व्हीएस न्यूज - नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर दोन गोळ्या चालविल्या, तर त्यांच्या शरीरातून चार गोळ्या कशा निघाल्या, गांधींचे शवविच्छेदन का झाले नाही, गांधींना त्वरीत रूग्णालयात का नेले नाही असे प्रश्न उपस्थित करून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गांधींच्या हत्येचा नेहरूंना सर्वाधिक फायदा झाला, परंतु त्यांच्यावर संशय घेणे टाळले गेले, असा आरोप केला.
हिंदुस्थान प्रकाशन संस्था, शंकराचार्य न्यास यांच्या वतीने ‘विवेक संवाद’ अंतर्गत आयोजित ‘असहिष्णुता सत्य की आभास’ या व्याख्यानात स्वामी यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी,काँग्रेसने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता एक लाख ४० हजार नागरिकांना तुरूंगात टाकले. त्याबद्दल काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत कधी माफी मागितलेली नाही. भाजपविरोधात अखंडतेची माळ जपत पुरस्कार परत करणाऱ्यांवरही त्यांनी टिकास्त्र सोडले. पुरस्कार परत करणारी मंडळी बनावट असून पुरस्काराबरोबर मिळालेली रक्कम परत केली नाही. हिंदुस्तान हा हिंदुंचाच देश असून देशाच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’ आहे. भगवद्गीता हा ग्रंथ दहशतवादाची शिकवण देत नाही हे चिदंबरम् यांनी लक्षात घ्यावे. चिदंबरम् यांना तुरूंगात पाठविण्याची तयारी केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
व्याख्यानापूर्वी ‘इस्कॉन’च्या श्री राधा मदनगोपाल मंदिरात भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा पुरस्कार वितरण सोहळ्यातही त्यांचे भाषण झाले. अयोध्येत राम मंदिरासह मथुरा आणि वाराणसीमध्येही मंदिर बांधण्यात येणार आहे. मुस्लिमांनी या कार्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही स्वामी यांनी या कार्यक्रमांमध्ये केले. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्वाना तिहार तुरूंगाची सफर आगामी निवडणुकीपर्यंत घडविणार आहे. मी धर्म संस्कृतीचा रक्षणकर्ता असून मी सत्य बोलणारा असल्याचे स्वामी यांनी नमूद केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002