Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
सहा बँकांचे चेकबुक 31 डिसेंबरपर्यंत वैध !

व्हिएस न्यूज - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेचे जुने चेक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतच वैध असतील. १ जानेवारी २०१८ पासून या बँकांचे चेक अवैध ठरवण्यात येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या सहयोगी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या बँकांचा समावेश आहे.

यंदाच्या एप्रिल महिन्यातच या बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीन करण्यात येणार आहेत. याशिवाय भारतीय महिला बँकेचेही एसबीआयमध्ये विलिनीकरण झाले होते. १ एप्रिल २०१७ रोजी विलिनीकरणानंतर एसबीआयचे जुने चेकबुक ३० सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने ही मर्यादा वाढवून ३१ डिसेंबर २०१७ केली होती. एसबीआयने याआधी सुमारे १३०० बँक शाखांचे आयएफएससीही बदलले आहेत. एसबीआयचे नवे चेकबुक मिळवण्यासाठी खातेदारांना बँकेच्या शाखेत किंवा एटीएममध्ये जाऊन किंवा मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज करावा लागेल.

एसबीआयच्या संकेतस्थळाचा पत्ताही बदलण्यात आला आहे. बँकांच्या विलिनीकरणानंतर आता एसबीआय खातेदारांना संकेतस्थळावर क्लिक करावे लागेल. जर तुम्ही विलीन केलेल्या जुन्या पाच बँकांचे खातेदार असाल तर घाबरू नका. तुम्ही जुन्याच लॉगइन आयडी आणि पासवर्डचा वापर करू शकता. या नव्या संकेतस्थळावर तुम्ही जुन्या युझर आयडीद्वारे बँकिंगचे व्यवहार करू शकता. जर तुमचा आयडी किंवा पासवर्ड कार्यरत नसेल तर तुम्ही याची तक्रार एसबीआयकडे करू शकता.

एसबीआयच्या अधिकृत परिपत्रकानुसार, विलीन केलेल्या सहयोगी बँकांच्या नेट बँकिंगचे फीचर्स आणि एसबीआयचे फीचर्स मिळतेजुळते आहेत. त्यामुळे तिथे सर्व सुविधा पहिल्यासारख्या उपलब्ध असतील. विलिनीकरणानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मोबाईल नंबर रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही. थर्ड पार्टी बेनिफिशरीची यादीही पहिल्यासारखीच कायम असेल. मात्र ग्राहकांना एसबीआयच्या नव्या संकेतस्थळावर आपापला ई-मेल आयडी रजिस्टर करावा लागेल.
...Read More

V. S. News
भारतीय ‘अ’ संघातील खेळाडूंचे भविष्य उज्वल

व्हीएस न्यूज - युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पध्रेकरिता न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू राहुल द्रविड यांनी भारतीय युवा संघाच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी सहा ते आठ महिन्यांच्या काळात या युवा संघातील खेळाडूंना भारताच्या ‘अ’ संघाकडून खेळताना पाहण्याचे लक्ष्य द्रविडने डोळ्यासमोर ठेवले आहे.

‘युवा विश्वचषक स्पध्रेत रोमांचक आव्हान असतात आणि या खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. युवा क्रिकेटपासून सुरू होणारा हा प्रवास संधी मिळत गेल्यानंतर प्रथम श्रेणी, भारत ‘अ’ आणि त्यानंतर राष्ट्रीय संघ असा त्याचा प्रवास होत असतो,’ असे द्रविड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,‘युवा खेळाडूंसोबत मी क्रिकेटच्या इतर प्रकाराबद्दलही चर्चा करतो. पुढील ६ ते ८ महिन्यांत या खेळाडूंनी भारताच्या ‘अ’ संघात स्थान मिळवल्यास, आनंदच होईल. युवा विश्वचषक स्पध्रेतून खेळाडू घडायला सुरूवात होते.

मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ युवा विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे. पृथ्वीने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे या युवा संघातून भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यात कोणते खेळाडू आघाडीवर आहेत, याबाबत द्रविडला विचारले असता तो म्हणाला,‘युवा आणि भारत ‘अ’संघाचा प्रशिक्षक म्हणून या खेळाडूंकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. या पिढीचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांशी जुळवून घ्यायचे आहे. हे खूप मोठे आव्हान आहे. हा खेळ बराच बदलला आहे. त्यामुळे वरिष्ठ संघात यापैकी कोण खेळेल याबाबत मी सांगू शकत नाही. प्रत्येक खेळाडूमध्ये क्षमता आहे.’

...Read More

V. S. News
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर

व्हीएस न्यूज - त‌िहेरी तलाक ही मुस्लिम समाजातील प्रथा संपवण्यासाठी अखेर आज (गुरूवार) संसदेत मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक सादर करण्यात आले. कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी प्रश्नोत्तरानंतर हे विधेयक संसदेसमोर मांडले. अपेक्षेप्रमाणे एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाला विरोध केला. हा कायदा मुलभूत अधिकाराचे उल्लंघन करत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले. हे विधेयक सदोष असून यात बऱ्याच बाबी विरोधाभास निर्माण करणारे असल्याचे मत बीजेडीचे खासदार भ्रृतहारी मेहताब यांनी मांडले. काँग्रेसनेही विधेयकाचे स्वागत केले असले तरी काही अटींचा पुर्नविचार करण्याची त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, हे विधेयक महिलांच्या सन्मानासाठी असल्याचे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले.

तिहेरी तलाक विधेयकावर बोलताना प्रसाद म्हणाले की, पंतप्रधान मोदी असेपर्यंत कोणत्याही महिलेवर अन्याय होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने कायदा करण्यास सांगितले होते. त्यांच्याच आदेशाचे पालन केले जात आहे. हा कायदा महिलांचे हक्क आणि न्याय यासाठी असून प्रार्थना, परंपरा किंवा धर्माशी संबंधित नसल्याचेही ते म्हणाले.

या विधेयकात तिहेरी तलाकप्रकरणी दोषींसाठी ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. याला काही पक्षांचा विरोध आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशात ८.४ कोटी मुस्लिम महिला आहेत आणि प्रत्येकी एक घटस्फोटित पुरूषांच्या तुलनेत ४ महिला याप्रकरणी पीडित आहेत. अनेक मुलींचे वय १५ वर्षांपेक्षा कमी असताना केले जातात. २००१ ते २०११ या कालावधीत मुस्लिम महिलांना घटस्फोट देण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे.

...Read More

V. S. News
पिंपळे निलख – वाकड रोड ‘पोस्टरमुक्त’

व्हीएस न्यूज - पिंपळे निलख – वाकड रोड ‘पोस्टरमुक्त’ करण्यात आला आहे. येथील संपूर्ण रोडवरील पथ दिव्यांच्या खांबावर बेकायदा पोस्टर लावण्यात आले होते. स्वत: तुषार कामठे यांनी अतिक्रमन मोहिमेत सहभागी होत हा रस्ता ‘पोस्टरमुक्त’ केला.

पिंपळे निलख आणि वाकड परिसराची झपाट्याने वाढ होत आहे. त्यापुढेच असणार्या हिंजवडी आयटी पार्कमुळे येथील मुख्य रस्त्यांवर कायम मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरील पथदिव्यांच्या खांबावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर अपुरा प्रकाश पडत होता. तसेच वाहनचालकांना वाहन वळविताना अडथळा होत होता. या पोस्टरमुळे प्रभागाचे विद्रुपीकरण झाले होते. याबाबतची तक्रार पिंपरी चिंचवड गृहनिर्माण संस्था महासंघाच्या सदस्यांनी स्थानिक नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडे केली होती. त्यानुसार कामठे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पोस्टर काढण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे अर्थपूर्ण कानाडोळ करत कारवाईत दिरंगाई केली होती. त्यामुळे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्वत:च हे अनधिकृत पोस्टर काढण्याचा निर्णय केला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे पथक स्थापन करुन वाकड रोडवरील बेकायदा पोस्टर काढुन घेतले व वाकड रोड पोस्टरमुक्त केला. तसेच काढण्यात आलेले पोस्टर “ड” क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वासमोर टाकुन महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

