व्हीएस न्यूज - देशातील सर्वात मोठा तुरुंग अशी ख्याती असलेल्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात २८ जानेवारी रोजी कैदी आणि त्यांचे कुटुंबीय याच्या मध्ये फुटबॉल चा सामना होणार आहे. देशात या प्रकारचा प्रयोग प्रथमच केला जात असून कैदी व त्यांचे कुटुंबीय यांना तुरुंगातच सामन्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी कोच नेमला गेला आहे.
तुरुंगाचे अतिरिक्त महानिरीक्षक राजकुमार या संदर्भात म्हणाले जेल मध्ये शिक्षा भोगत असताना कैद्याच्या मनावरही ताण येत असतो. तो दूर करणे हा या मागचा उद्देश आहे. कैदी आपली मुले, वडील, भाऊ यांच्यासोबत सामना खेळतील. त्यासाठी ज्या कैद्यांच्या कुटुंबीयांनी तयारी दाखविली त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक जेल मधील कैद्यांनाहि संधी दिली जाणार आहे. हा सद्भावना सामना आहे व दिल्ली सॉकर असोसीएशन त्यासाठी रात्रंदिवस तयारी करत आहे. हा सामना प्रोफेशनल पातळीवर खेळविला जाणार आहे.
व्हीएस न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणीदरम्यान आरक्षणासंदर्भात व्यक्तीच्या जातीत बदलत करता येत नाही तसेच ती विवाहानंतरही बदलू शकत नसल्याचे मत नोंदवले आहे. २१ वर्षांपूर्वी केंद्रीय विद्यालयात मागासवर्गीय कोट्यातून सवर्ण समाजातील एक महिला शिक्षिका म्हणू रुजू झाली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची ही नियुक्ती रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर तिने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. वरिष्ठ न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीदरम्यान हे मत नोंदवले आहे. ही सुनावणी न्या. अरुण मिश्रा आणि एम. एम. शंतनागौदर यांच्या खंडपीठासमोर झाली. संबंधित महिला ही अगरवाल कुटुंबात जन्मली असून ही जात सर्वसाधारण प्रवर्गात मोडते. पण तिचा पती हा मागासवर्गीय समाजातील असल्याने तिला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कसे काय मिळू शकते, हे बेकायदा असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
वीस वर्षांच्या सेवेनंतर सध्या उपप्राचार्य पदावर या प्रकरणातील शिक्षिका कार्यरत होती. पण ही शिक्षिका कथित उच्च जातीत जन्मलेली असताना मागासवर्गीय व्यक्तीबरोबर तिने लग्न केल्यानंतर तिची जात बदलू शकत नसल्यामुळे तिला आरक्षणाचे फायदे घेता येणार नाहीत, अशी तक्रार तिच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
व्हीएस न्यूज – मोठ्या प्रमाणात अनेक संघटनांनी जिल्ह्यात ‘पद्मावत’ या चित्रपटाला विरोध दर्शवला असून हा चित्रपट नंदुरबार शहरातील चित्रपटगृहात प्रदर्शित केल्यास कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास चित्रपटगृह मालक जबाबदार राहणार, अशा आशयाचे नोटीस नंदुरबार शहर पोलिसांनी चित्रपटगृह मालकांना दिल्या आहेत. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मथुरे यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या २५ जानेवारीला देशभरात संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्मावत ही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही संघटनांचा चित्रपटाला प्रखर विरोध आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या पाच दुरुस्त्या करुन अखेर मोकळा झाला आहे.
वास्तविक पाहता सेन्सॉरने परवानगी दिल्यानंतर हा चित्रपट ज्या चित्रपटगृहात दाखवला जाणार चित्रपटगृहात आणि तेथे येणाऱ्या प्रेक्षकांना संरक्षण देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. चित्रपट प्रदर्शित केल्यास काही अनुचित घडले अन् कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास चित्रपटगृह मालक जबाबदार राहणार, अशा आशयांच्या नोटीस देऊन पोलीस जबाबदारीतून हात झटकू शकत नाहीत, अशी चर्चा सध्या नागरिकांत होत आहे.
व्हीएस न्यूज - ‘मी निर्दोष आहे. मला पोलिसांनी या गुन्ह्यात गोवले आहे.वाटल्यास मला फाशी द्या, पण तडफडत ठेवू नका…’ सोनई हत्याकांडातील दोषी संदीप कुऱ्हेने न्यायालयात मांडलेली त्याची बाजू. तर दोषींन कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती दोषींच्या वकिलांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील जिल्हा सत्रन्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. या प्रकरणात सहा दोषी असून दोषींच्या वतीने तीन वकिल होते. यातील दोन वकिल गुरुवारी न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. बचावपक्षांच्या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने वकिल अनुपस्थित असल्याने संदीप कुऱ्हेलाच स्वतःची बाजू मांडण्यास सांगितले.
संदीप कुऱ्हे म्हणाला, मी निर्दोष आहे. मला या गुन्ह्यात अडकवण्यात आले. वाटल्यास मला फाशी द्या, पण तडफडत ठेवू नका. जी शिक्षा आहे ती देऊन टाका. पोलिसांनी मला चुकीच्या गुन्ह्यात फसवले. जवळपास अर्धा तास हा युक्तिवाद झाला. सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सर्वांनी मिळून कट रचला आणि इतके क्रूरपणे हत्या केली. या भयानक क्रौर्यात सर्वांचा सहभाग होता. त्यामुळे सर्वांना एकसारखीच शिक्षा द्यावी, असे निकम यांनी सांगितले.
घटनाक्रम….
* १ जानेवारी २०१३ च्या सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान
* सातही आरोपी अटक केल्यापासून कारागृहातच, त्यांचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाने वेळोवेळी फेटाळला.
* प्रथम तपास सोनईचे सहायक निरीक्षक पाटील यांच्याकडे, आरोप झाल्याने नंतर श्रीरामपूरचे उपअधीक्षक गांगर्डे यांच्याकडे, एक महिन्याने सीआयडीचे उपअधीक्षक एस. डी. बांगर, उपनिरीक्षक रऊफ शेख, खलिल शेख व रमेश कालंगडे यांच्या पथकाकडे वर्ग.
* २६ मार्च २०१३ रोजी ९८२ पानांचे दोषारोपपत्र दाखल
* खटल्याची सुरुवातीची सुनावणी नेवासे येथील सत्र न्यायालयात नंतर नाशिककडे वर्ग
* खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती
खटल्यात ५३ साक्षीदारांची तपासणी
* १५ जानेवारी २०१८- न्यायालयाने पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश उर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुल्हे, अशोक नवगिरेला दोषी ठरवले
* १८ जानेवारी २०१८ – शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002