती पाकिस्तानमध्ये असल्यामुळे भारताने सर्जिकल स्ट्राईकची तयारी देखील करु नये. ११ वर्षांपूर्वी समझौता एक्सप्रेसमध्ये मारले गेलेल्या ४२ पाकिस्तानी नागरिकांना न्याय देण्यात भारत अपयशी ठरले.
भारताने आधी आपला गुप्तहेर कुलभूषण जाधव यांच्याबद्दल कोणत्याही पुराव्यांशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्यापूर्वी बोलावे, असे यांचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले,पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांनी सुंजवान येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास पाकिस्तानने नकार देत पूर्ण चौकशी केल्यानंतर भारताने पाकिस्तावर आरोप करावे, असेही ते पुढे म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002