Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
‘पद्मावत’वर बहिष्कार टाका, नितीन पटेल यांचे आवाहन

व्हीएस न्यूज - पद्मावत चित्रपट प्रदर्शित करण्यास न्यायालयाने परवानगी दिली असली तरी संजय लीला भन्साळी यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. राजस्थानसह गुजरातमध्येही चित्रपटावरून वाद वाढताना दिसत आहे. मंगळवारी अहमदाबादमधील मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी राज्यात शांतता राखण्यासाठी लोकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे अपील केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद सहजासहजी संपणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पटेल म्हणाले की, गुजरात सरकारने राजपूत समाजातील लोकांच्या भावनांचा सन्मान करत चित्रपटावर बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यात चित्रपट दाखवण्यास सांगितले आणि त्यामुळे राज्यात तणाव आहे. राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर काही चित्रपटगृहांनीही स्वेच्छेने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लोकांना अपील करतो की, त्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकावा.

याचदरम्यान, करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेंद्रसिंह कालवी हेही गुजरातला आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी चित्रपट पाहायला जाणाऱ्यांनाही इशारा दिला. ज्यांना हा चित्रपट पाहायचा आहे, त्यांनी रिलिजच्या दहा दिवसानंतर इंटरनेटवर पाहावी, असा सल्लाही त्यांनी दिला. लोकांना आम्ही चित्रपटगृहात हा सिनेमा पाहू देणार नाही. मी सर्वज्ञंना २५ जानेवारीला सहकार्य करण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, अहमदाबादमधील सुमारे आठ मल्टिफ्लेक्सनी चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याचे म्हटले. हिंसेच्या भीतीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. आंदोलनकर्त्यांनी मॉल्समध्ये तर तोडफोड व जाळपोळ केलीच. शिवाय बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीही त्यांनी पेटवल्या होत्या.

...Read More

V. S. News
वाल्हेकरवाडी शिवनगरी, चिंचवडेनगरात रस्ते डांबरीकरणाला सुरुवात

व्हीएस न्यूज – चिंचवड- वाल्हेकरवाडी परिसरात प्रभाग क्रमांक १७ मधील शिवनगरी, चिंचवडे कॉलनी आदी ठिकाणी रस्ते डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपाचे नगरसेवक नामदेवराव ढाके यांच्या पाठपुराव्याने विकासकामांचा नारळ फोडून शुभारंभ झाला.

या प्रसंगी, ज्येष्ठ नागरिक ढोले काका, वसंत नारखेडे, कैलास रोटे, सचिन वाणी, सामाजिक कार्यकर्ता योगेश महाजन, महापालिका अधिकारी हुमेश मोने, श्री. शेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी, नगरसेवक नामदेवराव ढाके म्हणाले, गेल्या वर्षभरात प्रभागातील अनेक विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये, प्रभागातील नागरिकांसाठी जास्त दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी नवीन पाईप लाईन, ड्रेनेजची कामे तसेच प्रभाग स्वच्छता अभियान राबवून अनेक विकास कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. महापालिकेच्या सन २०१७-१८ या वर्षासाठी निधी मंजूर झाला असून त्या माध्यमातून कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
७ एप्रिल रोजी आयपीएलचा पहिला सामना मुंबईत

व्हीएस न्यूज - आयपीएल सिझन ११ ची सुरवात ६ एप्रिल रोजी होणार असून या सिझन मधला पहिला सामना मुंबईत ७ एप्रिलला होणार आहे. अंतिम सामना २७ मे रोजी मुंबईतच होणार असल्याचे एएनआय न्यूज ने आयपीएलचे प्रमुख अधिकारी राजीव शुक्ला याच्या हवाल्याने जाहीर केले आहे. यंदाच्या सिझन मध्ये ८ टीम सहभागी होत आहेत.

