Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
‘आधार’शी ड्रायव्हिंग लायसन्सही जोडले जाणार

व्हीएस न्यूज - बनावट परवान्याची समस्या दूर करण्यासाठी परवान्याला आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. सर्व राज्यांचा यात समावेश करत एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. के एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते सुरक्षा समितीने याची माहिती दिली. समितीने दिलेली ही माहिती महत्वाची आहे. कारण सध्या सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय संविधान पीठ आधार योजना आणि त्यासंबंधीत कायद्याचे संवैधानिकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी करत आहे.

समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मागील वर्षी २८ नोव्हेंबर रोजी रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांबरोबर बनावट परवान्याची समस्या आणि हा प्रकार संपुष्टात आणण्यासाठी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती. बनावट परवान्याविषयी संयुक्त सचिवांनी सूचित केले होते की, एनआयसीकडून सारथी- ४ सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू असून नंतर ते आधार क्रमांकाशी जोडले जातील. सॉफ्टवेअर सुरू झाल्यानंतर देशात कुठूनही बनावट परवाना काढता येणार नाही.

समितीचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या वकिलाने सांगितले की, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय आणि दुसऱ्या प्राधिकाऱ्यांबरोबर २२-२३ फेब्रुवारीला समितीची बैठक होत आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचा विचार होईल. मंत्रालयाकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद पीठास म्हणाले की, २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये प्राणघातक रस्ते अपघातांची संख्या सुमारे ३ टक्क्यांनी कमी झाली आहे. यावर पीठाने समाधान व्यक्त केले.

...Read More

V. S. News
नरेंद्र मोदींना आठवले रामायणातले पात्र

व्हीएस न्यूज - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना बुधवारी लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे राज्यसभेतही काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजी करत मोदींच्या भाषणात व्यत्यत आणण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या भाषणादरम्यान व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपरोधिक टीका केली ज्यामुळे विरोधक मोदींवर संतापले आहेत. मोदींनी रेणुका यांची तुलना रामायणातील राक्षसांच्या हसण्याशी केली.

पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांपैकी रेणुका चौधरी यादेखील होत्या. रेणुका यांच्या हसण्यावर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान बोलत असताना त्यांच्यावर हसणं हे चुकीचं असल्याचं नायडू यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. पण, या प्रकरणात हस्तक्षेप करत मोदींनी रेणुका चौधरी यांच्यावर उपरोधिक टिका केली. ‘सभापती महोदय माझी विनंती आहे रेणुका यांना तुम्ही काहीही बोलू नका. रामायण मालिकेनंतर बऱ्याच दिवसांनी अशा प्रकारचं हसू कानावर पडण्याचं सौभाग्य मला लाभलं आहे’. अशी उपहासात्मक प्रतिकिया देत मोदींनी चौधरी यांना शांत केलं. मोदींच्या या उपरोधिक बोलण्यामुळे आणि राक्षसांच्या हसण्याची तुलना करण्यानं भाजपच्या खासदारांमध्ये हशा पिकला आणि वरमलेल्या चौधरींचं हसणं बंद झालं.

नरेंद्र मोदींच्या टोल्यावर रेणुका चौधरी यांनी तीव्र नापसंती दर्शवली. ‘मोदींकडून तुम्ही यापेक्षा जास्त काय अपेक्षा करू शकता? त्यांच्या टीकेवर मला काहीही बोलायचं नाही. त्यांच्या पातळीला उतरून मी टीका करू शकत नाही. मोदींच्या टोल्यानंतर भाजप महिलांच्या किती विरोधात आहे हे साफ दिसून येतं. मी हसले, हेच मोदींच्या जिव्हारी लागलं कारण माझ्या हसण्याला सत्याची धार होती’ अशी प्रतिक्रीया त्यांनी ‘एएनआय’या वृत्तसंस्थेला दिली. तर दुसरीकडे राहुल गांधीच्या ७० हजारांच्या जॅकेटवरूनही रेणुका यांनी भाजपवर टीका केली. शिलाँगमधल्या एका संगीत कार्यक्रमासाठी राहुल गांधींनी ७० हजारांचे जॅकेट परिधान केले असल्याचे ट्विट भाजपनं केलं होतं. मला भाजपनं जॅकेटच्या किंमतीबाबत केलेल्या दाव्याबद्दल हसू येत आहे असंच हुबेहुब जॅकेट मी ७०० रुपयांना मोदींना आणून देते, पण ५६ इंचाच्या छातीपलिकडे माझ्याकडे माप नाही’ असंही त्या म्हणाल्या.