...Read More

V. S. News
ग्राहकाच्या तक्रारीवरुन आरबीआयचा एचडीएफसी बँकेला दणका…!

व्हीएस न्यूज - नियमानुसार सर्व देयक रक्कम देऊन क्रेडीट कार्ड बंद केल्यानंतरही एचडीएफसी बँकेकडून निगडी प्राधिकरण येथील एका ग्राहकाला वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात होते. त्यासाठी बचत खात्यातील रक्कमही परस्पर खात्यातून काढून घेण्यात आली होती. बँकेच्या या मनमानी कारभाराबद्दल पोलीस व रिजर्व बँकेकडे ग्राहकाने तक्रार करताच आरबीआयने तक्रारीची दखल घेत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

निगडी प्राधिकरण येथील रहिवासी रणजीत इंगळे यांनी त्यांचे एचडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड २०१६ मध्ये बंद केले. त्यासाठी लागणारी रक्कम धनादेशाद्वारे बँकेत जमा केली. मात्र त्यानंतरही इंगळे यांना त्यांच्या मोबाईलवर वेळोवेळी बँकेकडून पैसे भरण्यासाठी विचारणे केली जाऊ लागली. यावर इंगळे यांनी बँकेत जाऊन आपण रक्कम भरली असल्याचे सांगितले. मात्र तरीही बँकेने इंगळे यांचे एचएडीएफसी बँकेतील बचत खात्यातून परस्पर आठ हजार रुपये रोखून धरत ते पुढे काढून घेतले. याप्रकरणी इंगळे यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडेही तक्रार केली, त्यांना मेल केले. मात्र त्या मेलला कोणतेही उत्तर न देता परस्पर तक्रार निकाली काढल्याचे बँकेने एसएमएसद्वारे सांगितले. यावेळी इंगळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ल यांना आपल्या सोबत झालेल्या फसवणुकीची माहिती निवेदनाद्वारे दिली. तेच निवेदन पुढे इंगळे यांनी थेट रिजर्व बँक ऑफ इंडियाला दिले. इंगळे यांच्या तक्रारीची दखल घेत आरबीआयने इंगळे यांनी जागरूकपणे तक्रार केल्याबद्दल अभिनंदन केले असून त्यांच्या तक्रारीचे कायदेशीर पद्धतीने निवारण केले जाईल व त्याची माहितीही त्यांना दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. एका तक्रारीमुळे खासगी बँकांच्या मनमानी काराभाराला आळा बसेल असे मत इंगळे यांनी व्यक्त केले आहे.

...Read More

V. S. News
हिऱ्या व्यापाऱ्याने लावून दिले २५१ मुलींचे लग्न

व्हिएस न्यूज - गुजरातच्या सुरत येथील हिरे व्यापारी महेश सवानी दरवर्षी दिवाळीसाठी आपल्या कर्मचा-यांना बोनस आणि कार देण्याकरिता प्रसिद्ध आहेत. पण यावेळी आपण असे काहीतरी केले आहे ज्यामुळे आपल्याला धक्का बसेल. महेश सवानी यांनी रविवारी २५१ मुलींची लग्न लावून दिली. ज्यामध्ये ५ मुस्लिम आणि १ ख्रिस्ती मुलींचा समावेश होता. त्यांनी संपूर्ण रीतिरिवाजांसह त्यांचे लग्न लावून दिले. यापैकी दोन मुली एचआयव्ही पॉजिटिव्ह आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महेश सवानी अशा मुलींची लग्न लावून देतात ज्यांचे वडील नाहीत किंवा लग्न खर्च ज्यांना परवडू शकत नाही. ते म्हणाले, या मुलींचे वडील बनण्याची जबाबदारी मी पार पाडत आहे. २०१२पासून ते दरवर्षी कन्यादान करतात. हजारो लोक यावेळी उपस्थित होते. यामध्ये मुलगा व मुलीचे नातेवाईक आणि कुटुंबीय उपस्थित होते. महेश सवानी वधूंना सोफा, पलंग आणि बाकी घर सामना देतात. त्यामुळे ते त्यांचे वैवाहिक आयुष्य सुरु करू शकतील.
...Read More

V. S. News
डावखुरी व्यक्ती नास्तिक असण्याची शक्यता जास्त

व्हिएस न्यूज - डावखुरी व्यक्ती नास्तिक असण्याची शक्यता जास्त असते, असे एका सर्वेक्षणात समोर आले असून यासंदर्भातील सर्वेक्षण रिव्हॉल्युशनरी सायकॉलॉजिकल सायन्समध्ये प्रसिद्ध झाले आहे.

