Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
पोलिसांच्या घरांसाठी राज्य सरकारचा ‘मुंबई आयआयटी’शी करार

व्हीएस न्यूज - पोलिसांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने भारतीय प्रोद्योगिक संस्थानशी (आयआयटी) बुधवारी सामंजस्य करार केला आहे.

पोलीस गृहनिर्माण महामंडळाने राज्यात पोलिसांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या गृहप्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. यासाठीच महामंडळाने मुंबई आयआयटीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी महामंडळ आणि आयआयटीत करार झाला. तांत्रिकदृष्ट्या मजबूत, दीर्घकाळ टिकणाऱ्या, कार्यपूरक व हरित इमारत संकल्पनेनुसार आकर्षक असे बांधकामाचे आराखडे‘आयआयटी’ तयार करणार असून तांत्रिक परीक्षण, कामाची तपासणी व समीक्षण करणे, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, याबाबत आयआयटीची मदत घेतली जाईल.

पोलिसांसाठी घरे, पोलीस दलासाठी प्रशासकीय इमारती, पोलीस ठाणे, कारागृहे ही कामे महामंडळाच्यावतीने केली जातात. सध्या राज्यात महामंडळामार्फत मोठे ३६ प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये ३ हजार ३४४ सदनिका, १ हजार ६५२ क्षमतेची ८ वसतिगृहे, ११ पोलिस ठाणी, ४० वर्गखोल्यांच्या ६ इमारती, ९ प्रशासकीय इमारती, १ समादेशक कार्यालय, ४ कौशल्य विकास केंद्रे आणि १ महासंचालनालयीन कर्मचाऱ्यांसाठी शिबीर कार्यालय इमारतीचा समावेश आहे. पोलिस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. डी. मिश्रा यांनी या करारासाठी पुढाकार घेतला होता.

...Read More

V. S. News
अजानचा आवाज ऐकू येताच मोदींनी भाषण थांबवलं

व्हीएस न्यूज - गुजरातमधील सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मोदींनी बुधवारी गुजरातमध्ये चार प्रचारसभा घेतल्या. यामधील तीन सभा सौराष्ट्र आणि एक सभा दक्षिण गुजरातमध्ये झाली. दक्षिण गुजरात येथील नवसारीतील प्रचारसभेला मोदी संबोधित करत असताना जवळच्या एका मशिदीतून ‘अजान’चा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी दोन मिनिटांसाठी भाषण थांबवले.

पंतप्रधान मोदींनी नवसारीतील सभेत बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदींचे भाषण सुरु असताना जवळील मशिदीतून अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी त्यांचे भाषण दोन मिनिटांसाठी थांबवले. अजान संपवल्यावर मोदींनी त्यांचे भाषण पुन्हा सुरु केले. यावेळी त्यांनी जीएसटीवरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. जीएसटीचा उल्लेख ‘गब्बर सिंग टॅक्स’ असा करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर त्यांनी टीकास्त्र सोडले. काँग्रेसचा जीएसटी म्हणजे‘ग्रँड स्टुपिड थॉट’ असल्याचे म्हटले.

काँग्रेसला अभिप्रेत असलेल्या जीएसटीची अंमलबजावणी झाली असती, तर गरिबांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरही १८ टक्के इतका कर आकारला गेला असता. त्याचवेळी सिगारेट आणि मद्यावरही १८ टक्के कर लागला असता. त्यामुळे सिगारेट आणि मद्य स्वस्त झाले असते. जीवनावश्यक वस्तू आणि मद्यावर एकच कर लागणे, हे तर्काला धरून आहे का?, असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेला लुटले. त्यांनी आतापर्यंत जनतेची खूप लूट केली आहे. अशा लूटमारांकडून काय अपेक्षा ठेवणार? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