यंदा दोन वर्षांपूर्वी बंदी घातल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल स्पर्धेत सहभागी होणार आहेत तर गेल्या दोन सिझन मध्ये सहभागी असलेल्या गुजराथ लायन्स व रायझिंग पुणे सुपर जायंट्स या दोन टीम स्पर्धेत खेळणार नाहीत. आयपीएल साठी खेळाडूंचे लिलाव २७ व २८ जानेवारीला बंगलोर येथे होत आहेत. यात सहभागी असलेल्या ५७६ खेळाडूंपैकी ३६० भारतीय खेळाडू आहेत. आत्तापर्यंत झालेल्या १० सिझन मध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ३ वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

...Read More

V. S. News
प्रियांका चोप्रा जाहीर करणार ऑस्कर नामांकने

व्हीएस न्यूज - बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा यंदाच्या जगातील सर्वात प्रतिष्ठीत ऑस्कर अवार्ड साठीची नामांकने जाहीर करणार आहे. क्वांटिको टीव्ही सीरिअल मधून हॉलीवूड मध्ये आपली स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली आहे. ऑस्कर नामांकने जाहीर करण्याचा मान मिळवून तिने आपल्या यशात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्यासोबत रीझारियो, रेबेल विल्सन, मिशेल योह, मोशेल रोड्ग्रीग हेही नामांकने जाहीर करणार आहेत.

ऑस्कर चा ९० वा सोहळा ४ मार्च रोजी होणार असून त्यासाठीचे शुटींग पूर्ण झाले असल्याचे समजते. सध्या प्रियांका हॉलीवूड मधील तिचा दुसरा चित्रपट द कीड मन्स जेक च्या कलाकारांसोबत सुदान फिल्म फेस्टिव्हल मध्ये सहभागी झाली आहे. प्रियांकाने २०१६ साली सर्वप्रथम ऑस्कर अवार्ड कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

...Read More

V. S. News
मुस्लिम द्वेषातूनच ट्रिपल तलाक कायदा - ओवेसी

व्हीएस न्यूज - एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील आयोजित जाहीर सभेत बोलताना मुस्लिम द्वेषातून ट्रिपल तलाक हा कायदा तयार करण्यात आला असून मुस्लिमांचे या कायद्यामुळे शोषण होणार आहे आणि मुस्लिमांनी कायद्याविरोधात एकवटले पाहिजे. या कायद्याला आज जर विरोध केला नाही तर भविष्यात मुस्लिमांच्या शरियतवरही बंदी घातली जाऊ शकते,असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर ट्रिपल तलाक हा चुकीचा असून जो कुणी आपल्या पत्नीला ट्रिपल तलाक देईल त्याला समाजातून बहिष्कृत करा, असे आवाहन ओवैसी यांनी समाजबांधवांना केले.

असदुद्दीन ओवेसी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून औरंगाबादेत त्यांची पहिली जाहीर सभा पार पडली. आमदार इम्तियाज जलील, गफार कादरी यांच्यासह एमआयएम पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ओवेसी यावेळी बोलताना म्हणाले, की १४ टक्के मुस्लिम समाज आज देशात आहे. पण कधीच त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केल्या जात नाहीत. पण सध्या एका चित्रपटाला विरोध केला तर राजपूत समाजसाठी कमिटी बनवली जाते. चित्रपटाचे नाव बदलले जाते. तीनशे कट पाडले जातात. तो समाज फक्त चार टक्के आहे आणि मुस्लिम समाज हा १४ टक्के असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर देशात अनेक प्रश्न असताना सुद्धा चर्चा घडवून आणली. मीडिया ट्रायल घेतला गेला आणि ट्रिपल तलाक विरोधी पक्षपाती कायदा पास करून घेतला. फक्त मुस्लिम द्वेषातून हे सगळे सध्याचे सरकार करत आहे. मुस्लिमांनी याला एकत्र येऊन उत्तर दिले पाहिजे. पण आपल्यात काही सुधारणा मुस्लिमांनीही केल्या पाहिजेत. ट्रिपल तलाक देणे हे योग्य नसून जर कोणी ट्रिपल तलाक देत असेल तर त्या तलाक देणाऱ्याला समाजातून बहिष्कृत केले पाहिजे असेही ओवेसी यावेळी म्हणाले.

