व्हीएस न्यूज - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा निसटता विजय झाला, असा खळबळजनक आरोप पाटीदार नेता हार्दिक पटेल याने केला आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांनी मिळून इव्हीएमविरोधात आंदोलन छेडले पाहिजे असे आवाहनही हार्दिक पटेल याने केले आहे.
गुजरातमध्ये यापुढेही पाटीदार आरक्षणाचा मुद्दा आणि शेतक-यांच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू करणार असल्याचा इशाराही त्याने यावेळी दिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना हार्दिक पटेलने भाजपाच्या विजयामध्ये इव्हीएमचा हात असल्याचा थेट आरोप केला. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये भाजपाने इव्हीएममध्ये घोळ केल्याचा दावा हार्दिक पटेलने केला आहे. तसेच धोकेबाजी करून निवडणुक जिंकणा-या भाजपाला शुभेच्छा अशी प्रतिक्रियाही त्याने दिली. अहमदाबादमधील एका कंपनीचे १४० इंजिनियर पाच हजार इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने ट्विटरवरून केला होता. काँग्रेसने याआधीच इव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने सातत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002