यावेळी मोदींनी भाजप सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेला दिली. जलसंधारण आणि कृषी क्षेत्रात भाजप सरकारने भरीव कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस कूपनलिकेसारख्या लहान कामांचे श्रेय घेत आहे. मात्र भाजपने सत्ताकाळात मोठेमोठ्या जलवाहिन्यांची कामे केली, असे मोदींनी म्हटले. काँग्रेससाठी विकासाचा अर्थ फक्त हँडपंप (कूपनलिका) आहे. तर भाजपसाठी विकासाचा अर्थ जलवाहिन्यांची कामे पूर्ण करुन पाण्यासाठी होणारी लोकांची पायपीट थांबवणे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

...Read More

V. S. News
…पण मनसेचे एक मत गेले – नाना पाटेकर

व्हीएस न्यूज - ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझे मत मांडले. पण यामुळे राज यांचे काही नुकसान झाले नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं’, असे नाना पाटेकर यांनी म्हटले. आज पुण्यात झालेल्या‘एनडीए’च्या दीक्षांत समारंभाला नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावेळी मुंबईकर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवत होते. अशावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांविषयी त्यांची भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या विषयांची माहिती नाही, त्यात उगाच चोंबडेपणा करू नये, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती. तसेच, त्यांनी नानांची नक्कलही केली होती. ‘वेलकम चित्रपटात नाना पाटेकर यांनी फेरीवाल्याचा अभिनय केला होता. कांदे घ्या, बटाटे घ्या असं नाना त्या चित्रपटात म्हणत होता. म्हणूनच बहुधा नानाला फेरीवाल्यांचा पुळका आला असावा’ असे ठाकरेंनी म्हटले होते.

यावर आज राज ठाकरे यांचे वैयक्तिक काही नुकसान झाले नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत कमी झाल्याचे सांगत नानांनी राज ठाकरेंना टोला लगावला. नाना पाटेकर यांच्या या भूमिकेवर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...Read More

V. S. News
‘मॅगी’ला पुन्हा दणका, ४५ लाखांचा दंड

व्हीएस न्यूज - भारतात नेस्लेला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. ‘मॅगी’त प्रमाणापेक्षा जास्त राख सापडल्याने उत्तर प्रदेशमधील न्यायालयाने ‘मॅगी’ला ४५ लाख, तर वितरकाला १५ लाख रुपये दंड ठोठावला. याशिवाय दोन विक्रेत्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

लखनौतील जिल्हा प्रशासनाने २०१५ मध्ये ‘मॅगी’चे ७ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. २०१६ मध्ये याबाबत अहवाल आला होता. या आधारे प्रशासनाने स्थानिक न्यायालयात खटला दाखल केला होता. ‘मॅगी’मध्ये प्रमाणापेक्षा जास्त राख सापडल्याने न्यायालयाने नेस्लेला नुकताच दंड ठोठावला आहे. नेस्ले इंडियाच्या प्रवक्यांनी यावर प्रतिक्रीया दिली. आम्हाला अद्याप निकालाची प्रत मिळालेली नाही. २०१५ मधील हे प्रकरण असून आम्ही या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ, असे त्यांनी सांगितले. २०१५ नंतर नेस्लेने ‘मॅगी’त बदल केले असून सर्व निकषांचे पालन करूनच आम्ही उत्पादने तयार केली आहेत. दंडाच्या बातमीमुळे ग्राहकांनी गोंधळून जाऊ नये,असे त्यांनी आवर्जून सांगितले.

लखनौतील विविध दुकानांमधून प्रशासनाने ‘मॅगी’चे नमुने घेतले होते. यात ‘मॅगी’ मसाला नुडल्स, ‘मॅगी’ आटा नुडल्समध्ये राखेचे मर्यादेपेक्षा जास्त प्रमाण असल्याचे समोर आले होते. खाद्यपदार्थांमध्ये राखेचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे.

...Read More

V. S. News
सोमनाथ मंदिरात राहुल गांधीची नोंद ‘अहिंदू’

व्हीएस न्यूज - गुजरात विधानसभा निवडणूक प्रचार दौ-यावर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे नाव हिंदू नसणा-या व्यक्तींच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले आहे. या कारणामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नवा वाद निर्माण झाला आहे. सोमनाथ मंदिरात अहिंदू भाविकांना दर्शन घेण्यापूर्वी याच रजिस्टरमध्ये आपले नाव नोंदवावे लागते.

