Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
मुंबईतील सरकारी रुग्णालयातील उपचार महागणार!

व्हिएस न्यूज - एकीकडे सामान्यांपासून गरीब नागरिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयातील अवाढव्य बिलामुळे सरकारी रुग्णालयांना प्राधान्य देतात. पण आता शुल्क आणि तपासणीच्या रकमेत सरकारी रुग्णालयेही वाढ करणार आहेत.

जेजे, सेंट जॉर्ज, जीटी कामा या रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. शुल्क वाढवण्याचा निर्णय महागाईमुळे घेण्यात आला असून १ जानेवारी २०१८पासून नवे दर लागू होणार आहेत. ब्रेन, इन्प्लांट, लॅप्रोस्कोपी यांसारख्या ३२ प्रकारच्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचे शुल्क १४० रुपयांनी वाढवून २५० रुपये करण्यात आले आहे. केस पेपरच्या शुल्कासह उपचारांशी संबंधित सुमारे १००० सेवा महाग होणार आहेत. या दरम्यान शवविच्छेदनाच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर तपासणी, शस्त्रक्रिया आणि प्रमाणपत्राच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
...Read More

V. S. News
२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद!

व्हिएस न्यूज– मोठ्या प्रमाणात २ हजार रुपयांच्या नोटा छापणे भारतीय रिझर्व्ह बँकेने बंद केले असल्याचे भारतीय स्टेट बँकेच्या इकोफ्लॅश अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत एसबीआयने बनवलेल्या अहवालानुसार आर्थिक व्यवहारात २ हजार रुपयांची नोट ही देव-घेव करताना अडचणीचे ठरते. आरबीआयने त्यामुळे या नोटांचे प्रमाण कमी केले असावे किंवा ही नोटच बंद केली असावी, असे एसबीआयच्या अहवालात नमूद केले आहे. या २ हजार रुपयांच्या नोटा नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर चलनात रोकड उपलब्ध करताना मोठ्या प्रमाणात छापण्यात आल्या होत्या.

बाजारात उपलब्ध असलेल्या कमी मूल्यांच्या नोटा या केवळ ३५ टक्क्यापर्यंत पोहोचल्या असल्याचे एसबीआय समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांति घोष यांनी म्हटले आहे. ८ डिसेंबर २०१७ पर्यंत रिझर्व्ह बँकेने १५,७८,७०० कोटी रुपये मूल्य असलेल्या मोठ्या नोटांची छपाई केली आहे. यात आरबीआयने अद्याप २,४६,३०० कोटी रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारात आणलेल्या नाहीत. तसेच २,४६३ अब्ज रुपये मुल्यांच्या २ हजार रुपयाच्या नोटा बाजारात उपलब्ध करण्याऐवजी ५० आणि २०० रुपयाच्या छोट्या चलनी नोटा आरबीआयकडून जारी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सरकारने रदद् केलेल्या ५०० रुपये व हजार रुपयांच्या रद्द केलेल्या नोटा बाजारात ८६ ते ८७ टक्के चलनात होत्या.
...Read More

V. S. News
सहा महिन्यांत महाराष्ट्रातील 2965 मुली बेपत्ता

व्हिएस न्यूज - यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात दररोज सरासरी 16 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. जानेवारीपासून महाराष्ट्रात 2965 मुली बेपत्ता झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनीविधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. राज्यात 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान 2965 मुली नाहिशा झाल्या. गेल्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये 2,881 मुली नाहिशा झाल्या होत्या, असे ते म्हणाले.

स्वतः गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या संदर्भात कोणत्याही विशिष्ट टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र 12 पोलिस विभागांना अशा प्रकारांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बेपत्ता मुलांचा माग काढण्यासाठी केंद्र सरकारने www.trackthemissingchild.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे, तसेच रेल्वेनेही www.shodh.gov.in हे पोर्टल अद्ययावत केले आहे. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी या संकेतस्थळांची मोठी मदत होत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकारने ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन स्माईल यांसारख्या चार विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 30 जून 2016 1,613 मुलींना शोधण्यात मदत झाली आहे. त्याचप्रमाणे यावर्षी 645 मुलींना शोधण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
अक्षयच्या ‘टॉयलेट’वर बिल गेट्स यांची स्तुतीसुमने !

व्हिएस न्यूज - यंदा अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचा संदेश देणारा चित्रपट म्हणून चांगलाच गाजला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचे कौतुक केले होते.

