Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
कॉन्स्टेबलला आयपीएस अधिकाऱ्यांचा सलाम

व्हीएस न्यूज - देशातील सर्वात मोठा बँक दरोडा रोखणाऱ्या राजस्थानातील एका सामान्य कॉन्स्टेबलला आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने सलाम केला आहे. तसेच पोलिस आयुक्तांनीही त्याच्यासाठी शौर्य पुरस्काराची शिफारस केली आहे. एक जयपूर येथील कॉन्स्टेबल सिताराम याने अॅक्सिस बँकेतील दरोडा रोखला होता. त्यावेळी बँकेत 925 कोटी रुपये होते. मात्र सिताराम याने फक्त एक गोळी झाडून दरोडेखोरांना पळवून लावले होते. त्याच्या या कृत्यामुळे तो सर्व पोलिस विभागात कौतुकाचा विषय ठरला आहे. देशातील आयपीएस अधिकार्‍यांची संघटना असलेल्या आयपीएस असोशिएशनने आपल्या ट्विटर हँडलवरून सिताराम याचे कौतुक केले आहे. तुम्ही केवळ मोठी रक्कमच वाचविले नाही तर तुम्ही हिरो बनला आहात आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, असे संघटनेने म्हटले आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटनेचे हे ट्विट राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनीही रीट्वीट केले आणि कॉन्स्टेबल सितारामला शाबासकी दिली. जयपूरच्या ॲक्सिस बँकेत गेल्या शुक्रवारी ही दरोडेखोरीची घटना घडली होती. त्यावेळी इनोव्हा गाडीतून आलेल्या 13 बुरखाधारी लोकांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी बँकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर बंदूक रोखली होती. सिताराम याने बँकेच्या आतून केवळ एक गोळी झाडल्यामुळे दरोडेखोरांना रिकाम्या हाती पळून जावे लागले होते.

...Read More

V. S. News
योगी सरकार बनविणार तुरुंगांमध्ये गोशाळा

व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशातील 12 तुरुंगांमध्ये गोशाळा स्थापन करण्याची योजना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आखली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 12 तुरुंगांची निश्चितीही करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात एकूण 69 तुरुंग आहेत. गृह विभाग आणि प्रशासन विभाग तसेच गो सेवा आयोग यांच्यामध्ये झालेल्या एका सहकार्य करारानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुरुंग प्रशासन विभागाचे अतिरिक्त महानिरीक्षक शरद यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, की आमच्याकडे पुरेशी जागा आहे आणि या गाईंची देखभाल करण्यासाठी आमच्याकडे लोकही भरपूर आहेत. आम्ही तत्काळ प्रभावाने या योजनेला मान्यता दिली आहे.

आदित्य नाथ यांच्या यांचे सरकार आल्यापासून बस सेवेला जास्त महत्त्व देण्यात येत आहे त्याच्यामुळेच आयोगाचे माजी प्रमुख तसेच माजी आयएएस अधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात त्यांनी नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव दिला होता आणि पोलिस अकादमीची जागा मागितली होती. मात्र पोलिस अकादमीने ही जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे तुरुंगात या गोशाळा काढण्यात येणार असून तुरुंगातील कैदी या गाईंची देखभाल करतील, अशी ही योजना आहे.

...Read More

V. S. News
पंतप्रधान मोदींची आता ‘लंच पे चर्चा’

व्हीएस न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘चाय पे चर्चा’ या मोहिमेची सुरुवात केली. पण मोदी यांनी आता पक्षातील खासदारांना ‘लंच पे चर्चा’ या चर्चासत्राचे आयोजन करायला सांगितले आहे. जनतेपर्यंत अर्थसंकल्पातील योग्य बाबी पोहोचविण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सूचना भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केल्या. राहुल गांधी यांची वर्तणूक लोकशाहीविरोधी असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले. यावेळी बैठकीत राहुल गांधी राफेल कराराशी संबंधित करत असलेल्या टीकेला सामोरे जाण्याची सूचनाही त्यांनी खासदारांना केल्या. सुत्रांनी दिलेल्या माहिट्रीपलुसार मोदींनी अर्थसंकल्प हा सामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पाच्या फायद्यांची माहिती जनतेला देण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी खासदारांना केले.