सोमनाथ हे एक हिंदू मंदिर असून हिंदू नसलेल्या व्यक्तीला या मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागेल, अशी सूचना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सूचना फलकावर लिहिण्यात आली आहे. मंदिराच्या नियमानुसार हिंदू नसणा-या व्यक्तीला प्रवेशासाठी प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये आपले नाव आणि माहिती भरावी लागते. या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागी यांनी सोमनाथ मंदिराच्या प्रवेश रजिस्टरमध्ये राहुल गांधी आणि अहमद पटेल यांचे नाव अहिंदूंसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये नोंदवले. त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अहिंदू म्हणून आपले नाव का नोंदवावे लागले यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या मंदिरात हिंदू नसणा-या व्यक्तींना प्रवेशबंदी नाही. मात्र त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत. अहिंदू व्यक्तींसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये राहुल गांधी यांचे नाव नंतर जोडले गेले असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे.

मोदींचा नेहरू-गांधी कुटुंबावर हल्ला

सोमनाथ मंदिरात प्रवेश करणा-या राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. आज सोमनाथ मंदिराची आठवण करणारे आपला इतिहास विसरले आहेत का? असा प्रश्न मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना उपस्थित केला आहे. मोदी म्हणाले की, तुमच्याच (राहुल गांधी) कुटुंबातील सदस्य आणि आमचे पहिले पंतप्रधान इथे सोमनाथ मंदिर उभारणीबाबत मात्र उदासीन होते.

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सभांचा झपाटा लावला आहे. राहुल गांधी हे सोशल मीडियावरदेखील केंद्र सरकारला जाब विचारत आहेत. बुधवारी आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारत म्हटले, ‘५० लाख नवी घरे देणार असे आश्वासन २०१२मध्ये दिले. ५ वर्षांत ४.७२ लाख घरे बनवली. पंतप्रधान, हे आश्वासन पूर्ण व्हायला आणखी ४५ वर्षे लागतील का ते सांगा?’

...Read More

V. S. News
लोकनेते ना.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते पञकार श्रीे.सुनील लोणकर यांचा सन्मान.

व्हीएस न्यूज - तीर्थक्षेञ जेजुरी (ता.पुरंदर ) येथील 'पसायदान"निवासस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकनेते ना.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते पुणे जिल्हा पञकार संघाच्या कार्याध्यक्षपदी बहूमताने निवडून आल्याबद्दल पञकार श्रीे.सुनील लोणकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेजारी मा.जालिंदरभाऊ कामठे ,मा.दिलीपदादा बारभाई,मा.साधनाताई दिडभाई,मा.राहुल घाडगे,मा.अरुण बारभाई,मा.प्रशांत लाखे,मा.मेहबूब पानसरे,मा.एन.डी.जगताप ,सुञसंचालन करीत असताना पञकार मा.शिवराज झगडे व इतर....
तसेच मा.प्रा.डाँ.दिगंबर दुर्गाडे ,मा.सुदामआप्पा इंगळे ,मा.शिवाजी पोमण ,मा.माणिकराव झेंडे पाटील ,मा.विराजभैय्या काकडे,मा.सुधाकर टेकवडे ,मा.बापूसाहेब भोर,मा.ईश्वर बागमार ,मा.पुष्कराज जाधव ,मा.सागर भुजबळ , मा.बी.एम.काळे,मा.प्रकाश फाळके,मा.दत्तानाना भोंगळे,नितीन राऊत ,मा.महादेव माळवदकर पाटील,मा.संदिप कदम , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,संघटक व जेजुरी शहर पञकार संघाच्या सर्व सन्माननीय पञकारबंधूचे सहकार्याबद्दल मनपूर्वक जाहीर आभार.
...Read More

V. S. News
कर्जमाफी घोळ - विजय गौतम यांची उचलबांगडी

व्हीएस न्यूज - शेतक-यांना कर्जमाफी जाहीर करूनही ऑनलाईन घोळामुळे अद्यापही त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या ऑनलाईन घोळाला जबाबदार असणारे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय गौतम यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य दहा सनदी अधिका-यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या.

कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ आयटी विभागाच्या प्रधान सचिवांना अखेर भोवला. या विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची अखेर बदली करण्यात आली आहे. कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ समोर येताच गेल्याच आठवडय़ात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मंगळवारी दहा सनदी अधिका-यांच्या बदलीचे आदेश जारी केले. विजयकुमार गौतम यांच्या जागी धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष सेवा अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नेमणूक करण्यात आली आहे. विजयकुमार गौतम यांची वित्त विभागात (लेखा व कोषागारे) प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त विभागात (लेखा व कोषागारे) कार्यरत असलेल्या वंदना कृष्णा यांची वित्त विभागात वित्तीय सुधारणा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणी कार्यरत असलेले आर. ए. राजीव यांची वित्त विभागात (व्यय) प्रधान सचिव पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. देसाई यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय येथे तर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसाळ यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी विभागाचे आयुक्त म्हणून तर मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव सूरज मांढरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. रोहयोचे आयुक्त एस. जी. कोलते यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक राजीव निवतकर यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
बँकेत २५ लाख भरणाऱ्यांना आयकरची नोटीस

व्हीएस न्यूज - नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणा-या १ लाख १६ हजार लोकांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करून त्यानंतर आयकर न भरल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय,मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम बँकेत जमा करून आयकर भरणारेही आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

नोटाबंदीनंतर २५ लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यात जमा करणा-या लोकांची संख्या १८ लाख इतकी होती. या १८ लाखांचे वर्गीकरण दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणारे आणि १० ते १५ लाख रुपये जमा करणारे, असे दोन गट तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणा-या १ लाख १६ हजार लोकांनी आतापर्यंत आयकर भरलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

२५ लाखांहून अधिकची रक्कम बँकेत भरणा-या १ लाख १६ हजार लोकांनी अद्याप आयकर भरलेला नाही. त्यांना पुढील ३० दिवसांमध्ये आयकर भरण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे, असे चंद्रा यांना सांगितले. नोटाबंदीनंतर १० ते २५ लाख रुपये बँकेत जमा करून अद्याप आयकर न भरलेल्यांची संख्या २.४ लाख इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली. या २.४ लाख लोकांना दुस-या टप्प्यात नोटीस बजावली जाणार आहे. आयकर कायद्यांतर्गत दाखल होणा-या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही आकडेवारीवरुन समोर आले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आयकर कायद्याखाली २८८ गुन्हे दाखल झाले होते. यंदाच्या वर्षी याच कालावधीत हा आकडा दुपटीने वाढून ६०९ वर जाऊन पोहोचला. यंदाच्या वर्षात आयकर विभागाकडे एकूण १०४६ तक्रारी आल्या होत्या. गेल्या वर्षी हे प्रमाण ६५२ इतके होते. आयकर कायद्यांतर्गत दोषी ठरणा-यांची संख्यादेखील यंदा वाढली आहे. गेल्या वर्षी आयकर कायद्याखाली १३ जण दोषी ठरले होते. यंदा हा आकडा ४३ वर जाऊन पोहोचला आहे.

...Read More

V. S. News
महिलेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

व्हीएस न्यूज - नवी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याबरोबर एका महिलेने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विमान निघून गेल्यामुळे चिडलेल्या महिलेने कर्मचाऱ्याबरोबर वाद घालण्यास सुरूवात केली. वाद इतका विकोपाला गेला की त्या महिलेने रागाच्या भरात त्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा रक्षक तिथे आले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले.