या केलेल्या सर्वेक्षणानुसार, डाव्या हाताने काम करणारी अधिकाधिक माणसे देवावर विश्वास ठेवत नाही. आधुनिक युगातील लोकांचा आधीपेक्षा जास्त देवावर विश्वास असल्याचेही यात समोर आले आहे. या संदर्भातील वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, डाव्या हातांनी काम करणारे लोक आणि आत्मकेंद्रित लोकांच्या संशोधकांनी मुलाखती घेतल्या आणि त्यांचे सर्वेक्षण केले. ते किती प्रमाणात धार्मिक आहेत, याचे अंदाज त्यांचा अभ्यास करुन बांधले. फिनलँडमधील औलू विश्वविद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिकीकरणाच्या पूर्वीच्या काळात धर्माकडची ओढ ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात होती. अर्थात, विशिष्ट संख्येच्या लोकांचा अभ्यास करुन, प्रातिनिधिक स्वरुपात हे सर्वेक्षण औलू विश्वविद्यापीठातील संशोधकांनी केले आहे.
...Read More

V. S. News
आता फेसबुक अकाऊंट सुरु करण्यासाठी आधारकार्ड सक्ती?

व्हिएस न्यूज - फेसबुकवर नवीन अकाऊंट तुम्हाला सुरु करायचे असेल तर तुमच्याकडे आधारकार्ड असणे गरजेचे होणार असल्याचे चित्र सध्या दिसत असून प्रायोगिक तत्वावर नवीन फेसबुक अकाऊंटसाठी फेसबुकने आधारकार्डवरील नाव टाकण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. फेसबुकवर जास्तीत जास्त लोकांनी खऱ्या नावांनी अकाऊंट सुरु करण्याच्या दृष्टीने ही चाचपणी करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. अगदीच कमी लोकांना अशाप्रकारचे नोटीफिकेशन प्रायोगिक तत्वावर असल्याने अकाऊंट सुरु करताना दिसले असले तरी अद्याप फेसबुककडून आधारकार्डवरील नावाची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे कळते.

अशाप्रकारचे प्रयोग सुरु असल्याचे फेसबुकनेही मान्य केले आहे. लोक ज्या नावाने खऱ्या आयुष्यात ओळखली जातात त्याच नावाने त्यांनी अकाऊण्ट ओपन करावे ते त्यांच्या नातेवाईकांशी आणि कुटुंबाशी ज्यामुळे सहजपणे कनेक्ट होऊ शकतात. सध्याच्या प्रयोगानुसार तुमच्या आधारकार्डवरील नाव अकाऊंट सुरु करताना टाकण्यास सांगण्यात येते. ज्यामुळे नवीन युझर्सला त्यांच्या ओळखीचे लोक फेसबुकवर लगेच आणि सहज शोधू शकतील. हे सक्तीचे करण्यात आलेले नसून आम्ही फक्त याबद्दलच्या चाचण्या घेत असल्याची माहिती फेसबुकच्या भारतातील प्रवक्त्याने दिली आहे.
...Read More

V. S. News
३५ महामंडळे बंद करण्याच्या हालचाली

व्हिएस न्यूज - राज्यातील विविध भागांचा आणि अविकसित विभागांचा विकास व्हावा म्हणून राज्यात सुमारे ५५ महामंडळांची स्थापना करण्यात आली. मात्र या महामंडळांची आर्थिक स्थिती दयनीय ठरल्याने दोन वर्षापूर्वी सात महामंडळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा निर्णय घेण्यात येऊन तोटय़ातील तब्बल ३५ महामंडळे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

याकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती विविध महामंडळांचा आढावा घेऊन आपला अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे समजते.

