Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
१३७ उमेदवारांवर गंभीर गुन्ह्य़ांची नोंद

व्हीएस न्यूज - गुजरात विधासभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९७७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील ९२३ उमेदवारांचे विश्लेषण केले असता, १३७ उमेदवारांविरोधात गंभीर गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यात खून, अपहरण, बलात्कार यांचे आरोप असल्याचे दोन स्वयंसेवी स्वंस्थांनी केलेल्या विश्लेषणात उघड झाले आहे. जवळपास १५ टक्के उमेदवार असे आहेत.

असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स व गुजरात इलेक्शन वॉच या संस्थांनी विश्लेषण केले. भाजपच्या ८९ पैकी १० उमेदवारांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. तर काँग्रेसचे असे २० उमेदवार आहेत. ५४ उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र अपुरे असल्याने त्याचे विश्लेषण करता आले नाही असे गुजरात इलेक्शन वॉचचे पंकज जोग यांनी स्पष्ट केले. संयुक्त जनता दलाचे माजी आमदार छोटू वसावा यांचा मुलगा महेश याच्याविरोधात सर्वाधिक २४ गुन्हे आहेत.

२१ टक्के उमेदवार करोडपती….

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९९७ उमेदवारांपैकी १९८ म्हणजेच २१ टक्के उमेदवार करोडपती आहेत. त्यापैकी ६० जणांनी आपली मालमत्ता पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. राजकोट पश्चिममधील काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरू हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी १४१.२२ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.

पंतप्रधानांचा कार्यकर्त्यांशी संवाद

अहमदाबाद : चौफेर टीका होऊनही देश आत्मविश्वासाने पुढे जात असून चारही बाजूंनी चांगल्या बातम्या येत आहेत अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील निकालावर व्यक्त केली. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी साडेसात हजार महिला कार्यकर्त्यांशी नमो अ‍ॅपच्या माध्यमातून संवाद साधला. जनतेने साथ दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

...Read More

V. S. News
बेपत्ता होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता लोकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ४९ हजार महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ महिला नाहीशा होण्यामागे महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे ही बाब चिंताजनक आहे.

विशेष बाब म्हणजे बेपत्ता घटनांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातून ९४ हजार ९१९ लोक नाहीसे झाले आहेत. पश्चिम बंगालपाठोपाठ पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. राज्यातून ४९ हजार ३३८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. देशभरातून गेल्या वर्षभरात ५ लाख ४९ हजार नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी २ लाख २९ हजार ३८१ नागरिकांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला यश आले असून, अजूनही ३ लाख १९ हजार नागरिकांची नोंद बेपत्ता नागरिकांच्या यादीत आहेत. यामध्ये १ लाख ७४ हजार ८१६ महिला आहेत.

हेतूपूर्वक अत्याचारातही आघाडी

हेतूपूर्वक करण्यात आलेल्या महिलांवरील हल्ल्यांमध्येही महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. राज्यात तब्बल ११ हजार ३९६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आहे. या गुन्ह्यांच्या बरोबरीने ६४ हजार ५१९ जणींचे अपहरण झाल्याची नोंद आहे. अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये दुस-या, तर बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर आहे. अशामध्ये राज्यातून ६ हजार १७० स्त्रियांचे अपहरण करण्यात आले आहे. तर ४१८९ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींपासून वयोवृद्ध महिलांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमधून ५३ हजार ६५४ महिला बेपत्ता आहेत. पश्चिम बंगालमधून अनेकदा नोकरीच्या बहाण्याने महिलांना मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये वेश्याव्यवसायात अडकविले जात असल्यामुळे त्यांचे नाहीसे होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी परिस्थिती असताना पश्चिम बंगालपाठोपाठ राज्यातूनही महिला नाहीशा होण्याचे प्रमाण सर्वाधिक असणे ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.