...Read More

V. S. News
राजस्थानमधील पराभवानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष शिगेला

व्हीएस न्यूज - राजस्थानमधील पोटनिवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजेंविरोधातील भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी आता समोर येऊ लागली आहे. कोटा जिल्ह्याचे ओबीसी विंगचे प्रमुख अशोक चौधरी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना हटवण्याची मागणी केली आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यशैलीवर राज्यातील जनता खूश नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाचे प्रदेश प्रमुख अशोक परनामी यांनाही पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

अशोक चौधरी म्हणाले की, सध्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसतोय. मी राजस्थान भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे माझ्या पत्रात मांडले आहे. पत्रातील प्रत्येक शब्द पक्ष कार्यकर्त्यांची हतबलता व्यक्त करतो, असेही ते म्हणाले. पत्र लिहिण्या मागचे कारण त्यांना विचारले असता ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या नाराजी नंतर मला वाईट वाटले. त्यामुळे असे पत्र लिहिण्यास मला नाईलाज झाला. राजस्थानमधील तीन जागांवर भाजपाला अपयश आल्यानंतर म्हणजे एक फेब्रुवारीनंतर हे पत्र लिहिण्यात आले होते. राज्यातील जनता वसुंधरा राजेंच्या कार्यपद्धतीवर खूश नाहीत. त्यांच्या काम करण्याच्या या शैलीमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळत आहे. त्याचा पक्ष संघटनेला फटका बसत आहे,असे म्हणत वसुंधरा राजे पक्षाला अशा मार्गावर नेत आहेत, जिथे पक्षाचा पराभव निश्चित आहे, असा दावाही त्यांनी केला. आगामी निवडणुकांपूर्वी पक्षात चैतन्य आणायचे असेल तर राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले.

...Read More

V. S. News
नॅनो कार बंद होण्याच्या मार्गावर ?

व्हीएस न्यूज - सर्वसामान्यांना कारचं स्वप्न दाखवणारी टाटा मोटर्सची महत्त्वाकांक्षी नॅनो शेवटचे आचते देत असून कदाचित वर्षभरात तिचं उत्पादन बंद होण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सचे व्यवसथापकीय संचालक गुंटर बुशक यांच्याशी बोलताना नवीन सुरक्षेचे निकष लागू झाल्यामुळे नॅनोमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. यामध्ये ती बंद करण्याचा व एकदम नवीन गाडी तयार करण्याचा प्रस्तावही असू शकतो. वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू असल्याचे गुंटर यांनी सांगितले.

अजून कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून जर सुरक्षा निकषांमध्ये बसायचं तर नॅनोच्या नूतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल असे ते म्हणाले. टाटा मोटर्स सध्या नवीन कार्स व एसयुव्ही लाँच करत आहे. तसेच कंपनीच्या ताफ्यात कुठल्या गाड्या आहेत, कशाची कमतरता आहे आदीबाबत एकूणच सर्वांगी विचार करण्यात येत आहे. नवीन सुरक्षा निकषांमुळे अनेक मॉडेल्सच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला सुरक्षाविषयक कठोर नियम लागू होणार आहेत आणि सध्याची नॅनो व अनेक गाड्या त्यात बसणार नाहीत अशी स्थिती आहे.

