व्हीएस न्यूज - लाभार्थी कमी झाल्यामुळे कर्जमाफीच्या प्रस्तावित रकमेत कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ८९ लाख वरून ६७ लाख लाभार्थी शेतक-यांची यादी अंतिम झाली आहे.
राज्याचे तब्बल १० हजार २०० कोटी रुपये वाचले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी प्रस्तावित ३४ हजार २०० कोटींचा निधी कमी करून एकूण कर्जमाफी या घडीला २४ हजार कोटींची होणार आहे. दुसरीकडे या योजनेच्या लाभधारकांची तिसरी यादी सुमारे ४० लाख शेतक-यांची यादी आज किंवा उद्या म्हणजे या दोन दिवसात जाहीर केली जाणार आहे. तसेच उर्वरित चौथी आणि शेवटची यादी येत्या ८ दिवसात जाहीर करू, असे नव्याने आश्वासन सरकारने दिले आहे.
लाभार्थ्यांंची पहिली यादी २ लाख ३९ हजाराची तर दुसरी १५ लाख ४२ हजार शेतक-यांची यादी जाहीर झाली. तिसरी यादी साधारण ४० लाख शेतक-यांची आहे, उर्वरित सर्व शेतक-यांची अंतिम यादी एका आठवडय़ात जाहीर होईल अशी हमी सरकारने पुन्हा दिली आहे.