...Read More

V. S. News
पेट्रोल ८०, तर डिझेल ६७ रुपयांवर

व्हीएस न्यूज - मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. सोमवारी पेट्रोलने ८० रुपयांचा पल्ला पार केला असून डिझेलचे दरही ६७.१० रुपयांवर पोहोचले. गेल्या ५० दिवसांमध्ये पेट्रोलची सातत्याने दरवाढ झाली असून या काळात पेट्रोल १२.३९ रुपयांनी महागले. १ डिसेंबर २०१७ पासून सोमवापर्यंत दर दिवशी पेट्रोलच्या किमती काही पैशांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, डिझेलची ही गेल्या चार वर्षांमधील दुसरी उच्चतम किंमत असल्याचे वाहतूक क्षेत्रातून सांगण्यात आले.

ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्टच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष बाल मल्कीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तेल किमतीचे दर निश्चित करण्याचे अधिकार उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. रोजच्या रोज वाढणाऱ्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची कोणतीही व्यवस्था सरकारकडे सद्यस्थितीत अस्तित्वात नाही. केंद्राचा अबकारी कर आणि विविध राज्यांकडून आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमुळे या किमती वाढत आहेत.

संघटनेच्या वतीने रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा, पेट्रोल आणि डिझेलाही वस्तू सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे आणि सध्या केलेली दरवाढ विशेषत: डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशा प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो, असा दावाही मालवाहतूकदारांकडून केला जात आहे.

...Read More

V. S. News
१२ वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास फाशी

चौफेर न्यूज - बलात्काराच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ आणि आरोपीची शिक्षा याबाबत हरयाणा सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

१२ वर्षे किंवा त्याहून लहान वयाच्या मुलीवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. अशाप्रकारे कठोर नियम झाल्याने लहान मुलींवरील बलात्काराचे प्रमाण कमी होईल, अशी सरकारला आशा आहे. यासंदर्भातील विधेयक लवकरच विधानसभेत सादर होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतेच दिले. आता मध्यप्रदेशमध्ये १२ वर्षाच्या आतील मुलीवर बलात्कार झाल्यास संबंधित गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, त्यापाठोपाठ आता हरयाणामध्येही अशाप्रकारची तरतूद होण्याची शक्यता आहे.

मागच्या काही दिवसांत हरयाणामध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. यामुळे खट्टर यांच्या सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीकाही होत आहे. तसेच लहान वयातील मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना जास्त असल्याने याविषयात कठोर कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे खट्टर म्हणाले. याशिवाय बलात्काराच्या घटनांचा लवकरात लवकर निकाल लागावा, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मागील वर्षी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या घटनांमधील २५ टक्के घटना या बनावट असल्याचेही खट्टर यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच माध्यमांनीही बलात्काराच्या बातम्या देताना विशेष काळजी घ्यावी,असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

खट्टर म्हणाले, सध्या बलात्काराच्या घटनांमध्ये ७५ टक्के गुन्हेगार हे संबंधित मुलगी किंवा महिला हिच्या नात्यातील असल्याचे समोर येते. त्यामुळे पोलिसांबरोबरच नागरिकांनीही अशा घटना घडू नयेत, याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. याशिवाय राज्यात सध्या प्रलंबित असलेल्या बलात्काराच्या घटनांचा तपास लवकरात लवकर लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. हरयाणामध्ये एका ११ वर्षाच्या आणि १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर खट्टर यांनी आपले म्हणणे स्पष्ट केले.

...Read More

V. S. News
एकत्रित सार्वत्रिक निवडणुका २०२४ पूर्वी अशक्य- कृष्णमूर्ती

व्हीएस न्यूज - एकाचवेळी विधानसभा व लोकसभा निवडणुका घेणे हे २०२४ पूर्वी शक्य होणार नाही, कारण त्यात घटनादुरूस्ती आधी करावी लागेल, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस.कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही निवडणुका दर पाच वर्षांनी एकाच वेळी घेणे ही खरेतर आदर्श पद्धत असेल, असे सांगून ते म्हणाले की, तसे लगेच करता येणे शक्य नाही कारण त्यासाठी आधी घटनादुरूस्ती करावी लागेल. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या मांडलेल्या प्रस्तावावर छेडले असता त्यांनी हे उत्तर दिले.

