व्हीएस न्यूज –भारत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मार्गावर असून २००५ च्या तुलनेत २०२० पर्यंत २० ते २५ टक्के कार्बन पातळी कमी करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक शाश्वत विकासपरिषदेमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०३० पर्यंत २.५ ते ३ अब्ज टन कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याचे भारताचे ध्येय आहे. पण अनेक देशांना हे करणे कठीण जात आहे. मात्र भारत यानंतरहीकार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मार्गावर चालत राहील. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) अहवालानुसार कोपेनहेगनच्या ठरावाप्रमाणे भारत २०२० पर्यंत सकल घरेलू उत्पन्नाच्या उत्सर्जनतीव्रतेत २० ते २५ टक्क्यांची घट करेल. तसेच सरकार समानता आणि हवामान न्यायासाठी आवश्यक सर्व गोष्ट करत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरणविषयक न्यायावर भर देण्याची गरज व्यक्त करतानाच भारतामध्ये सुशासन, टिकाऊ आजीविका आणि स्वच्छ पर्यावरण यांच्या माध्यमातून जगण्याच्या सोयींवर लक्ष केंद्रितकेले जात आहे. त्यांनी यावेळी शाश्वत पर्यावरणावरील राष्ट्रीय भौगोलिक अहवालाचा देखील संदर्भ दिला. भारत २०१४ च्या ‘नॅशनल जिओग्राफिक ग्रीनडेक्स’ अहवालामध्ये हरित उपभोगाच्या प्रक्रियेतअव्वल स्थानी आहे. जागतिक शाश्वत विकास परिषद (डब्लूएसडीएस) हा ऊर्जा आणि स्त्रोत संस्था (टेरी) चे प्रमुख मंच आहे. या मंचाद्वारे जागतिक नेत्यांना व विचारवंतांना ऊर्जा आणि पर्यावरणाच्याक्षेत्रामध्ये शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002