...Read More

V. S. News
महत्त्वपूर्ण खटल्यांचे थेट प्रक्षेपणाप्रकरणी महाधिवक्ता यांचा सल्ला

व्हीएस न्यूज सर्वोच्च न्यायालयाकडे एका याचिकेद्वारे महत्त्वपूर्ण खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रसारण करण्याची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्ता के.के. वेणुगोपाल यांचा सल्ला घेतला. दोन आठवड्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

याप्रकरणी केंद्र सरकारची प्रतिक्रियाही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने मागितली आहे. चार न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली होती. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी महत्त्वपूर्ण खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रसारण करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे. घटनेच्या कलम १९(१ नुसार) न्यायालयाच्या खटल्यांची माहिती जाणून घेणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचेही त्यांनी याचिकेत नमूद केले होते.

...Read More

V. S. News
रेल्वेच्या दांडीबहाद्दर १३ हजार कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी

व्हीएस न्यूज दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांकडे भारतीय रेल्वे प्रशासनाने वक्रदृष्टी वळवली असून दीर्घ काळापासून जे कर्मचारी परवानगी न घेता अनुपस्थित आहेत अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही सूचनेशिवाय कामावर येत नसलेल्या १३, ५०० कर्मचाऱ्यांचा रेल्वेने शोध लावला असून रेल्वे प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची कारवाईही सुरू केली आहे.

एका निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली असून एक अभियान रेल्वेची कामगिरी चांगली होण्यासाठी व निष्ठावान आणि कष्टाळू कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी सुरू केले आहे. त्याचाच भाग ही कारवाई असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. एक व्यापक अभियान रेल्वेतील विविध विभागात दीर्घ कालावधीपासून अनाधिकृतपणे अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी सुरू करण्यात आले. रेल्वेला या अभियानात १३ लाख कर्मचाऱ्यांमधून १३,५०० असे कर्मचारी आढळून आले, जे कोणतीही सूचना न देता दीर्घ कालावधीपासून अनुपस्थित आहेत. त्यामुळे रेल्वेने अशा अनुपस्थित कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यासाठी नियमानुसार अनुशासनात्मक कारवाई सुरू केली आहे.

...Read More

V. S. News
बिटकॉईन खरेदीदारांना आयकर विभागाची नोटीस

व्हीएस न्यूज आता बिटकॉईन खरेदीदार आयकर विभागाच्या रडारवर आले असून आयकर विभागाने बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणा-या ३०० जणांकडून गुंतवलेल्या रकमेचा तपशील मागवला आहे. त्यांच्याकडे या पैशाच्या उत्पन्नाचा स्रोत कोणता याचीही विचारणा करण्यात आली आहे.

दरम्यान, बिटकॉईन या अभासी चलनातील गुंतवणुकीपासून दूर राहण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेनेही दिला आहे. बिटकॉईन खरेदी भविष्यात मोठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिटकॉईनच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार केला जात असून यामधील गुंतवणूक मुर्खपणाची ठरु शकते, असेही रिझर्व्ह बँकेने त्यांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

बिटकॉईनमधील गुंतवणुकीबाबत आणि वाढत्या किमतीबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही चिंता व्यक्त केली आहे. बिटकॉईनसह सर्व प्रकारची अभासी चलन बेकायदा असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले असून सरकार ते संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट केले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष (सीबीडीटी) सुशील चंद्रा यांनीही या गुंतवणुकीला सक्त विरोध दर्शवला आहे. या गुंतवणुकीवर मोठय़ा प्रमाणात कर आकारणी करण्याचेही सुतोवाच केले आहे.

आयकर विभागानेही या पार्श्वभूमीवर बिटकॉईन खरेदीदारांना आपल्या रडारवर आणले आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणा-यांना तातडीने नोटीस बजावण्यात आली असून यामध्ये पहिल्या यादीत ३०० जणांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीपासून मिळणा-या उत्पन्नाचीच माहिती आयकर विभागाने मागवली नसून त्यामध्ये केलेल्या गुंतवणूक रकमेचा तपशीलही मागवला आहे. या सर्वांच्या प्राप्तिकर परताव्याबाबतची फेरतपासणी केली जाणार आहे. उत्पन्नामध्ये बिटकॉईनमधील गुंतवणुकीचाही तपशील नोंदवून त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये काही चुकीचे अथवा बेकायदेशीर आढळल्यास संबंधितांवर फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. बिटकॉईन खरेदीबाबत गेल्यावर्षी सर्वच स्टॉक एक्स्चेंजमधून माहिती गोळा केली होती. त्यानंतरच या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