काही महिला प्रेमभंग, पूर्ववैमनस्य, ऑनर किलिंग, एकतर्फी प्रेमाच्या शिकार ठरतात. यामध्ये अनेकदा त्यांची हत्या करण्यात येते. मात्र मृतदेह सापडत नाहीत. काही जणी स्वत:हून पळून जातात, भवितव्य घडविण्यासाठी, नोकरीच्या शोधात अनेक जणी घर सोडतात. अशा विविध बाबी महिला बेपत्ता होण्यामागे असतात.

प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक.

...Read More

V. S. News
राहुल गांधी प्रश्न विचारण्यास शिकले : स्मृती इराणी

व्हीएस न्यूज - उत्तरांना प्रश्न करणारे राहुल गांधी आता कमीत कमी प्रश्न विचारायला शिकले, असा टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लगावला आहे. जी व्यक्ती आजपर्यंत उत्तरांना प्रश्न विचारायची, ती व्यक्ती कमीतकमी प्रश्न विचारायला शिकली, अशा शब्दांमध्ये इराणी यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. याबद्दल स्मृती इराणी यांना विचारण्यात आले असता, त्यांनी राहुल गांधी यांना चिमटा काढला. आज राहुल गांधींनी खासगी वीज कंपन्या आणि महागडे वीज दर यावरून मोदींना लक्ष्य केले. सरकारी वीज निर्मिती प्रकल्पांमधील निर्मिती कमी करुन ४ खासगी कंपन्यांचे खिसे का भरले?, असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.

जनतेच्या पैशांची मोदींनी लूट का केली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. २००२-१६ या काळात ६२ हजार ५४९ कोटी रुपयांची वीज खरेदी करून ४ खासगी कंपन्यांचे खिसे का भरण्यात आले? सरकारकडून केली जाणारी वीज निर्मिती क्षमता ६२ टक्क्य़ांनी कमी करुन ३ रुपये प्रति युनिट दराने मिळणारी वीज खासगी कंपन्यांकडून २४ रुपये दराने का खरेदी करण्यात आली?, असे प्रश्न राहुल गांधींनी ट्विटरवरून विचारले आहेत. जनतेच्या कमाईची लूट का करण्यात आली? असा सवालदेखील राहुल गांधींनी या ट्विटमधून उपस्थित केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, २२ वर्षाचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या, असे ट्विट करून राहुल गांधींकडून दररोज मोदींना प्रश्न विचारले जात आहेत. काल (गुरुवारी) राहुल गांधींनी मोदींच्या जाहिरातबाजीमुळे गुजरातवर कर्जाचा डोंगर असल्याची टीका केली होती. मोदींच्या जाहिरातबाजीचा आर्थिक भार जनतेने का वाहायचा, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता.

‘१९९५ मध्ये गुजरातवर ९ हजार १८३ कोटी रुपयांचे कर्ज होते. २०१७ मध्ये कर्जाचा हा आकडा २ लाख ४१ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच गुजरातमधील प्रत्येक व्यक्तीवर ३७ हजार रुपयांचे कर्ज आहे, अशी आकडेवारी राहुल यांनी ट्विटमध्ये दिली होती. तुमच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाची आणि जाहिरातबाजीची शिक्षा जनतेने का भोगायची?, असा सवाल राहुल गांधींनी मोदींना विचारला होता.

...Read More

V. S. News
पोलिसांचे संरक्षण हवे? एक लाख भरा!

व्हीएस न्यूज - पोलिसांची खासगी सुरक्षा घेणा-यांना आता आपला खिसा अधिकच रिकामा करावा लागणार आहे. कारण आता पोलिसांची खासगी सुरक्षा घेण्यासाठी एक लाख रुपये इतकी घसघशीत रक्कम आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत ही रक्कम ७५ हजार रुपये इतकी होती. राज्य सरकारतर्फे हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यासंबंधी आलेल्या प्रस्तावाला मुख्य न्यायधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंजुरी दिली आहे.

