व्हीएस न्यूज - गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे सामान्य माणूस मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा पुरावा आहे, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते सोमवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतील यशाबद्दल भाजप कार्यकर्त्यांचे आणि सामान्य जनतेचे आभार मानले. गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधात वारे वाहत असतानाही राज्यातील सत्ता टिकवण्यात भाजपाने यश मिळवले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून आणण्यात भाजपाना यशस्वी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. "विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेने पाठिंबा दिला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे." असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. सध्या भाजपाने एकूण 88 जागांवर विजय मिळवला आहे. तर 12 ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने 66 जागा जिंकल्या असून, 14 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाची सुरुवातीची आघाडी मोडीत काढत काँग्रेसने मुसंडी मारल्याने राज्यात मोठा उलटफेर होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र जसजसे कल स्पष्ट होऊ लागले तशी भाजपाची आघाडी वाढत गेली....Read More
व्हीएस न्यूज - नव्या अप्रत्यक्ष कराच्या तूर्त कक्षेबाहेर असलेल्या पेट्रोल, वीज तसेच घर खरेदी – विक्रीचे व्यवहार वस्तू व सेवा कर (जीएसटी) कक्षेत आणण्याची तयारी सुरू आहे. याविषयक परिषदेच्या पुढील बैठकीत निर्णय होण्याचे संकेत परिषदेचे एक सदस्य व बिहारच्या अर्थमंत्र्यांनी दिले आहेत.
‘फिक्की’ या उद्योग संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले की, नजीकच्या काळात तेल व वायू, ऊर्जा, गृहनिर्माण आदी क्षेत्र वस्तू व सेवा कराच्या जाळ्यात आणले जातील. याबाबत वस्तू व सेवा कर परिषद तिच्या पुढील बैठकीमध्ये निर्णय घेईल. ही प्रक्रिया वस्तू व सेवा करविषयक नियमातील कोणत्याही बदलाविना होईल, असे स्पष्ट करत मोदी यांनी मात्र नेमका निर्णय केव्हा घेतला जाईल, हे सांगितले नाही. पेट्रोलियम पदार्थाना नव्या कररचनेत आणताना त्याचा सर्वाधिक करटप्पा असेल, असेही मोदी म्हणाले. शिवाय राज्यांना त्यावर अधिभार लावण्यास मुभा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पेट्रोल, डिझेल तसेच या गटातील अन्य पदार्थावरील कराच्या माध्यमातून केंद्र तसेच राज्य सरकारांना एकूण महसुलाच्या ४० टक्क्यांपर्यंतचा वाटा मिळतो.
वस्तू व सेवा करप्रणालीची १ जुलै २०१७ पासून अंमलबजावणी झाली आहे. सध्या शून्य, पाच, १२, १८ व २८ टक्के अशा पाच स्तरावरील वस्तू व सेवा कर विविध २,००० हून अधिक वस्तूंवर आकारला जात आहे. पैकी १२ व १८ टक्क्यांचा एकच स्तर करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र महसूलवाढीनंतरच हा निर्णय होणार असल्याचे केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. गुरुवारी सुशील मोदी यांनीही याबाबत पुनरुच्चार केला. सध्याचा २८ टक्के कर स्तर २५ टक्के करण्याचे सुतोवाच जोड त्यांनी यावेळी केले. बिहार राज्याचे अर्थमंत्री असलेले मोदी हे परिषदेत सहभागी विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाचे प्रमुख आहेत. जुलैपासून वस्तू व सेवा करप्रणाली लागू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर या माध्यमातून होणारे कर संकलन गेल्या काही कालावधीत रोडावले आहे. तसेच या करांतर्गत विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. परिषदेने अनेक वस्तू आधीच्या तुलनेत कमी कराच्या टप्प्यात आणून ठेवल्या आहेत.