टाटा नॅनो ही 2009 मध्ये झोकात सादर करण्यात आली. तत्कालिन अध्यक्ष रतन टाटा यांच्या कल्पनेतून या गाडीचा जन्म झाला आणि एक लाखाची गाडी अशी तिची ओळख झाली. कालौघात किंमत वाढली पण नॅनो सगळ्यात स्वस्त कारच राहिली. सिंगूर जमीन प्रकरणावरून झालेल्या विलंबानंतर अखेर गुजरातमधल्या साणंद येथून उत्पादन झालेली नॅनो बाजारात मात्र यश मिळवण्यास अपयशी ठरली. नॅनोला वर काढण्याचे कंपनीचे सगळे प्रयत्न फोल झाले असून रतन टाटांची महत्त्वाकांक्षी कार सध्या तरी विपन्नावस्थेत आहे. दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सने दोन कन्सेप्ट कार्स सादर केल्या आहेत. यामध्ये एका एसयुव्हीचा तर एका हॅचबॅकचा समावेश आहे.

...Read More

V. S. News
राज ठाकरे घेणार २१ फेब्रुवारीला शरद पवार यांची मुलाखत

व्हीएस न्यूज - - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असलेल्या बहुचर्चित मुलाखतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. २१ फेब्रुवारीला ह्या बहुचर्चित मुलाखतीचा कार्यक्रम साकारला जाणार आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ही जाहीर मुलाखत रंगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील या दोन दिग्गज नेत्यांचा राजकारणासोबतच सामाजिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये वावर आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या मिश्किल टिप्पणी करण्याच्या हातोटीमुळे या मुलाखतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सुरवातीला ३ जानेवारीला ही मुलाखत होणार असे जाहीर करण्यात आले होते. पुण्यात जानेवारी महिन्यात जागतिक मराठी अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या शोध मराठी मनाचा या संमेलनात ही मुलाखत होणार होती. मात्र काही कारणामुळे ६ जानेवारीला मुलाखतीची तारीख ठरवण्यात आली. दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडली आणि हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता अखेर या लक्षवेधी मुलाखतीसाठी २१ फेब्रुवारीचा मुहूर्त सापडलाआहे. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची ५० वर्ष आणि शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या निमित्ताने शरद पवारांची आगळी वेगळी मुलाखत घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. मात्र या मुलाखतीसाठी मुलाखतकार म्हणून कोण असावे यावर मोठा खल झाला आणि अखेर राज ठाकरे यांचे नाव समोर आले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी हा योग जुळवून आणण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या मुलाखतीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र तारीख जाहीर झाल्यानंतरही प्रत्यक्ष मुलाखतीचा योग जुळून आला नव्हता.

...Read More

V. S. News
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांचे मौन

व्हीएस न्यूज - - संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकांडतांडव करणा-या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत मात्र मूग गिळून बसणे पसंत केले. या प्रकरणाचा मुख्य सचिवांकडून संपूर्ण अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन केल्यानंतर त्यांचा जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष केले होते. ‘धर्मा पाटील प्रकरणावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत’ असा सवाल रावते यांनी केला होता. त्यावेळी एक आठवडय़ात याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले होते. या घटनेची गंभीर दखल घेत आलेल्या माहितीवर कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.

सरकारने आदेश देऊन आठवडा उलटून गेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र मंगळवारच्या बैठकीत कोणताही अहवाल आला नाही. गेल्या वेळी शेतकरी आणि धर्मा पाटील प्रकरणाबाबत मोठा कळवळा असल्याचा आव आणणा-या शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीत तोंडही उघडले नाही. याबाबत शिसेनेचे मंत्री रामदास कदम यांना विचारले असता, आज मंत्रिमंडळात खूप विषय असल्याने त्यावर चर्चा झाली नसल्याचे सांगून त्यांनी काढता पाय घेतला.

काय आहे प्रकरण?

धुळे जिल्ह्यात होणा-या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादीत करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ ४ लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतक-यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरे मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केले. पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारने पाटील यांच्या कुटुंबियांना १५ लाखाचे सानाुग्रह अनुदान देऊ केले. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.

...Read More

V. S. News
अर्थसंकल्पात निधीची तरतुद करूनही महिलांच्या योजनांसाठीचा निधी खर्च का होत नाही ?

व्हीएस न्यूज - यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद ही २६ टक्क्यांनी वाढली असल्यामुळे हा अर्थसंकल्प चांगला आहे. पण अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी अनेक योजना तसेच त्यासाठी निधीची तरतुदी केली जाते, पण तो निधी खर्च का केला जात नाही ? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.