दरम्यान, या महिलेविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. एअर इंडियातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही हरियाणातील पंचकुला शहरात राहणारी आहे. ही घटना मंगळवारी घडली. अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार एका महिला प्रवासीला दिल्लीतून अहमदाबादला जायचे होते. ती उशिराने विमानतळावर पोहोचली होती. त्यामुळे या महिलेचे विमान चुकले. ही गोष्ट त्या महिलेला समजताच ती काऊंटरवरील व्यवस्थापकाशी वाद घालू लागली. सुरूवातीला कर्मचाऱ्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्यास तयारच नव्हती. प्रकरण हातघाईवर आले आणि याच दरम्यान त्या महिलेने त्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर एअर इंडियाच्या इतर अधिकाऱ्यांना याबाबत समजले. घटनास्थळी त्वरीत सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी मध्यस्थी करून महिलेला समजावले आणि वाद संपवला. ही महिला उशिराने विमानतळावर पोहोचली होती, असे एअर इंडियाचे म्हणणे आहे. ही महिला विमान गेल्यामुळे काऊंटरवर गोंधळ घालत होती. त्यानंतर हे प्रकरण चिघळले होते. परंतु, हे प्रकरण आता संपवण्यात आल्याचेही एअर इंडियाने म्हटले आहे. यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनीही एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते. संसदेत याप्रकरणी गोंधळ झाला होता. त्यानंतर गायकवाड यांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास मज्जावही करण्यात आला होता.

...Read More

V. S. News
प्रदीप सिंह खरोला एअर इंडियाचे सीएमडी

व्हीएस न्यूज - वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते.

रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती. बन्सल यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी सरकारने कर्नाटक कॅडरच्या प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली. एअर इंडियांवर सुमारे ५० हजार कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे खरोला यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

...Read More

V. S. News
गुजरातचा २२ वर्षांचा हिशोब द्या - राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

व्हीएस न्यूज - काँग्रेसकडून ६० वर्षांचा हिशोब मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी २२ वर्षांचा हिशोब मागितला आहे. ‘२२ वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या,’ असे ट्विट करत काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला आहे. भाजप गुजरातमध्ये २२ वर्षांपासून सत्तेत आहे. त्याचाच संदर्भ देत राहुल गांधींनी मोदींकडे २२ वर्षांचा हिशोब मागितला आहे.

‘२२ सालों का हिसाब, जनता मांगे जवाब,’ असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधून राहुल यांनी पंतप्रधान मोदींना एक प्रश्नदेखील विचारला आहे. ‘२०१२ मध्ये ५० लाख घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ५ वर्षांमध्ये ४.७२ घरांची उभारणी करण्यात आली. मग घरांचे आश्वासन पूर्ण करायला ४५ वर्षे लागणार का?,’ असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. मोदींनी ५ वर्षांमध्ये ५० लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ५ वर्षांमध्ये ५ लाख घरेदेखील बांधली गेली नसल्याने आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आणखी ४५ वर्षे लागणार का, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये ‘पंतप्रधानांसाठी पहिला प्रश्न’ असे म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींकडून मोदींना दररोज प्रश्न विचारले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राहुल गांधींनी याआधीही ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. ‘साहेब घाबरल्या घाबरल्यासारखे वाटतात. शाह-जादा, राफेलच्या प्रश्नांवर ते गप्प का असतात?,’ असे प्रश्न विचारत राहुल यांनी मोदींवर थेट टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हाफिज सईदच्या सुटकेवरुनही मोदींना टोला लगावला होता. ‘गळाभेट कामी आली नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना चिमटा काढला होता. मोदी आणि ट्रम्प यांच्या गळाभेटीचा संदर्भ देत राहुल यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता. ‘आणखी काही गळाभेटींची गरज आहे,’ असा चिमटादेखील त्यांनी काढला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘हाफिज सईदच्या सुटकेमुळे काँग्रेसचा आनंद गगनात मावेनासा झाला होता,’ असा मोदींनी म्हटले होते.

...Read More

V. S. News
कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरणातील तिघाही नराधमांना फाशीची शिक्षा

व्हीएस न्यूज - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीशांनी अवघ्या काही मिनिटांतच शिक्षेची सुनावणी केली. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच पीडित मुलीच्या आई-वडिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. शिक्षेची अंमलबजावणी त्वरीत व्हावी अशी इच्छा पीडितेच्या आईने केली. निकालाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील उपस्थित नव्हते.

