व्हीएस न्यूज - काँग्रेसच्या अध्यक्षपदी केवळ दोनच व्यक्ती विराजमान होऊ शकतात. आई किंवा मुलाचीच पक्षाच्याअध्यक्षपदी निवड होऊ शकते, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी केले आहे. काँग्रेसमध्येघराणेशाही असल्याचे शाब्दिक हल्ले भाजपकडून केले जात असतानाच अय्यर यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे आता‘घराणेशाही’च्या मुद्यावरुन काँग्रेसवर होणाऱ्या टीकेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल प्रसारमाध्यमांच्याप्रतिनिधींनी मणीशंकर अय्यर यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पक्षातील दोनच व्यक्तींना अध्यक्षपद मिळूशकते. आई किंवा मुलालाच संधी मिळू शकते आणि यासाठीची तयारी राहुल गांधींनी आधीच दर्शवली आहे,’ असेअय्यर यांनी म्हटले. ‘काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे राहुल गांधींनी जाहीर केलेआहे. मात्र निवडणूक लढवण्यासाठी दोन व्यक्ती आवश्यक असतात. मात्र निवडणुकीच्या रिंगणात एकच व्यक्तीअसेल, तर मग निवडणूक होणार तरी कशी?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अय्यर यांच्या या विधानामुळे‘घराणेशाही’च्या मुद्यावरुन भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
याआधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत, यासाठी कार्यकर्ते आणि नेते आग्रहीअसल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले होते. काँग्रेस पक्षात निवडणुका होणार असूनअध्यक्षपदासाठीही निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. ‘अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हे कार्यकर्तेआणि नेत्यांची पहिली पसंती आहेत,’ असे ४ ऑक्टोबर रोजी सुरजेवाला यांनी म्हटले होते. काँग्रेसमधील एखाद्या नेत्यानेकिंवा कार्यकर्त्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची ठरवल्यास, त्याच्या निर्णयाचे पक्षाकडून स्वागत केले जाईलका?, असा प्रश्न सुरजेवाला यांना विचारण्यात आला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002