...Read More

V. S. News
ट्रीपल तलाक कायदा केल्यास मुस्लीम महिला उतरणार रस्त्यावर

व्हीएस न्यूज - भाजप सरकार ट्रीपल तलाक विरोधात कायदा करण्याच्या तयारीत असतानाच मुस्लीम समाजातील महिलांचाच आता याला विरोध होऊ लागला आहे. मुस्लिम महिलांच्या अधिकारांवर गदा आणणारे ट्रीपल तलाक विधेयक असून इस्लामच्या शरियत कायद्याच्या तरतुदीतच मुस्लिम महिला समाधानी आहेत. महिलांच्या अधिकारांचे पुरेपूर संरक्षण इस्लामच्या शरियत कायद्यात करण्यात आले आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांना ट्रीपल तलाक विधेयकाची काही आवश्यकता नसल्याने ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

शुक्रवारी याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मुस्लिम बोर्डिंग आणि मुस्लिम समाजातील महिलांच्यावत्तीने देण्यात आले. या मागण्यांचा विचार येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे. महिलांचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवक निलोफर अजरेकर याविषयी बोलताना म्हणाल्या, प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज अॅक्ट २०१७ हा घाई गडबडीत घेतलेला निर्णय आहे. यामध्ये पुरुषाला ट्रीपल वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. ट्रीपल तलाक विरोधात कायदा करताना मुस्लिम समाजातील कोणत्याही धर्मगुरू किंवा मुस्लिम बुद्धिजीवी वर्गाशी चर्चा केलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या विधेयकाची काहीच आवश्यकता नव्हती. हे विधेयक भारतीय संविधानाच्या व मुस्लिमांच्या विरुद्ध आहे. या विधेयकामूळे मुस्लिम महिला आणि मुलींच्या अधिकारांवर गदा येणार आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात मुस्लिम महिलांवर प्रहार केला आहे. त्यांच्या भाषणाने समस्त मुस्लिम महिलांच्या स्वाभिमानाला ठेच लागली आहे. आम्ही त्याची निंदा करतो. राष्ट्रपतींच्या भाषणातून ते वाक्य वगळण्यात यावे, अशी मागणीही यावेळी सहभागी महिलांनी केली.

...Read More

V. S. News
मतदारांच्या घरी जाऊन भेटवस्तू द्या - चंद्रकांत पाटील

व्हीएस न्यूज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी त्यांच्या घरोघरी गेले पाहिजे, तसेच मतदारांना भेटवस्तू दिल्या पाहिजेत,असा अजब सल्ला दिला आहे. त्यांनी सांगलीमध्ये आयोजित भाजपच्या बूथ पदाधिकारी मेळाव्यात दिलेल्या या सल्ल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राजकीय पक्षांनी सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच आपली कंबर कसली आहे. त्यामुळे सांगली महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजप मैदानात उतरला आहे. भाजपच्या बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बूथप्रमुखांना मार्गदर्शन करताना बूथप्रमुखांनी मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे, असे सांगितले आहे. एका बूथ पदाधिकाऱ्याच्या क्षेत्रात २०० घर येत असतील,तर त्या बूथप्रमुखाने त्या मतदाराच्या घरी गेले पाहिजे. त्यावेळी नुसतीच विचारपूस करण्याऐवजी एक भेटवस्तूदेखील दिली पाहिजे, असा सल्ला यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

...Read More

V. S. News
राज्यातील निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात – देवेंद्र फडणवीस

व्हीएस न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात लाेकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी आग्रही असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाला केले. तसेच लोकशाही सुदृढ करण्यासाठी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी किमान राज्याच्या कायद्यानुसार घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांत तरी मतदानसक्ती करता येईल का, याबाबत विचार व्हावा, अशी सूचनाही त्यांनी केली. निवडणूक आयोगातर्फे आयोजित निवडणुका व सुप्रशासन या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. मतदानासाठी होणारा पैशाचा वापर ही चिंतेची बाब आहे. पैशाचा हा गैरवापर थांबला पाहिजे,’ अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.

अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, इक्वेडोर, लिंचेस्टिन, लक्झेंबर्ग, उत्तर कोरिया आदी २२ देशांत मतदान सक्तीचे केले आहे. मतदानास गैरहजेरीचे योग्य कारण न दिल्यास त्यांना ३ महिने बँकेचे व्यवहार करता येत नाहीत. नवीन पासपोर्ट मिळत नाही, नूतनीकरणही होत नाही. २० ते २२ डॉलरचा दंडही ठोठावण्यात येतो. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतातील कोणत्याही राज्यामध्ये मतदानसक्ती नसल्यामुळे महाराष्ट्रापुरता तरी तसा निर्णय घेणे फडणवीस सरकार व आयोगाला अशक्य होईल.

