व्हीएस न्यूज - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना लोकांनी बीफ खावे,एकमेकांना किस करावे, पण या सगळ्याचे उत्सव साजरे करण्याची काय गरज असल्याचा सवाल उपस्थित केला.
गेल्यावर्षी केंद्र सरकारने कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली होती. विरोधकांकडून त्यानंतर भाजपवर मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती. या निर्णयाचा अनेक राज्यांतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी बीफ पार्टीज आयोजित करून निषेध केला होता. नायडू यांनी त्यावेळी विरोधकांवर बीफ बंदीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता.
मी स्वतः मांसाहारी असून, कुणी काय खावे, काय खाऊ नये, ही ज्याची-त्याची आवड आहे. प्रत्येक मुद्द्याला काही लोक राजकीय रंग देण्यासाठी काहीही बोलत सुटले आहेत, असे नायडूंनी म्हटले होते. मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयात नायडू यांनी पुन्हा एकदा त्यानंतर आज बीफ बंदीच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, तुम्हाला बीफ खायचे तर खा. त्यासाठी महोत्सव कसले आयोजित करता? त्याचप्रमाणे किस फेस्टिव्हलही कशाला? तुम्हाला जर एखाद्याला किस करायचे असेल तर फेस्टिव्हल अथवा कुणाच्या परवानगीची गरज का भासते? अफझल गुरुच्या नावाचा जप काही लोक करतात. हे काय सुरू आहे? त्याने संसद उडवून देण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात राहू द्या, असे नायडूंनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002