आता तर अक्षयच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’वर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही स्तुतीसुमने उधळली आहेत. २०१७चे विश्लेषण करताना बिल गेट्स यांनी अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा उल्लेख करत, या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

या वर्षभरात आपण कोणत्या गोष्टींमुळे प्रभावित झालो, याची माहिती बिल गेट्स यांनी ट्वीट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा उल्लेख करत, चित्रपटाचे कौतुक केले. २०१७ हे वर्ष खडतर होते, यात शंका नाही. पण या वर्षानेही काही आशा आणि प्रगतीचे अद्भुत क्षण दिले. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा बॉलिवूडचा चित्रपट, नवविवाहित दाम्पत्याची प्रेमकहाणी आहे. स्वच्छतेबाबत या चित्रपटातून जनजागृती करण्यात आली असल्याचे ट्विट असं बिल गेट्स यांनी केले आहे.
...Read More

V. S. News
व्होडाफोनने आणला १५९० रुपयात स्मार्टफोन

व्हिएस न्यूज - दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन आणि आयटेल या दोन कंपन्यानी एकत्र येत नवा ४जी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणला आहेत. या स्मार्टफोनचे ‘A२०’ असे नाव असून, जिओ फोन आणि एअरटेल इंटेक्स अॅक्वा लायन्स N1 या स्मार्टफोनच्या किंमतींएवढी याची किंमत आहे.

या स्मार्टफोनचे फीचर्सही आकर्षक असून एक जीबी रॅम आणि 4 इंचाचा WVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. ३६९० रुपये ऐवढी ‘A२०’ स्मार्टफोनची मूळ किंमत असून ही पूर्ण किंमत मोबाईल खरेदी करण्यावेळी द्यावी लागेल. मात्र यावर २१०० रुपयांचे कॅशबॅक आहे. पण मोबाईल खरेदी केल्याच्या १८ महिन्यांच्या अंतराने कॅशबॅकची रक्कम मिळेल. म्हणजेच १८ महिन्यांनी ९०० रुपये, त्यानंतरच्या १८ महिन्यांनी १२०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला १५९० रुपयांना पडतो.

प्रत्येक महिन्याला या स्मार्टफोनसाठी १५० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. ३६ महिने हे रिचार्ज करावे लागेल. ज्यांना शक्य आहे, ते ३६ महिन्यांचे रिचार्ज आधीच एकत्रित करु शकतात. म्हणजे एकत्रित रिचार्ज केल्यास ५४०० रुपये भरावे लागतील. ३१ मार्च २०१८ पर्यंत या स्मार्टफोनसाठीच्या या सर्व ऑफर उपलब्ध असतील.
...Read More

V. S. News
राजकारणातून निवृत्त होऊन मोदींनी हिमालयात जाऊन ध्यान करावे – मेवानी

व्हिएस न्यूज – गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपकडून विजयोत्सव साजरा केला जात असताना गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार आणि तरुण दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हातारे झाले आहेत. ते लोकांना आपले जुने कंटाळवाणे भाषण सतत ऐकवत आहेत. त्यांनी राजकारणातून आता ब्रेक घ्यायला हवा, निवृत्त व्हायला हवे. मोदींनी हिमालयात जाऊन ध्यान करावे, असा वादग्रस्त सल्ला दिला आहे.

गुजरातचा निकाल हा आमच्या आंदोलनाचा विजय असून आम्ही यापुढे विधानसभा आणि रस्त्यावर आमच्या आंदोलनावर आणखी जोर देणार आहोत तसेच भाजपची सत्ता २०१९मध्ये हटवणार आहोत. आता आमच्यासारख्या दलित, आंदोलनातून निघालेल्या तरुणांची गरज देशाला आहे. आता लोकांच्या लक्षात देशाला तोडणारे राजकारण यायला लागले आहे.

त्याचबरोबर १५० जागांचा दावा करणाऱ्या मोदी आणि शहांचा अहंकाराचा फुगा फुटला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१९ मध्ये हीच परिस्थिती पुन्हा पाहायला मिळेल असा दावाही मेवानी यांनी केला आहे.

गुजरातमधील उना येथे दलितांवर झालेल्या अत्याचारानंतर तीव्र आंदोलनातून जिग्नेश मेवानी हा तरुण दलित नेता उदयास आला. एका मुलाखतीदरम्यान जिग्नेश यांनी मोदी-शहा यांच्यावर कडाडून टीका केली. मेवानी पुढे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.
...Read More

V. S. News
सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर न्या. कर्णन यांची सुटका

व्हिएस न्यूज – कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एस. कर्णन यांनी न्यायालयाचा अवमानना केल्याप्रकरणी सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. २० जून रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती जे. एस. केहर आणि इतर न्यायाधीशांवर न्या. कर्णन यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी यासाठी सीबीआय चौकशीचे निर्देशही दिले होते. दरम्यान केहर यांनी हे आरोप म्हणजे न्यायालयाचा अवमानना असल्याचे म्हटले होते. त्यानंतर कर्णन यांच्याविरोधात चौकशीचे आदेश ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिले होते.