ते म्हणाले की, आपण वेस्टमिनिस्टर पद्धत वापरतो. जर आपण अमेरिकी पद्धत वापरत असतो तर त्यात कार्यकारी मंडळाची ठरावीक मुदत असते. जरी कुणी सत्ताभ्रष्ट झाले तरी दुसऱ्या कुणाची तरी निवड केली जाते, तोपर्यंत आधीचे सरकार कायम राहते. समांतर निवडणुकांना दुसरा पर्याय म्हणजे सर्व निवडणुका एका वर्षांच्या ठरावीक कालावधीत घेणे हा आहे. संसदीय समितीने हा पर्याय सुचवला असून त्यावर अजून अभ्यास करावा लागेल. त्याच्या अंमलबजावणीसाठीही घटनादुरूस्ती करावी लागेल.

प्रशासकीय पातळीवर व पैसे वाचवण्यासाठी एकाचवेळी निवडणुका घेणे हा सोयीचा उपाय आहे. त्यामुळे व्यक्तिगत टीका टिपणी, विखारी प्रचार,सूडाचे राजकारण हे प्रकार नेहमीच चालतात, ते बंद होतील असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही कारण काही राज्यातील सरकारांची पाच वर्षांची मुदत ही आताच सुरू झाली आहे. काही राज्यात निवडणुका अपेक्षित आहेत. २०२४ मध्ये एकाचवेळी निवडणुका घेता येणे शक्य आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकाच मतदार यादीवर घेण्याच्या पंतप्रधानांच्या सूचनेवर त्यांनी, निवडणूक आयोगाने हीच भूमिका वेळोवेळी मांडली आहे. पण एकच मतदार यादी वापरण्याच्या प्रयोगातही राज्यांच्या निवडणूक कायद्यात बदल करावा लागेल.

...Read More

V. S. News
देशभरात ११ हजार रेल्वे, ८५०० स्थानकांमध्ये सीसीटीव्ही

व्हीएस न्यूज - प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी रेल्वेकडून देशातील सर्व ८५०० स्थानकांवर आणि ११ हजार रेल्वेंमध्ये १२ लाख सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी २०१८-१९च्या अर्थसंकल्पामध्ये साधारण ३००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

सध्या देशातील ३९५ स्थानके आणि ५० रेल्वेवर सीसीटीव्ही बसवलेले आहेत ही सुविधा सर्व स्थानके आणि रेल्वेवर विस्तारित करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत राजधानी, शताब्दी, दुरंतो, लोकल पॅसेंजर तसेच उपनगरीय रेल्वे आदी सर्व रेल्वेंमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना आहे. त्यानुसार रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. त्यात दरवाजे, मार्गिका, प्रवाशांची आसने असलेले कक्ष आदी ठिकाणांचा समावेश असेल. या कॅमेऱ्यांचा खर्च भागवण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात सुमारे ३००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. याशिवाय अन्य मार्गही शोधले जात आहेत. तसेच निधीची कमतरता भासल्यास खुल्या बाजारातूनही भांडवल उभे केले जाईल. गेल्या काही दिवसांत रुळांवरून रेल्वे घसरण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. असे प्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या जात आहेत.

सुरक्षारक्षक नसलेल्या ४९४३ रेल्वे क्रॉसिंगवर रक्षकांची सोय करणे किंवा अन्य मार्ग उपलब्ध करून देणे, जुने रूळ बदलणे, सध्याच्या रुळांना मजबुती प्रदान करणे अशा उपायांचा विचार केला जात आहे. २०२० सालापर्यंत अशी सर्व ठिकाणे सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.

...Read More

V. S. News
परदेशी गुंतवणुक आकर्षणात भारत पाचव्या स्थानी

व्हीएस न्यूज - भारतातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंचा एक अहवाल समोर आला आहे. जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार करण्यात आली असून या यादीत भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारताने जपानला मागे टाकले असून या यादीत अमेरिकेने पहिले स्थान पटकावले आहे.