ब्लॅकमेलर, चोर, दरोडेखोरांपासून जीवाला धोका असणारे अनेक जण पोलिसांचे संरक्षण घेतात. संरक्षण घेणा-याची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल, तर सर्वसामान्यांच्या करातील पैशांचा वापर यासाठी का करावा, असा सवाल उपस्थित केला होता. यापुढे पोलीस संरक्षण घेण्यासाठी राज्य सरकारला दरमहिना एका हवालदारासाठी ९५,४१८ रुपये, तर पोलीस नाईकसाठी १.२ लाख रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ टक्क्यांहून जास्त नसणार याचीही राज्य सरकार काळजी घेईल. तीन महिन्यांच्या सुरक्षेचा खर्च अनामत रक्कम म्हणून सरकारच्या खात्यात भरावी लागणार आहे.

तसेच पोलीस गाडीची मागणी असल्यास अधिकचे पैसे आकारले जाणार आहेत. दरम्यान, पन्नास हजारपेक्षा कमी उत्पन्न असणा-यांना ही रक्कम भरावी लागणार नाही. राज्य सरकारचे वकील आशुतोष कुंभारकोनी यांनी राज्य सरकारच्या या नव्या नियमाचा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती मंगेश सोनक यांच्यापुढे सादर केला होता.

...Read More

V. S. News
कॉंग्रेसच्या वीणा हेमंत सोनवणे यांचे नगराध्यक्षपद कायम

सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

कॉंग्रेसच्या वीणा हेमंत सोनवणे पुढील चार वर्ष पाहणार कारभार

व्हीएस न्यूज - डिसेंबर २०१६ मध्ये जेजुरी नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती.त्यामध्ये नगराध्यक्ष पद हे ओ.बी.सी महिला प्रवर्गासाठी राखीव होते.या निवडणुकीत कॉंग्रेसच्या विना सोनवणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मीनल बारभाई यांच्यामध्ये मुख्य स्पर्धा होती.यामध्ये कॉंग्रेसच्या वीणा हेमंत सोनवणे या विजयी झाल्या होत्या.परंतु निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मीनल बारभाई यांनी अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीकडे अपील केले होते.वीणा सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र वैध नाही असा आक्षेप घेतला होता . जून २०१७ मध्ये अहमदनगर जात पडताळणी समितीने त्यांची कागदपत्रे पाहिल्यानंतर त्या कुलवंत वाणी आहेत असे निदर्शनात आणून देत त्यांचे नगराध्यक्ष पद रद्द केले होते.त्याविरुद्ध नगराध्यक्षा विना सोनवणे यांनी बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर अपील केले होते .हायकोर्टाने अहमदनगर जात पडताळणी समितीचा निर्णय योग्य ठरविला होता.वीणा सोनवणे यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये हायकोर्टाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केले होते.दि.२९ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने वीणा सोनवणे यांचे बाजूने निर्णय दिला असून त्याची जात वाणी आहे असे स्पष्ट केले . पंजोबा आणि आजोबा यांची जात वाणी आहे त्या संबंधीचे पुरावे देऊन स्पष्ट केले. जरी वीणा सोनवणे यांच्या वडिलांनी कुलवंत वाणी अशी जात लावली असली तरीही ती जात ग्राह्य धरली जाणार नाही.जी आजोबा व पंजोबाची जात आहे आणि जे पुरावे १९४७ च्या अगोदरचे आहेत तेच पुरावे ग्राह्य धरले जातील असे स्पष्ट केले.आणि सांगितले की जात ही बदलता येत नाही आणि आजोबा पंजोबा यांनी जी जात नमूद केलेली आहे तीच जात वीणा हेमंत सोनवणे यांची राहील असा निर्णय दिला. त्यामुळे १९४७ चे वीणा सोनवणे यांचे पुरावे ग्राह्य धरले गेले. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द केला व वीणा हेमंत सोनवणे यांना नगराध्यक्ष पद पुन्हा बहाल केले.या निर्णयामुळे येत्या १३ डिसेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे.
...Read More

V. S. News
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे भन्ते प्रज्ञानंद यांचे निधन

व्हीएस न्यूज - राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६१ वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. या धर्मांतराच्या मुख्य सोहळ्यात सहभागी झालेल्या सात बौद्ध धर्मगुरुंपैकी एक असणारे भन्ते प्रज्ञानंद यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला, ते ९० वर्षांचे होते.

