व्हीएस न्यूज - महाराष्ट्राने सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असण्याचा ‘गौरव’ प्राप्त केला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल (एनसीआरबी) प्रसीद्ध झाला आहे. यानुसार २०१६ मध्ये राज्यात भ्रष्टाचाराची १ हजार १६ प्रकरणे समोर आली. म्हणजे देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या तब्बल २२.९ टक्के घटना या एकटय़ा महाराष्ट्रात समोर आल्या आहेत. २०१५ मध्ये राज्यात भ्रष्टाचाराच्या १२७९ तर २०१३ मध्ये १३१६ घटना समोर आल्या होत्या, त्या तुलनेत २०१६ मध्ये आकडेवारी कमी झाल्याचे दिसते.
महाराष्ट्राच्या खालोखाल ओडिसाचा नंबर लागतो. ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या ५६९ घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर केरळमध्ये ४३० , मध्य प्रदेशमध्ये ४०२, आणि राजस्थानमध्ये ३७८ प्रकरणे समोर आली आहेत.
गुन्हेगारीत उत्तर प्रदेश अव्वल…
देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशातच झाली आहे. २०१६ मधील एकूण गुन्ह्यांची संख्या ४८ लाख ३१ हजार ५१५ इतकी आहे. २०१५ मध्ये हीच संख्या ४७ लाख १० हजार ६७६ इतकी होती. म्हणजे गुन्ह्यांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात २ लाख ८२ हजार गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.
गुन्हे नोंद अहवालामध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक
महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या २०१५ मधील ४ लाख २३ हजारांवरून २०१६ मध्ये ४ लाख ३० हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे २१७ इतके आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002