२०१५ मध्ये मॅफ्को, मेल्ट्रॉन, कोकण विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ, भूविकास महामंडळ, महाराष्ट्र विकास महामंडळ ही महामंडळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तोटय़ातील ३५ महामंडळे बंद करून या महामंडळांची मालमत्ता विकून संबंधित कर्ज फेडले जाईल असेही समजते. या निर्णयामुळे एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळेल या आशेवर असलेल्या शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी निराशा होणार आहे.
...Read More

V. S. News
महिलांनी कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

व्हिएस न्युज- महिलांमध्ये सतत काही ना काही शारीरिक बदल होत असतात. जसजसे महिलांचे वय वाढत जाते, तसतसे हे बदल जास्त जाणवू लागतात. वरकरणी जरी हे बदल सामान्य वाटत असले, तरी हे बदल जाणवू लागले तर त्याकडे दुर्लक्ष न करता, त्यासंदर्भात तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण शरीरामध्ये होणारे हे काही बदल कर्करोगाचे लक्षण असू शकतात. आपल्या शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवत असेल, तर त्यासंबंधी धोक्याची सूचना आपले शरीर आपल्याला देत असते. निरनिराळ्या लक्षणांच्या रूपाने ही धोक्याची सूचना आपले शरीर आपल्याला देत असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

कित्येकदा स्त्रियांच्या स्तनांच्या आकारामध्ये बदल होतो, किंवा त्यामध्ये गाठ जाणवते. गाठ आहे, याचा अर्थ कर्करोग असेलच असे नाही. पण तरी देखील या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच स्तनामधून जर कोणत्याही प्रकारचा स्राव होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनावर लाली उद्भविल्यास किंवा सूज जाणाविल्यासही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.

महिलांमध्ये पोट फुगण्याची तक्रार सर्वसाधारण आहे. पण ही पोटदुखी जर कमी न होता काही दिवस तशीच राहिली, आणि त्याच्या जोडीने हलका रक्तस्राव होऊ लागला, तर ही धोक्याची सूचना असू शकते, अश्या वेळी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हे लक्षण कोलोन कॅन्सर, ओव्हरीज चा कॅन्सर, गॅस्ट्रोइंटेस्टीनल कॅन्सर किंवा पॅनक्रियाच्या कॅन्सरचे असू शकते. तसेच मासिक धर्माचे दिवस सोडल्यास एरवी रक्तस्राव होत असल्यासही तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

शरीरावर असलेला तीळ किंवा मस अचानक वाढू लागला, किंवा शरीरावर अचानक नवे डाग उत्पन्न होऊ लागले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच लघवीतून किंवा शौचातून रक्तस्राव होऊ लागल्यासही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बहुतांशी बाबतीत हा रक्तस्राव हॅमरॉइड्स मुळे असू शकतो, पण क्वचित प्रसंगी हे कोलोन कॅन्सरचे लक्षण असू शकते. विशेषतः हा रक्तस्राव जर दोन दिवसांपेक्षा जास्त राहिला तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
लिम्फ नोड्स मध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले, तर त्यांमध्ये बदल दिसून येतो. ही इन्फेक्शन बहुतेक वेळा बरी होतात, पण लिम्फ नोड्सवर सूज हे ल्युकेमिया किंवा लिम्फोमाचे लक्षण असू शकते. अश्या प्रकारची सूज जाणवू लागली आणि दोन आठवड्यांनंतर देखील ही सूज कमी होत नसली, तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावयास हवा. कधी घसा खराब असल्याने किंवा घश्याला सूज आल्याने गिळण्यास त्रास जाणवतो. पण जर हा त्रास वारंवार उद्भवू लागला, आणि त्याच्या जोडीने वजन झपाट्याने कमी होऊन सतत उलट्यांचा त्रास ही होऊ लागला, तर हे घशाच्या किंवा पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे घसा सुजणे किंवा गिळताना त्रास होणे ही लक्षणे सतत जाणवू लागली, तर त्याची तपासणी आवश्यक आहे.