वृद्धापकाळामुळे गेल्या दोन वर्षांपासून भन्ते प्रज्ञानंद हे श्वासाच्या विकाराने त्रस्त होते. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्यांना त्रास होता. दरम्यान, ताप आणि छातीत दुखत असल्याने त्यांना २६ नोव्हेंबरपासून लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिवर्सिटीमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक प्रा. एस. एन. शंखवार यांनी सांगितले.

भन्ते प्रज्ञानंद हे लखनऊ येथील बुद्ध विहाराची व्यवस्था पाहणारे सर्वात वरिष्ठ भन्ते होते. त्यांचे शिष्य भन्ते सुमन यांनी ही माहिती दिली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी नागपुरातील दीक्षाभूमीवर केलेल्या धर्मांतरावेळी त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणाऱ्या सात भन्तेंपैकी ते एक होते, असे भन्ते सुमन यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
खेळाडूंना सरकारकडून गाय बक्षीस ; मंत्र्यांकडून घोषणा

व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा सरकारकडून रोख रक्कम, सरकारी नोकरी, जमीन अशी बक्षीसे दिली जातात. आता या यादीत गायीचे नावदेखील जोडावे लागणार आहे. हरयाणाचे पशुसंवर्धन मंत्री ओम प्रकाश धनकर यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंना गाय बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.

हरियाणा बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख असलेल्या धनकर यांनी रोहतकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दुधाचे फायदे सांगितले. ‘गायीच्या दूधात फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे बॉक्सर्ससाठी फायदेशीर आहे. गायी कायम सक्रीय असतात. तर म्हशी बराच वेळा झोपेतच असतात,’ असे धनकर यांनी म्हटले. बॉक्सर्सनी जगात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांना कायम अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या गायी देशी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. या गायी दिवसाला १० लीटर दूध देतील, असेही ते म्हणाले. नीतू (४८ किलो वजनी गट), ज्योती गुलिया- (५१ किलो वजनी गट),साक्षी धंदा (५४ किलो वजनी गट), शशी चोपडा (५७ किलो वजनी गट), अनुपमा (८१ किलो वजनी गट), नेहा यादव (८१ किलो वजनी गट) यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली होती. या सर्व खेळाडूंच्या घरांचे पत्ते घेण्यात आले असून लवकरच त्यांच्या घरी गायी पोहोचवल्या जातील, असे धनकर यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या या घोषणेमुळे खेळाडू आश्चर्यचकीत झाले आहेत. याबद्दल बोलताना, ‘मला आतापर्यंत अनेक बक्षीसे मिळाली. देवदेवतांच्या मूर्तीं, पुस्तके देऊन अनेकदा कामगिरीचे कौतुक झाले. मात्र कधीच गाय मिळाली नव्हती. मला गाय खूप आवडते. गेल्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकला चांदीची गाय देण्यात आली होती, असे मी वाचले होते. मात्र मला खरीखुरी गाय बक्षीस म्हणून मिळाली आहे,’ अशी प्रतिक्रिया नीतूने दिली.

...Read More

V. S. News
मुंबईत मनसे- काँग्रेसमधील संघर्ष पेटला, काँग्रेस कार्यालयात तोडफोड

व्हीएस न्यूज - मुंबईत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला असून इट का जवाब पथ्थर से मिलेगा’, असा धमकीवजा इशाराच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

रविवारी विक्रोळीत मनसेकडून मराठी पाट्या लावण्यासाठी दुकान मालकांना निवेदन दिले जात होते. यादरम्यान, काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या घटनेत मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि अन्य चार जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मनसेवर टीका केली होती. मनसेच्या गुंडांनी परत मारा खाल्ला, असं खोचक ट्विट त्यांनी केले होते.