डॉ. गोऱ्हे यांनी महिलांसाठी असलेल्या अनेक योजना या तळागाळापर्यंत पोहचत नाहीत याविषयी मुंबई मराठी पत्रकार संघात ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपली खंत व्यक्त केली. त्यांनी केंद्र सरकारच्या काही योजनांचे स्वागत करत अनेक योजनांवर जोरदार टीका केली.

मागील अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्वाची असलेली मनोधैर्य योजनेत करण्यात आलेली तरतूद खर्च झाली नाही. तसेच यावेळी गोऱ्हे यांनी त्यात आणि निर्भया योजनेत निधीची कपात केल्याने नाराजी व्यक्त केली. सौभाग्य योजना आणि महिलांना वीज पूरविणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनावर टीका केली. ग्रामीण विकास आणि त्यासाठीच्या योजनांत महिलांना कुठेही स्थान नाही. सुकन्या योजना, मागास मुलींना शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा, वाचनालय आणि प्रत्येक दिवसाच्या हजेरीसाठीचा निधी कसा मिळत नाही हे पुणे जिल्ह्यातील उदाहरण देऊन सांगितले. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री-पुरुष समानतेचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

...Read More

V. S. News
४६ जणांना बोगस डॉक्टरच्या अक्षम्य चुकीमुळे एचआयव्हीची लागण

व्हीएस न्यूज – उत्तर प्रदेशातील लोकांना एका बोगस डॉक्टरकडून स्वस्तात उपचार करुन घेणे चांगलेच महागात पडले असून एकाच वेळी ४६ लोकांना बोगस डॉक्टरच्या अक्षम्य चुकीमुळे एचआयव्हीची लागण झाली आहे. त्या सगळ्या रुग्णांना उपचारादरम्यान सर्व रुग्णांसाठी एकाच सुईचा वापर केल्याने एचआयव्हीची लागण झाल्याचा धक्कादायक प्रक्रार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊमध्ये घडलेल्या या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

त्या बोगस डॉक्टरचे नाव राजेंद्र कुमार असे असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ बांगरमऊ गावात एप्रिल ते जुलै महिन्यात १२ लोक एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. एका एनजीओने बांगरमऊच्या गावांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी तपासात काही लोकांमध्ये एचआयव्हीची लक्षणे दिसली. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे ते लोक एचआयव्ही बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणावर चीफ मेडिकल ऑफीसर डॉ. एसपी चौधरी म्हणाले, हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने चौकशीसाठी २ सदस्यीय समित्यांची स्थापना केली आहे. या घटनेतील पीडितांना एआरटी सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. या समितीच्या सादर केलेल्या अहवालात म्हटले की, सुईचे पैसे वाचवण्यासाठी एकाच सुईने अनेकांना इंजेक्शन देण्यात आले होते. २४,२५ आणि २७ जानेवारी २०१७ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात जवळच्या गावातील राजेंद्र कुमार याने पैसे वाचवण्यासाठी एकाच सुईचा वापर केला. त्यामुळे इतके लोक एचआयव्ही बाधित झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले, आरोग्य शिबिरांमुळे अशी एड्सची प्रकरणे समोर आली आहेत. या घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल.

...Read More

V. S. News
देशातील मुस्लिमांना ‘पाकिस्तानी’ म्हणाऱ्याला शिक्षा करा – ओवेसी

व्हीएस न्यूज - एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत भारतीय मुस्लिमांना ‘पाकिस्तानी’ म्हणून संबोधण्याला दंडणीय गुन्हा ठरवणारा कायदा केंद्र सरकारने करावा, अशी मागणी केली.

अशा प्रकारचा कायदा करुन केंद्राने या गुन्ह्यात ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ओवेसी यांनी लोकसभेत बोलताना केली. पण अशा प्रकारचे विधेयक संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मांडणार नाही, असेही ओवेसी म्हणाले. ओवेसींनी यावेळी ट्रीपल तलाक हे महिला विरोधी असल्याचा पुनरुच्चारही बोलताना केला आहे. भारतातील मुस्लिमांनी मोहम्मद अली जिना यांचा द्विराष्ट्रीय सिद्धांतही नाकारला आहे. मात्र तरीही त्यांना बाहेरच्यांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचेही ओवेसी म्हणाले.