या खंडपीठाचे न्या. कर्णन यांना निवृत्तीनंतर तुरूंगात पाठवावे का यावर एकमत झाले नव्हते. एक न्यायाधीश तुरूंगात जाणे म्हणजे न्याय व्यवस्थेवर हा कलंक असल्याचे मानले जाईल, असे काहींचे मत बनले होते. परंतु, नंतर खंडपीठाने सर्व शक्यता फेटाळून अवमानना कोण केली आहे फरक पडत नसल्याचे मत व्यक्त केले होते. न्या. कर्णन यांनी यापूर्वी भारताचे तत्कालीन मुख्य न्यायमुर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर ७ न्यायाधीशांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.
...Read More

V. S. News
प्रद्युम्न हत्याकांडातील आरोपीवर सज्ञानाप्रमाणे खटल

व्हीएस न्यूज - प्रद्युम्न हत्याकांडातील आरोपी विद्यार्थ्याला सज्ञान धरले जाणार असून त्याप्रमाणेच त्याच्यावर खटला चालणार आहे. बाल हक्क न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.

गुरुग्राममधील प्रसिद्ध रायन इंटरनॅशनल शाळेतील ५ वर्षीय प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता या विद्यार्थ्याला सज्ञान समजून त्याप्रमाणे त्याच्यावर खटला चालवण्यात यावा, अशी मागणी याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयने याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीवर सज्ञानाप्रमाणे गुन्हा चालवण्यात अनुमती दिली.

प्रद्युम्न ठाकूर या मुलाच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आधी शाळेचा बसचा कंडक्टर अशोकला अटक करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती गेल्यानंतर तपासाला नवं वळण मिळालं. ही हत्या अशोकने नव्हे तर अकरावीतील १६ वर्षीय विद्यार्थ्याने केल्याचे समोर आले. त्यानंतर या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. याच महिन्यात १५ तारखेला कोर्टाने या विद्यार्थ्याचा जामीन अर्जही फेटाळून लावला. या हत्येवरून देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे कोर्टाने हा अर्ज फेटाळताना नमूद केले होते.
...Read More

V. S. News
ओखी वादळामुळे नुकसान बाधितांना भरीव मदत: चंद्रकांत पाटील

व्हीएस न्यूज - ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमार, शेतकरी आणि फळबागायतदारांना राज्य सरकारने आज भरीव मदत जाहीर केली. या वादळात नुकसान झालेल्या बहुवार्षिक फळबागांसाठी प्रतिहेक्टर 18 हजार रुपये , फळबागांसाठी साडेतेरा हजार रुपये प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टर सहा हजार आठशे रुपये मदत देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषेत केली.


त्याचप्रमाणे अंशतः नुकसान झालेल्या बोटींसाठी 4 हजार शंभर तर पूर्णपणे नुकसान झालेल्या बोटींसाठी 9 हजार 600 रुपये तसंच अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी 2 हजार 100 तर पूर्णपणे नुकसान झालेल्या जाळ्यांसाठी 2 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली .ही सगळी मदत पूर्णपणे राज्याच्या तिजोरीतून दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईसह संपूर्ण कोकणात किनारपट्टी, मच्छिमार आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत सरकारी व्यवस्था मुजोरपणे काम करत आहे असा आरोप तटकरे यांनी या चर्चेत बोलताना केला. राज्यातील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्डयांसाठी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या संवेदनशील महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोकणाला खड्डयात घालण्याचे काम करु नये ते पाप घेवू नका असा सल्ला सुनिल तटकरे यांनी दिला. आज ओखी वादळामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार सुनिल तटकरे यांनी सरकारला धारेवर धरले. कोकणावर अन्याय करणाऱ्या सरकारचा सुनिल तटकरे यांनी धिक्कार करत निषेधही केला.

निसर्गातील बदलामुळे कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीकडे सरकारने लक्ष दिले नाही. झालेल्या नुकसानीचे पंचनामेही साधे घालण्यात आले नाहीत. सरकारच्या या असंवेदनशीलतेबाबत मी सभागृहामध्ये चर्चेच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करत आहे. सरकारला ओखी वादळ येणार याचा अंदाज मिळाला होता परंतु हे सरकार ओखी वादळ येईपर्यंत ढिम्मपणे पहात राहिले. मच्छीमारांच्या बोटींना फक्त लाल बावटे दाखवण्यापलीकडे सरकारने काही केले नाही असा आरोप तटकरे यांनी केला.