विक्रोळीतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हल्ला केला. कार्यालयातील काचा आणि सामानाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ‘ईद’निमित्त कार्यालय बंद होते, असे समजते. या हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे कार्यालयाची पाहणी करणार आहेत. सुरुवातीला हा हल्ला कोणी केला याबाबत संभ्रम होता. मात्र, मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विटर हा हल्ला मनसेनेच केल्याचे सांगितले आणि संभ्रम दूर झाला.

...Read More

V. S. News
परप्रांतियांमुळे मुंबईच्या वैभवात भर : मुख्यमंत्री

व्हीएस न्यूज - उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय. डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.

मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे. भाषा हे संपर्काचे साधन आहे. भाषा माणसाला जोडते त्यामुळे भाषा हे विवादाचे माध्यम होऊ शकत नाही. हा वाद निर्माण करणे चुकीचे आहे.

मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये. मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहेच. पण याच मराठी आणि मुंबईतील संस्कृतीबरोबर उत्तर भारतीय संस्कृतीही एकजीव झाली आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सध्या मुंबईत काही लोक उत्तर भारतीय लोकांना निशाणा करत आहेत. परंतु आम्ही सक्षम असून तक्रार करण्याआधीच अशा लोकांवर कारवाई करत आहोत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मनसेला लगावला आहे. या वक्तव्यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना भैय्या भूषण पुरस्कार

आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण नाही, तर भैय्या भूषण हा पुरस्कार नक्की मिळेल, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ‘मॅच फिक्स’

व्हीएस न्यूज - राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा येण्यापूर्वीच पक्षामध्ये विरोधी आवाज उमटू लागला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेताना‘ते इलेक्टेड नव्हे, तर सिलेक्टेड अध्यक्ष’ होणार आहेत, असा आरोप केला आहे. शिवाय पक्षात घराणेशाही असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी केवळ निवड होणार आहे. याला निवडणूक म्हणता येणार नाही. या निवडणुकीत मतदान करणा-या प्रतिनिधींचे मत आधीच फिक्स झाले आहे. राहुल यांना निवडून आणण्यासाठीच या प्रतिनिधींच्या ठराविक पदांवर नियुक्त्या झाल्या असल्याचा आरोप शहजाद पूनावाला यांनी केला. असे आरोप करण्यासाठी हिंमत लागते. या आरोपांनंतर माझ्यावर हल्ले होऊ शकतात. पण मी सत्य तेच बोलत आहे. पक्षामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पद मिळायला हवे, असेही पुनावाला यांनी सांगितले.

राहुल गांधींवरील आरोपांमुळे पूनावाला भावंडांचे नाते मात्र अडचणीत आले आहे. शहजाद यांचे बंधू तहसीन यांनी आपल्या भावासोबतचे नाते तोडले आहे. शहजाद यांच्यावर तोफ डागताना राहुल यांच्यावर शहजाद यांनी केलेली टीका अत्यंत खेदजनक असल्याचे तहसीन पूनावाला यांनी म्हटले आहे. शहजादच्या आरोपांमुळे आपण व्यथित झाल्याचे तहसीन यांनी सांगितले. शिवाय आजपासून आपण शहजादशी भाऊ म्हणून असलेले नाते तोडत असल्याचेही त्यांनी ट्विटरवरुन जाहीर केले. तहसीन पूनावाला काँग्रेसचे समर्थक असून ते रॉबर्ट वाड्रा यांचे मेहुणेही आहेत.

दरम्यान, काँग्रेसने एक परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहे. यात म्हटले आहे की, शहजाद पूनावाला मागच्या समितीत होते. यावेळी जी समिती स्थापना झाली आहे, त्यात ते नाहीत. इतकेच नाही तर यावेळी ते काँग्रेसचे सदस्यही बनलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य गांभिर्याने घेऊ नये.