राज्यात एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्यास निवडणूक आयोग, प्रशासन आणि पोलिसांवरील ताण कमी होईल. तसेच वारंवार होणाऱ्या निवडणुकांसाठी होणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याला निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याचे अधिकार असून त्यानुसार निवडणूक आयुक्तांची समिती नेमावी. त्या माध्यमातून एकत्रित निवडणुकांबाबत अभ्यास करून अहवाल शासनाला सादर करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

...Read More

V. S. News
आयुक्त तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी; कामात हलगर्जीपणा करू नका

व्हीएस न्यूज - नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, अशी तंबी दिली. तसेच, नाशिकमध्ये नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याचे आश्वासनही यावेळी मुंढेंनी दिले.

तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदावरुन बदली होत, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार अत्यंत कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळख असणाऱ्या तुकारम मुंढेंनी स्वीकारला. नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाईल. आर्थिकदृष्ट्या नाशिक शहर सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केले जाईल, असा विश्वास मुंढेंनी नाशिककरांना दिला.

कोणताही नागरिक, पदाधिकारी किंवा कंत्राटदार यांनी फाईल फिरवू नये, ते काम अधिकारी कर्मचाऱ्याचे आहे, त्यात हलगर्जीपणा झाला तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही मुंढेंनी यावेळी दिला. काम करताना अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवावी. मी नाशिककरांचे समाधान होईल असे काम करेन, असे सांगत तुकाराम मुंढे पुढे म्हणाले, शहराचे स्वास्थ्य, पर्यावरण टिकवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. पार्किंगसाठी नवे धोरण आणणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या शहराचा विकास करण्याच्या सूचना असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी नमूद केले.

...Read More

V. S. News
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ पासून

व्हीएस न्यूज - केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यातील नागरिकांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. यंदाचे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ९ मार्चला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधिमंडळाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत चालणार आहे. म्हणजे यंदाच्या अधिवेशनात २२ दिवस कामकाज चालणार असून संपूर्ण अधिवेशनाचा कालावधी ३१ दिवसांचा असणार आहे.

विधिमंडळाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री गिरीष बापटी यांनी ही माहिती दिली. राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पिय अधिवेशन होत असून जीएसटी कराची अंमलबजावणी सुरु होवून ८ महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे या करप्रणालीमुळे राज्याच्या तिजोरीत किती निधी जमा झाला? याची माहिती राज्याच्या जनतेला कळणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी किती निधी उपलब्ध होणार याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या अधिवेशनात शेतकरी धर्मा पाटील यांचे आत्महत्येचे प्रकरण आणि मंत्रालयात येवून जनतेकडून करण्यात येत असलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

...Read More

V. S. News
दृष्टिहीनांच्या क्रिकेट संघटनेला बीसीसीआयने मान्यता द्यावी

व्हीएस न्यूज - भारतीय दृष्टिहीन संघाने विश्वचषक जिंकून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या राष्ट्रीय दृष्टिहीन क्रिकेट संघटनेला (सीएबीआय) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्यता द्यावी व त्यांना मंडळाच्या निवृत्तिवेतन योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केले आहे.

सचिनने याबाबत बीसीसीआयच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने म्हटले आहे की, ‘‘सलग चौथ्यांदा भारतीय संघाने दृष्टिहीन खेळाडूंच्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे. हे खेळाडू अतिशय संघर्ष करत क्रिकेट खेळतात. त्यांनी मिळवलेले विजेतेपद केवळ दृष्टिहीन खेळाडूंसाठी नव्हे तर अन्य खेळाडूंसाठीही प्रेरणादायक आहे. यापूर्वी मंडळाने दृष्टिहीन खेळाडूंना सहकार्य केले होते. पुन्हा तसेच सहकार्य करताना निवृत्तिवेतनाचा त्यांना फायदा दिला पाहिजे.’’

सीएबीआयला मान्यता दिली तर दृष्टिहीन खेळाडूंचे अनेक प्रश्न सुटतील. तसेच नवोदित दृष्टिहीन खेळाडूंनाही या खेळात कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असेही सचिनने सांगितले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!