व्हीएस न्यूज - नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांवर आपत्तींचा डोंगर कोसळला असताना त्यात कुठली नैतिकता होती, असा परखड सवाल नोटाबंदीला वर्ष पूर्ण झाले असतानाच माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी या निर्णयामुळे केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने अनेक लोकांनी प्राण गमावले, तर लाखो लोकांनी नोक ऱ्या गमावल्या हे सत्य नाकारता येणार नाही. आजचा नोटाबंदीचा दिवस नेहमीच काळा दिवस म्हणून लोकांच्या स्मरणात राहील. जो काही काळा पैसा नष्ट झाल्याचे भासवले जात आहे तो गुजरात निवडणुकीच्या प्रचारात मागच्या दाराने परत वापरात येणार आहे, अशी भीती आहे, असा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीचा निर्णय हा नैतिकतेसाठी होता, असे वक्तव्य केले होते. त्यावर चिदम्बरम यांनी सांगितले, की अर्थमंत्र्यांनी हा निर्णय नैतिक होता असे म्हटले असले तरी १५ कोटी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी यात नोक ऱ्या गमावल्या, लाखो लोकांवर आपत्तींचे डोंगर कोसळले, यात कुठली नैतिकता होती? जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात १५ लाख कायम कर्मचाऱ्यांच्या नोक ऱ्या गेल्या, अनेक लघु व मध्यम उद्योग बंद पडले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी हा कुठला नैतिक मार्ग शोधून काढण्यात आला हे समजत नाही. सुरत, भिवंडी, मोरादाबाद, आग्रा, लुधियाना, तिरूप्पूर यांसारखी औद्योगिक उपनगरे नोटाबंदीमुळे ठप्प झाली, हीच नोटाबंदीमागची नैतिकता होती काय, असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीचा आजचा पहिला काळा स्मृतिदिन आहे. त्यात भरडल्या गेलेल्या लोकांच्या वेदनात आम्ही सामील आहोत, असे चिदम्बरम यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002