व्हीएस न्यूज – एकीकडे भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढत आहे तर दुसरीकडे काही लोकांना देशाचा हा विकास खुपत आहे. ती म्हणूनच लोकं चुकीचा इतिहास मांडून द्वेष पसरवत असल्याचा आरोप सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी संघ व भाजप नेत्यांना तुम्ही संघटनेपेक्षा स्वतःला मोठे समजू नका, असा इशाराच दिला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाराणसीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबीराच्या पाचव्या दिवशी भाजप व संघ नेत्यांना संबोधित केले. भागवत म्हणाले, भारतात पूर्वी हिंदू व मुस्लीम असा भेदभाव कधीच नव्हता. सुखाने दोघेही एकत्र नांदत होते. पण १९०५ मध्ये इंग्रजांनी मुस्लीम लीगची स्थापना करत भेदभाव निर्माण केला. त्यावेळी समाजात द्वेष पसरवण्यात आला आणि तेच काम अजूनही काही लोक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारतात असंतोष पसरवणाऱ्या शत्रूंपासून लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढत असून या विकासामुळे अनेक जण नाराज आहेत. म्हणूनच खोटा इतिहास मांडून ही मंडळी द्वेष पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले.
संघ व भाजप नेत्यांना यावेळी भागवत यांनी कानपिचक्याही दिल्या. संघात व्यक्ती हा संघटनेपेक्षा मोठा नाही. संघ स्वयंसेवकामुळेच घडत गेला आणि अशीच वाटचाल यापुढेही सुरु राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने मान- अपमान, यश- अपयश याचा विचार न करता लक्ष्य प्राप्त करणे हेच एक ध्येय ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002