व्हीएस न्यूज - डेबिट कार्ड, भिम तसेच यूपीआय अॅपद्वारे होणारे २००० रुपयापर्यंतच्या विनिमय व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना याचा लाभ दोन वर्षांसाठी घेता येणार असून यापोटी बँकांना होणाऱ्या २५१२ कोटी रुपयांच्या भरपाईची तयारी सरकारने दर्शविली आहे. निश्चलनीकरणानंतर थंड पडलेल्या रोकडरहित व्यवहारांना नव्याने चालना देण्यासाठी शुक्रवारी डेबिट कार्ड तसेच अॅपद्वारे होणाऱ्या निधी व्यवहारांकरिता सरकारने ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना हा शुल्क दिलासा दिला. ग्राहकांच्या डेबिट कार्डाद्वारे व्यापाऱ्यांना व्यवहार करण्यासाठी बँकांकडून मशीन (पीओएस) दिल्या जातात. त्यासाठीचे शुल्क (एमडीआर) बँका व्यापाऱ्यांकडून प्रत्येक व्यवहारामागे आकारतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपरोक्त माध्यमातून होणारे २००० रुपयेपर्यंतच्या व्यवहारांवर शुल्क लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी २०१८ पासून याची अंमलबजावणी दोन वर्षांसाठी करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. शुल्कसूटचा लाभ ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना होणार असून बँकांना होणारे २५१२ कोटी रुपयांचे नुकसान सरकार भरून देणार आहे. रिझव्र्ह बँकेने पाचव्या द्विमासिक पतधोरणाद्वारे या व्यवहाराकरिता वार्षिक २० लाख रुपयांची उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकरिता ०.४० टक्के शुल्क लागू केले होते. तसेच व्यवहारामागे २०० रुपयांची मर्यादाही निश्चित करण्यात आली. २० लाख रुपयांवरील उलाढाल असलेल्यांना ०.९० टक्के शुल्क तसेच १००० रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली होती. डेबिट कार्डाद्वारे गेल्या वित्त वर्षांत ३.३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. नोव्हेंबर २०१६ मधील ३५,२४० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये ४७,९८० कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.
फेरफारचे आरोप करणे चुकीचे
व्हीएस न्यूज - इव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून होत असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. इव्हीएममध्ये फेरफार अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांमधील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. जोती म्हणाले, इव्हीएममध्ये फेरफार झालेली नाही. इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर आम्ही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. गुजरातमध्ये व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात आला, कोणाला मत दिले हे मतदारांना समजते,त्यामुळे फेरफारचे आरोप करणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. अहमदाबादस्थित एका कंपनीचे १५० अभियंते मतदान यंत्रांत फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी रविवारी केला होता. पाच हजार मतदानयंत्रांत फेरफार करण्याचा कट असून देवाने तयार केलेल्या मानवी शरीरात बदल करता येतात तर मग मानवानेच तयार केलेल्या मतदानयंत्रात का बदल करता येणार नाहीत, अशी ट्विप्पणी हार्दिक यांनी केली होती. यापार्श्वभूमीवर जोती यांनी हे विधान केले आहे.
दरम्यान, गुजरातचा गड राखण्यात भाजपला यश मिळाले असले तरी त्यांना १५० जागांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला हादरा देत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. हिमाचलमध्ये भाजप ४३ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय, ८ जागांवर अन्य पक्षांनी आघाडी घेतली आहे. हिमाचल विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी एकूण ६८ जागांपैकी ३५ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता बहुमताचा आकडा गाठणे भाजपला अवघड जाणार नाही, असे चित्र तुर्तास दिसत आहे.
व्हीएस न्यूज - गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत राजकोट पश्चिमेतून भाजपचे विजय रुपाणी भरघोस मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरु यांचा सुमारे २० हजार मतांनी पराभव केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. रुपाणींविरोधात लढण्यासाठी काँग्रेस नेते इंद्रनील राजगुरु यांनी स्वत:चा मतदारसंघ सोडून राजकोट पश्चिममधून हट्टाने उमेदवारी मागितली होती. राजगुरू गेले दीड वर्ष मतदारसंघात जमवाजमव करत होते. राजगुरु यांची १४१ कोटी रुपयांची अधिकृत संपत्तीदेखील होती.
