व्हीएस न्यूज - फेरीवाल्यांवरुन मुंबईत सध्या जोरदार राजकारण सुरु असून, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आवाज उठवत आहे. अशावेळी अभिनेता नाना पाटेकर मात्र फेरीवाल्यांच्या मदतीला धावून आले आहेत. भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतल्या ,व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली,यावेळी ते बोलत होते.
नाना पाटेकर बोलताना म्हणाले की, मला वाटतं फेरीवाल्यांची यात काहीच चूक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी काम करणारच. मात्र आपल्याला त्यांची भाकरी हिसकावून घेण्याचा अधिकार पोहचत नाही. यामध्ये खरंतर आपली देखील चूक आहे, आपण महापालिका प्रशासनाला इतके दिवस फेरीवाल्यांना जागा का दिली नाही? याबाबत का विचारलं नाही? म्हणजे याला आपणच जबाबदार आहोत. फेरीवाले जबाबदार नसल्याचे नाना पाटेकर यांनी म्हंटले आहे.
यावेळी नानांनी विविध विषयांवर भाष्य केले. कर्जमाफीबाबत बोलताना नाना म्हणाले की “कर्जमाफी ही कधीच शेतकऱ्यांसाठी पर्याय असू शकत नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळायला हवा. त्यामुळे जोपर्यंत हमीभाव येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं काहीही होणार नाही”
दरम्यान नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी अभिनेता नाना पाटेकर यांचं कौतुक करत आभार मानले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002