व्हीएस न्यूज - केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ असा संदेश दिला जात असतानाच त्रिपुरामध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गरिबीमुळे आदिवासी समाजातील एका व्यक्तीने आठ महिन्यांच्या चिमुकलीला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या २०० रुपयांसाठी त्याने पोटच्या मुलीला विकल्याची कबुली दिली आहे.
त्रिपुरा येथील तेलियामूरामधील महाराणीपूर या गावात एक आदिवासी कुटुंब राहते. आदिवासी कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून गरीबीमुळे कुटुंबासमोर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न होता. दोन पैसे मिळतील यासाठी त्या पित्याने चक्क मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. आठ महिन्यांच्या चिमुकलीला त्याने अवघ्या २०० रुपयांमध्ये विकले. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने ही कबुली दिली. मात्र हा सर्व प्रकार उघड कसा झाला आणि त्याने मुलीला कोणाला विकले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रम राबवला असून, याच्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. गरीबांसाठी सरकारने विविध योजना देखील सुरु केल्या आहेत. मात्र या योजनांचा लाभ गरीबांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यातूनच अशा दुर्दैवी घटना घडतात, अशी खंत व्यक्त होत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002