रुपाणी यांच्या मतदार संघात तगडा उमेदवार देऊन रुपाणी यांना मतदार संघातच रोखून ठेवण्याची काँग्रेसची रणनिती होती. यात भर म्हणजे हार्दिक पटेल यांच्या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे रुपाणी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. रुपाणी राज्यात प्रचारात व्यस्त असल्याने त्यांची पत्नी अंजली रुपाणी या पतीसाठी प्रचार करत होत्या. सोमवारी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी झाली. मतमोजणीच्या सुरुवातीला रुपाणी यांनी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर ते पिछाडीवर गेले. त्यामुळे राजकोट पश्चिमेत काँग्रेस जिंकणार की काय अशी शंका उपस्थित झाली. मात्र, त्यानंतर रुपाणी पुनरागमन केले. रुपाणी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले असले तरी १५० जागांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता रुपाणी यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हीएस न्यूज - महाभारत एकट्या द्रौपदीमुळे घडले. स्त्रीवादाची ती जननी होती असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही. द्रौपदीला पाच पती होते पण ती एकाचेही ऐकत नव्हती. तिने कृष्णाला सखा आणि मित्र मानले होते त्याचेच तिने ऐकले. हे वक्तव्य केले आहे भाजपचे महासचिव राम माधव यांनी. द्रौपदीमुळे महाभारताचे युद्ध झाले या युद्धात १८ लाख लोकांचा मृत्यू झाला. द्रौपदीला हक्क हवा होता म्हणून ही लढाई झाली असेही वक्तव्य राम माधव यांनी केले.
पणजी या ठिकाणी झालेल्या एकदिवसीय भारतीय विचार महोत्सवात राम माधव यांनी त्यांची मते मांडली आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. द्रौपदी जर स्त्रीवादाची जननी असेल तर मग शिखंडी हा काय पहिला हा LGBT (तृतीयपंथीय) कार्यकर्ता होता का? असे प्रश्न विचारून राम माधव यांना ट्रोल करण्यात आले आहे. इतकेच नाही तर द्रौपदीला पाच पुरूषांशी विवाह करण्यास भाग पाडण्यात आले होते. तिचा पाच पांडवांशी विवाह तिच्या इच्छेविरोधात करण्यात आला होता. अशी उत्तरे देत राम माधव यांना ट्रोल करण्यात आले.
व्हीएस न्यूज - गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या दोन्ही ठिकाणी भाजपला बहुमत मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेबाहेर आले तेव्हा साहजिकच खुशीत दिसत होते. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना पोझ देताना ‘व्हिक्टरी साईन’ दाखवले. संसदेच्या परिसरात आल्यानंतर मोदी आपल्या गाडीतून उतरले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी नमस्ते म्हटले व ‘व्हिक्टरी साईन’साठी आपला हात उंचावला. गुजरातमध्ये भाजपने सलग चौथ्यांदा सत्ता कायम राखली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. यामुळे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या १९ वर पोहोचणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील बहुतांश निकाल स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार आहे. यापैकी गुजरातमध्ये भाजपने १०५ जागांवर आघाडी मिळवली असून येथील पक्षाचा विजय जवळपास स्पष्ट आहे. तर राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली लढणारा काँग्रेस पक्ष ७२ जागांवर पुढे आहे. भाजप बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचला असला तरी काँग्रेसच्या जागांमध्ये पूर्वीपेक्षा २० जागांची वाढ झाली आहे. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिल्यास काँग्रेस पक्षाच्यादृष्टीने हे मोठे यश म्हणावे लागेल.
एक्झिट पोल्सनी गुजरातमध्ये भाजपला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. उद्योगजगतानेही काहीसा असाच अंदाज बांधला होता. मात्र, मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. याचे पडसाद भांडवली बाजारातही उमटले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल ८०० अंकांनी कोसळला होता. मात्र, थोड्यावेळात भाजपने पुन्हा मुसंडी मारत १०० जागांवर आघाडी घेतल्यानंतर सेन्सेक्स पुन्हा २६७ अंकांनी वधारला होता.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002