ओखी वादळ येणार हे माहित असूनही कोकणातील महसुल यंत्रणा आणि त्याची व्यवस्था पाहणारे जिल्हाधिकारी काय करत होते असा सवाल सुनिल तटकरे यांनी करत सरकारचे वाभाडे काढले.

चंद्रकांत पाटील यांनी तटकरे यांचे सगळे आरोप फेटाळून लावत सात डिसेंबरलाच पंचनामे करण्याचं काम सुरू आहे असं सांगितलं, मात्र ज्या ठिकाणी पंचनामे सुरू नाहीत असं आढळलं तर संबंधित अधिकार्यांना कडक सूचना दिल्या जातील असा सांगत महसूल मंत्र्यानी सभागृहाला आश्वस्त केलं.

ओखी वादळाबाबत पूर्वकल्पना असूनही सरकारने आवश्यक ती खबरदारी घेतली नाही अशी टीका करून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचं सांगत विरोधकांनी नाराजी आणि असमाधान व्यक्त केले
...Read More

V. S. News
आता ट्वेन्टी-२० मालिकेची रंगत

व्हीएस न्यूज - कसोटी आणि त्यापाठोपाठ एकदिवसीय मालिका झाली. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यांची रंगत क्रिकेटविश्वाला पाहता येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी होणार आहे. त्यामुळे या मालिकेचा विजयी श्रीगणेशा कोणता संघ करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताने कसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकली. कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व विराट कोहलीकडे होते. त्यानंतर लग्नासाठी कोहलीने सुट्टी घेतली आणि रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली. रोहितने एकदिवसीय मालिका जिंकवून देत, संघाचे नेतृत्व कोणाकडेही असले तरी हा संघ जिंकू शकतो, हे एकदिवसीय मालिकेत दाखवून दिले. आता ट्वेन्टी-२० मालिका तो संघाला जिंकवून देऊ शकतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला होता; पण दुसऱ्या सामन्यात रोहितच्या द्विशतकाच्या रूपात संघाला संजीवनी मिळाली. दुसरा आणि तिसरा सामना जिंकत भारताने मालिका सहजपणे खिशात टाकली. ट्वेन्टी-२० संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा आहे, त्यामुळे या युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला रोहित कसा न्याय देतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल. रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहे. श्रेयस अय्यरनेही एकदिवसीय मालिकेत चांगली फलंदाजी केली होती. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनी अडचणीतून संघाला बाहेर काढण्यात सराईत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये हार्दिक पंडय़ाला सूर गवसलेला नाही आणि संघासाठी ही चिंतेची आहे. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोन्ही युवा फिरकीपटू सातत्याने भेदक गोलंदाजी करत आहेत. युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेरच्या षटकांमध्ये प्रतिस्पध्र्याच्या धावा रोखण्याचे काम चोख बजावत आहे; पण या सामन्यात त्याला कोण साथ देणार,याची उत्सुकता साऱ्यांना असेल. कारण मोहम्मद सिराज, बासिल थम्पी आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी एकाला बुमराहबरोबर गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदर या युवा अष्टपैलू खेळाडूला या मालिकेत तरी संधी मिळते का हे पाहावे लागेल.

श्रीलंकेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव पाहायला मिळाला आहे. कसोटी मालिकेच्या अखेरीस त्यांना सूर गवसला होता. त्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी विजय मिळवला खरा, पण त्यानंतर पुन्हा एकदा ते पराभवाच्या दुष्टचक्रात अडकले. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी श्रीलंकेचा संघ आसुसलेला असेल. उपल थरंगा हा सातत्याने चांगल्या धावा करत आहे, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळताना दिसत नाही. अँजेलो मॅथ्यूजसारख्या अनुभवी खेळाडूला कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. कर्णधार थिसारा परेराला अपेक्षापूर्ती करता आलेली नाही; पण संघाने एकजूट केल्यास त्यांच्यामध्ये भारताला पराभूत करण्याची धमक आहे. ट्वेन्टी-२० संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूने किमान २० ते ३० आयपीएल सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पदार्पणाचे दडपण नाही. चांगली कामगिरी उंचावण्यासाठी आयपीएलमधील अनुभव मोलाचा ठरेल. युवा क्रिकेटपटूंना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. त्यामुळे ते सवरेत्कृष्ट कामगिरी करताना संधीचे सोने करतील. भारताच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असल्याचे म्हटले जात असले, तरी त्यांची कामगिरी नक्कीच उजवी ठरेल.

