व्हीएस न्यूज – राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला असून, तो येत्या एक-दोन दिवसांतच जाहीर केला जाईल. राज्य सरकारच्या तिजोरीवर या निर्णयामुळे १०० कोटीचा बोजा पडणार आहे. ही वाढ १ जुलै, २०१७पासून लागू होणार आहे. राज्य सरकारच्या १९ लाख कार्यरत आणि निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार वर्षातून दोनदा महागाई निर्देशांकानुसार भत्त्यामध्ये वाढ वा घट करते. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १३६ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. नव्याने मिळणाऱ्या वाढीव भत्त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना १४० टक्के महागाई भत्ता मिळेल. राज्याच्या तिजोरीवर यामुळे दरमहा सुमारे १०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मुख्य सचिवांनी याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, त्यास अर्थमंत्र्यांनीही संमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच येत्या एक-दोन दिवसांत हा निर्णय जाहीर होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांना पे बँड आणि ग्रेड पे याच्या १३६ टक्के महागाई भत्ता सध्या मिळतो. १ जानेवारी, २०१७ पासून महागाई भत्त्यात झालेली वाढ ऑगस्ट, २०१७मध्ये लागू झाली. त्यामुळे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमधील थकबाकी अद्याप सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणे बाकी आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002