व्हीएस न्यूज - भारतीय मजदूर संघांच्या वतीने 17 नोव्हेंबर रोजी दिल्ली संसदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सार्वजनिक उद्योगांचे अनावश्यक खासगीकरण तातडीने बंद करण्यात यावे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी सर्व उद्योग व अस्थापनात करण्यात यावी यासह अनेक प्रलंबित मागण्या संदर्भात, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात हा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ यांनी दिली.
मागील सरकार व सध्याचे सरकार यांनी सतत कामगारांच्या हितांच्या विरोधात धोरणे राबविली असून कामगारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष धुमाळ व सरचिटणिस रविंद्र देशपांडे यांनी केला आहे. सरकारच्या धोरणाच्या विरोधात व प्रलंबित मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलन केली, मात्र शासनाने त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दिल्ली संसदेवर धडक मोर्चा काढला जाणार असल्याचे धुमाळ व देशपांडे यांनी या वेळी सांगितले. या मोर्चामध्ये राज्यातील चार हजार पुरुष तर एक हजार महिला कामगार या मोर्चात सहभागी होणार आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002