दिनेश कार्तिक, भारताचा क्रिकेटपटू

वनडे मालिकेत आम्हाला पराभव पाहावा लागला. मात्र पहिल्या लढतीतील विजयामधून बोध घेणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक मालिका वेगवेगळी असते. एकदिवसीय प्रकारातून ट्वेन्टी-२० प्रकाराशी जुळवून घेण्याचे आव्हान आहे. मात्र ट्वेन्टी-२० मालिकेत आम्ही नव्याने सुरुवात करू. त्यामुळे या मालिकेत भारताला आम्ही चांगली लढत देण्यासाठी उत्सुक आहोत.

थिसारा परेरा, श्रीलंकेचा कर्णधार

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी, जयदेव उनाडकट.

श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल परेरा, दनुष्का गुणतिलका, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रमा, दासून शनाका, चतुरंगा डीसिल्व्हा, सचिथ पथिराना, धनंजय डीसिल्व्हा, नुवान प्रदीप, विश्वा फर्नाडो, दुष्मंथा चमीरा.

वेळ : सायंकाळी ७.०० वा.पासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.

...Read More

V. S. News
जगातील स्थलांतरितांत भारताचा पहिला क्रमांक

व्हीएस न्यूज - परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण १.७ कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत. त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.

मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन या देशांचे लोक त्या खालोखाल मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत. त्यांची संख्या ०.६ ते १.१ कोटी आहे, असे २०१७ च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल मेक्सिकोचे १.३ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहात आहेत.

रशियाचे १.१ कोटी, चीनचे १ कोटी, बांगलादेशचे ०.७ कोटी, सीरियाचे ०.७ कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी ०.६ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत. भारताचे ३० लाख नागरिक संयुक्त अरब अमिरातीत तर प्रत्येकी ०.२ कोटी नागरिक अमेरिका व सौदी अरेबियात आहेत. सध्या जगात २.५८ कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण इ.स. २००० पासून ४९ टक्के वाढले आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा चिंतेचा विषय असून, २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमात त्याचा समावेश आहे. विश्वासार्ह माहिती व पुराव्यांच्या आधारेच स्थलांतराबाबतचे गरसमज दूर करून स्थलांतर धोरणे ठरवणे गरजेचे आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक उपमहासचिव लिउ झेनमिन यांनी सांगितले. स्थलांतरामुळे काही देशांत लोकसंख्या वाढली असून, तेथे लोकसंख्या कमी असण्याचा कल बदलला आहे, २००० ते २०१५ दरम्यान उत्तर अमेरिकेत लोकसंख्यावाढीचा दर ४२ टक्के होता, तर ओशियानात तो ३१ टक्के होता. युरोपात २००० ते २०१५ दरम्यान स्थलांतराअभावी लोकसंख्या कमी झाली आहे.

...Read More

V. S. News
एकनाथराव खडसेंना भाजपकडून नोटीस

व्हीएस न्यूज - आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एकनाथ खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये सामावून घेतेल जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंचे पुनवर्सन करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाला बगल दिली.

गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेतून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपूरच्या हेडगेवार स्मृतीमंदिरात बुधवारी अधिवेशनापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री या ठिकाणी आले होते. मात्र, एकनाथ खडसे आणि विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनी बौद्धिक वर्गाला दांडी मारली. या दोघांसह आणखी काही आमदार या बौद्धिकाला गैरहजर असल्याचे समजते. या सर्वांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्यावतीने देण्यात आली.

नागपूर अधिवेशनात दरवर्षी भाजपच्या आमदारांसाठी संघ मुख्यालयात बौद्धिकाचं आयोजन केलं जातं. आजही या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी खडसे आणि देशमुख यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एकनाथ खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये सामावून घेतेल जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंचे पुनवर्सन करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाला बगल दिली. त्यांनी म्हटले की, पुनवर्सन हे विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नाही. एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याविषयी सकारात्मक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपच्या आयाराम संस्कृतीला गळती लागणार!

तर दुसरीकडे आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ७ पानांचे पत्र लिहले होते. या पत्रामध्ये त्यांनी राज्यातील भाजप सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. या पत्रामध्ये त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. विदर्भ स्वतंत्र झाला नाही तर राजीनामा देईन, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी आजच्या बौद्धिक वर्गाला दांडी मारल्याची चर्चा आहे. दरम्यान, आजच्या बौद्धिकाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे देखील उपस्थित नव्हते. तब्येतीचं आणि निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण देऊन बहुतेक आमदारांनी बौद्धिकाला दांडी मारली असली तरी त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावून जाब विचारण्यात येणार आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!