...Read More

V. S. News
कारच्या नोंदणीवरुन सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

व्हीएस न्यूज - - कारच्या नोंदणीवरुन सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून तुम्ही कार विकल्यानंतरही वाहनाच्या नोंदणीत बदल केले नसतील आणि त्या कारमुळे अपघात झाल्यास मूळ मालकालाही संबंधितांना भरपाई द्यावीच लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान १२ जुलै २००७ मध्ये विजय कुमार यांनी त्यांची कार विकली होती. तिच कार त्या व्यक्तीने नवीन कुमार यांना विकली आणि नवीन कुमार यांनी मिरसिंह यांना ती कार विकली होती. कारचा मिरसिंह यांच्या ताब्यात असताना अपघात झाला. मिरसिंह अपघात झाला त्यावेळी कार चालवत नव्हते. एकाचा या अपघातात मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. मूळ मालक विजयकुमार आणि अपघात घडला त्यावेळी जी व्यक्ती कार चालवत होती ती व्यक्ती अशा दोघांनी मिळून मृतांच्या कुटुंबीयांना ३ लाख ८५ हजार रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले.

पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात या निर्णयाला विजयकुमार यांनी आव्हान दिले. विजयकुमार यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. कार विकल्याचे पुरावे असल्यामुळे त्यांच्याकडून भरपाई घेता येणार नाही, असे विजय कुमार यांनी उच्च न्यायालयात सांगितले होते. या निर्णयाला नियमानुसार ज्या व्यक्तीच्या नावावर वाहनाची नोंदणी आहे तिच्याकडूनच भरपाई घेतली पाहिजे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. या प्रकरणात मालकाने वाहन विकले होते. पण त्याने वाहनाच्या नोंदणीत बदल न केल्यामुळे भरपाई त्यांना देखील द्यावीच लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले.

...Read More

V. S. News
सेल्फी काढण्यापेक्षा तो खड्डा बुजविण्याचा प्रयत्न करेन – नाना पाटेकर

व्हीएस न्यूज - - रस्त्यावरील खड्डय़ांसोबत सेल्फी काढणे आणि त्या विषयावर आंदोलन छेडणे किंवा अन्य मार्गाने त्याविषयी निषेध नोंदविणे यापेक्षा मी तो खड्डा कसा बुजवता येईल यासाठी प्रयत्न करेन. कारण याच खडय़ामुळे उद्या माझा किंवा माझ्या जवळच्या कोणाचा तरी अपघात होऊ शकतो. त्याचबरोबर सर्व काही सरकारवर सोडण्यापेक्षा आपणही काही तरी केले पाहिजे, असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

नाना पाटेकर हे आपला माणूस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशिकला आले होते. पाटेकर यांनी यावेळी पत्रकारांशी गप्पा मारतांना चित्रपटासह विविध विषयांवर विचार मांडले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी सर्व खड्डे बुजविण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीने त्यावर खड्डे विथ सेल्फी हे आंदोलन सुरू केले. सामान्य नागरिक म्हणून मला सेल्फी काढून आंदोलनात सहभागी होण्यापेक्षा तो खड्डा बुजवायला आवडेल. कोणी काय करावे हा ज्याच्या त्याचा प्रश्न, असे पाटेकर यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांचा अपघात, डोक्याला दुखापत

व्हीएस न्यूज - - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांचा राजस्थानच्या कोटा-चितौड महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. जसोदाबेन यांना उपचारांसाठी चितौड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जसोदाबेन या आता ठीक आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले ज्यानंतर जसोदाबेन पोलिसांसोबत त्यांच्या गाडीत बसून रूग्णालयात गेल्या. जसोदाबेन या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतात. त्याचसाठी त्या मथुरेत गेल्या होत्या आणि राजस्थानमध्येही एका सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी जसोदाबेन यांच्या कारला अपघात झाला. अपघातात जसोदाबेन यांचा मोठी दुखापत झाली नाही. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे समजते आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!