आपले वजन कोणतीही मेहनत न घेता, खाण्या पिण्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण न ठेवता आपोआप कमी व्हावे अशी इच्छा प्रत्येक महिलेला होत असते. पण खाण्यापिण्यावर कोणतेही नियंत्रण नसताना, कोणताही व्यायाम करीत नसताना जर वजन झपाट्याने कमी होऊ लागले, तर ते कोलोन किंवा पॅनक्रिया च्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. बहुतेक वेळा प्रमाणाबाहेर शारीरिक किंवा मानसिक ताण देखील वजन झपाट्याने कमी होण्यास कारणीभूत ठरत असतो. तरी ही याची योग्य वेळी तपासणी करू घेणे चांगले.

ज्या महिला धूम्रपान करीत असतील, त्यांच्या तोंडाच्या आतमध्ये पांढरे, पिवळे किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसू लागल्यास हे तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. तसेच सतत तोंड येणे, किंवा तोंडामध्ये अल्सर होणे हे ही कर्करोगाचे लक्ष असू शकते. अंगामध्ये सतत ताप असल्यासही तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. ताप जरी आला, तरी तीन दिवसांनी इन्फेक्शन कमी होऊन ताप उतरतो. पण आलेला ताप तर त्याही पेक्षा जास्त दिवस राहिला, तर तपासणी करून घेणे गरजेचे आहे. अंगामध्ये सतत असणारा ताप ल्युकेमियाचे लक्षण असू शकते. तसेच धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये महिन्याभरापेक्षा जास्त काळ चालू राहणारा खोकला देखील धोक्याची सूचना देत असतो. या खोकल्याबरोबर जर धाप लागत असेल, तर हे लक्षण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे असू शकते.
...Read More

V. S. News
अल्पेश ठाकोर यांचा महाराष्ट्राला भाजपमुक्त करण्याचा निर्धार

व्हिएस न्यूज – गुजरातमधील अनाचार संपविण्यासाठीच जिग्नेश आणि हार्दिकने माझ्यासोबत झंझावात निर्माण केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्याचा दावा गुजरातचे नवनिर्वाचित आमदार अल्पेश ठाकोर यांनी मुंब्य्रातील एका कार्यक्रमात केला. तसेच देशातील संसदीय लोकशाही आणि संविधानाला भाजपच्या एकाधिकारशाहीमुळे धोका निर्माण झाला असल्यामुळेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या लढय़ाला साथ देऊन महाराष्ट्र भाजपमुक्त करण्याचा इशाराही दिला.

आमदार अल्पेश ठाकोर मंगळवारी रात्री मुंब्रा येथील मित्तल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजपवर टीका केली. देशात अराजकता माजली असून सध्या दहशतीखाली दलित, अल्पसंख्याक वर्ग जगत असून भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. बहुसंख्याक जनतेला ठरावीक वर्गाच्या हितासाठी वेठीस धरले जात आहे. संविधानाला हा प्रकार धोकादायक असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. संसदीय लोकशाहीला राक्षसी बहुमताच्या जोरावर जनविरोधी नीतींचा अवलंब केला जात असल्यामुळेच धोका निर्माण झाला असल्यामुळेच जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल यांनी माझ्यासोबत भाजपला गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आव्हान दिल्याने त्यांची पीछेहाट झाल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
...Read More

V. S. News
आगामी वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकणार!

व्हीएस न्यूज – भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदराच्याबाबतीत (जीडीपी) आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्स या दोन बड्या देशांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला असून यासंबंधीचा अहवाल ‘द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) प्रसिद्ध केला आहे.

या अहवालानुसार वीज आणि तंत्रज्ञान आगामी वर्षात कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था वर्चस्व गाजवतील. यामध्ये वरच्या स्थानावर भारतीय अर्थव्यवस्था असेल. या एकूणच परिस्थितीमुळे जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांच्या यादीत आगामी १५ वर्षात आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे धक्के भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे काहीसा मंदावला आहे. पण तरीही भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे सीईबीआरचे उपाध्यक्ष डग्लस मॅकविल्यम्स यांनी सांगितले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!