‘प्राईसवॉटर हाऊस कुपर्स’ या संस्थेने एक अहवाल तयार केला असून जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जगातील परदेशी गुंतवणुकासाठी फेव्हरेट डेस्टिनेशन कोणते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत गुंतवणुकीसाठी पुरेशा संधी आहेत, असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी अनेक सीईओंनी पसंती दर्शवली आहे. चीन या यादीत दुसऱ्या स्थानी असून जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानी आहे. या यादीत भारताने जपानला मागे टाकले आहे. भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत उद्योगस्नेही देश असल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही मोदींकडून ‘मेक इन इंडिया’चा प्रसार केला जाणार आहे. मोदी या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणार आहेत. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर या काहीसे अयशस्वी मानले जाणाऱ्या पावलांचे समर्थन ते यावेळी करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा अहवाल समोर आला आहे.

नाणेनिधीकडूनही दिलासा….

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) खूशखबर दिली असून या वर्षी म्हणजे सन २०१८-१९ मध्ये भारताचा विकासदर ७.४ टक्के राहील, असे भाकीत या वित्तीय संस्थेने केले आहे. त्या तुलनेत चीनच्या अर्थव्यवस्थेची गती ६.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करप्रणालीची अंमलबजावणी या दोन प्रमुख कारणांमुळे विकासदर तुलनेत कमी होऊन ६.७ टक्क्यांवर आला होता. २०१९-२० मध्ये विकासाचा वेग ७.८ टक्क्यांच्या आसपास राहील.

...Read More

V. S. News
यंदा ‘शिवराज्याभिषेक सोहळया’वर आधारित चित्ररथ राजपथावर

व्हीएस न्यूज - यावर्षी ६९ व्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळया’वर आधारित चित्ररथ सज्ज झाला असून चित्ररथात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी कसून सराव केला असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.

राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्रासह १४ राज्यांचे आणि ९ केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण २३ चित्ररथ सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरवर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला बहुतांश वेळा प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. यावर्षी हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळया’वर आधारित चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होत आहे.

जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती तयार केली आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४० कारागीरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे. चित्ररथाच्या प्रारंभी किल्याची प्रतिकृती असून यावर मधोमध अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी दोन मोठ्या तोफा आणि ध्वज, तुतारी-भालेधारी मावळे यांच्या प्रतिकृती दर्शविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या मध्यभागी रायगडाची प्रतिकृती दर्शविण्यात आली असून याठिकाणी सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आभूषण देणारा दरबारी आणि त्याच्या शेजारी पुरोहीत गागाभट्ट उभे आहेत. या दरबारात इंग्रज अधिकारी सर हेन्‍री ऑक्सिडन दिसत आहेत. तसेच, न्यायाचा तराजू व त्या भोवती विविध फिरत्या प्रतिकृती आहेत. त्याच्या शेजारी ध्वजधारी, अश्वारूढ मावळ्यांच्या प्रतिकृती दर्शविण्यात आल्या आहेत. दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजेही दर्शविण्यात आलेले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस राजमुद्रा तसचे शिवराई व होण ही नाणी प्रतिकृती रूपात दर्शविण्यात आल्या आहेत.

...Read More

V. S. News
चंद्रकांत पाटलांनी गायले कर्नाटकचे गोडवे; राजीनाम्याची मागणी

व्हीएस न्यूज - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने टीका होते आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर जन्मावे तर कर्नाटकमध्येच हे कन्नड अभिमान गीत गायल्याने सोशल मीडियाबरोबरचं राजकीय नेत्यांकडूनही टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टि्वट करून संताप व्यक्त केला आहे. मराठी भाषिकांना कर्नाटकात वाईट वागणूक मिळते. पाटील यांना हे माहीत असतानाही बेळगावातील एका कार्यक्रमात कन्नड गीत गाणे अयोग्य आहे. त्यांच्या वागण्याचा धिक्कार असून त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. परराज्यात आपल्या मंत्र्याने जरूर जावे, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता जपावी, असा टोलाही पवार यांनी लगावला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. मराठी माणसाच्या पाठीत चंद्रकांत पाटलांनी खंजीर खुपसला, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली. महाराष्ट्रात भाजपचे गुजराती प्रेम ज्ञात होते, पण आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!