न्यायाधीशांनी शिक्षा सुनावल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. निकम म्हणाले की, मुख्य आरोपीसह बलात्काराचा कट रचणाऱ्या दोघांना न्यायालयाने मृत्यूदंडांची शिक्षा सुनावली. या दोषींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. मुख्य आरोपी पप्पू बाबूलाल शिंदे याला बलात्कार आणि खून प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. आरोपी संतोष भवाळ याने न्यायालयीन कामकाजात अडथळे निर्माण केल्यामुळे त्याला १८ हजार रुपये दंड सुनावण्यात आला होता. त्याने अद्यापही ही रक्कम भरलेली नाही. ही रक्कम महसुलीची थकबाकी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी वसूल करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आरोपी क्रमांक १ जितेंद्र शिंदे, आरोपी क्र. २ संतोष भवाळ आणि आरोपी क्र. ३ नितीन भैलुमे यांना खून आणि बलात्कार प्रकरणी शिक्षा ठोठावली. आरोपी एकला पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा, बलात्कार केल्यामुळे जन्मठेप आणि २० हजार रूपये दंड. आरोपी २ व ३ यांनी बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा. आरोपी एकला खून आणि बलात्कारप्रकरणी फाशी, बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी फाशी, आरोपीने दोनने खर्च भरला नाही त्यामुळे १८ हजार रूपये नगर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलची थकबाकी म्हणून वसूल करावा, असे आदेश दिलेत. कोपर्डीत राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीची १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. शनिवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुवर्णा केवले यांनी तिघाही आरोपींना दोषी ठरवले होते. दरम्यान तिन्ही आरोपींना शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेता येईल. तिथे त्यांना वकीलही मिळेल.

दरम्यान, न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला होता. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले होते पण कोणालाही आत प्रवेश देण्यात आला नव्हता. पोलीस प्रमुखांनीही सकाळी सुरक्षेचा आढावा घेतला होता.

गेल्या आठवड्यात भैलुमेचे वकील तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद केला. सुमारे सव्वातास युक्तिवाद सुरु होता. दोषींना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी निकम यांनी १३ कारणे दिली. जितेंद्रने पीडितेवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. बलात्कारानंतर जितेंद्रने त्याच्या साथीदारांना मिस कॉल दिला होता. घटना घडली तेव्हा हे दोघेही जवळच दबा धरुन बसले होते. संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे निकम यांनी न्यायालयात सांगितले. इंदिरा गांधींची हत्या आणि संसदेवरील हल्ला या प्रकरणांमध्ये सूत्रधारांना फाशीची शिक्षा झाली होती, याकडेही निकम यांनी लक्ष वेधले होते.

बचावपक्षाने केलेला युक्तिवाद

शिंदे याच्यावतीने वकील योहान मकासरे व भैलुमेच्यावतीने वकील प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद करताना कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. आरोपी निर्दोष आहेत, खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, १२० ब (कट कारस्थान रचणे) व १०९ (गुन्ह्य़ाला प्रोत्साहन देणे) हे कलम लागूच होत नाही. भैलुमे हा सराईत गुन्हेगार नाही, पूर्वी त्याच्यावर गुन्हेही दाखल नाहीत. तो बीएससीचे शिक्षण घेत आहे. तो दलित आहे. कुटुंबाचा आधार आहे. त्याची आई आजारी असते. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. वडील मजुरी करतात. त्यामुळे कमीत कमी शिक्षा करावी, असा युक्तीवाद आरोपीचे वकील आहेर यांनी केला. शिंदे याच्या वतीने युक्तिवाद करताना वकील मकासरे यांनी,ही घटना दुर्मिळात दुर्मीळ नाही, आरोपी तरुण आहे, गुन्हेगार नाही. त्याला पत्नी आहे, असे सांगत फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती केली होती.

या कलमांखाली ठरवले होते दोषी

न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड विधानातील कलम ३०२ (हत्या), ३७६- २ ब (बलात्कार करुन जखमी करणे), १२० ब (फौजदारी स्वरुपाचा कट रचणे), १०९ (गुन्ह्याला प्रोत्साहन देणे), ३५४ (छेड काढणे), बालंकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ६, ८, १६ अन्वये दोषी ठरवण्यात आले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!