व्हीएस न्यूज – रोटोमॅक पेनचे मालक विक्रम कोठारी यांनी अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँकेचे ८०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी मौन सोडले असून अजूनही मी भारतातच आहे.कोणताही घोटाळा मी केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भारतातील पाच बँकांकडून सुमारे ८०० कोटी रुपयांचे कर्ज रोटोमॅक पेनचे मालक विक्रम कोठारी यांनी घेतले आहे. पण त्यांनी अद्याप कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यात कानपूरमधील रोटोमॅकचे मुख्यालय गेल्या आठवडाभरापासून बंद असल्यामुळे भारताबाहेर विक्रम कोठारी यांनी देखील पळ काढल्याची चर्चा सुरु झाली होती. पण विक्रम कोठारी यांनी रविवारी संध्याकाळी माध्यमांना एक पत्र पाठवत अजूनही भारतातच असल्याचे सांगितले. त्या पत्रात विक्रम कोठारी यांनी म्हटले आहे कि,कोणताही घोटाळा मी केलेला नाही. मी कर्ज घेतले होते. पण ते मी अजून फेडू शकलेलो नाही. त्याला बुडीत कर्ज बँकांनी म्हटले असून अजून मला डिफॉल्टर जाहीर केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असून मी कर्जाची परतफेड करणारच, असे देखील त्यांनी सांगितले.