...Read More

V. S. News
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता

व्हीएस न्यूज - माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. पक्षाची नोंदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र कालच प्राप्त झाले.

दरम्यान, पक्षाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता पक्षाचा अधिकृत ध्वजही लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसमुक्त झाल्यानंतर राणे यांनी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली होती. त्याचवेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष नोंदणीसाठी अर्जही सादर केला होता. पक्ष नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून आयोगाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मान्यता दिल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करताना राणे यांनी आपण लवकरच राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्ष नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाले नव्हते. निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी झाल्यानंतर लवकरच ध्वजही जाहीर केला जाणार असून त्यानंतर राणे आपला राज्याचा दौरा करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून येत्या ८ ते १० डिसेंबर दरम्यान ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार आहेत. आता राज्यभरात दौरे, बैठका व सभा घेऊन सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

...Read More

V. S. News
एक रुपयाच्या नोटेची शतकपूर्ती!

व्हीएस न्यूज - भारतीय चलनात असलेल्या एक रुपयाच्या नोटेला ३० नोव्हेंबर २०१७ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. चांदीचे नाणे ते कागदी नोट असा एक रुपयाच्या चलनाचा प्रवासही रंजक आहे.

भारतात ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये चलनात आलेली एक रुपयाची नोट आजच्या चलनी नोटांच्या तुलनेत जरा साधीच वाटते. फिकट, पिवळसर रंगाच्या या नोटेचीही काही खास वैशिष्टय़े आहेत. इंग्लंडमध्ये छापण्यात आलेल्या या नोटांच्या दर्शनी बाजूला वर डाव्या कोप-यात इंग्लंडचे राजे जॉर्ज पंचम यांची प्रतिमा असलेल्या नाण्याचा छाप आहे. नोटेच्या याच बाजूला वरच्या उजव्या कोप-यात तसेच खालच्या डाव्या कोप-यात १ रुपी असे इंग्रजीत लिहिले आहे.

पहिल्या महायुद्धाचा तो काळ होता आणि भारतात इंग्रजांची सत्ता होती. त्यावेळी भारतात एक रुपयाचे नाणे चलनात होते. हे नाणे चांदीपासून बनविले जात होते. मात्र युद्धादरम्यान चांदीचे नाणे बनवणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे १९१७ मध्ये पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आणली गेली आणि या नोटेने चांदीच्या नाण्याची जागा घेतली.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, एक रुपयाच्या नोटेची छपाई पहिल्यांदा १९२६ मध्ये बंद करण्यात आली होती. कारण नोट छापण्याचा खर्च परवडत नव्हता. त्यानंतर १९४० मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली, जी १९९४ पर्यंत सुरू होती. त्यानंतर २०१५ मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली.

गेल्या शंभर वर्षात एक रुपयाच्या १२५ वेगवेगळ्या नोटा चलनात आल्या. एकूण २८ वेळा या नोटांचे डिझाईन बदलले गेले. एक रुपयाचे मूल्य आज खूप जास्त नसले तरी रुपयाच्या नोटेचे महत्त्व मात्र कायम आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्लंडच्या राजाऐवजी भारतीय राजमुद्रेला एक रुपयाच्या नोटेवर स्थान मिळाले. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर जारी करण्यात आलेली एक रुपयाची नोट काही काळ पाकिस्तानातही चलनात होती.

केवळ एक रुपयाची नोटच भारत सरकार थेट चलनात आणते, तर बाकीच्या नोटा रिझर्व्ह बँकेमार्फत चलनात आणल्या जातात. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेवर ‘भारत सरकार’ असा उल्लेख असतो आणि भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. कायद्याच्या आधारे एक रुपयाची नोट ही ख-या अर्थाने ‘मुद्रा नोट’ (करन्सी नोट) आहे. इतर नोटा या ‘प्रॉमिसरी नोट’ असतात. प्रॉमिसरी नोटांवरुन केवळ नमूद रक्कम देण्याचे वचन दिले जाते.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!