व्हीएस न्यूज – भारतीय संघ १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम करेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे. सौरव गांगुली क्रिकेट ईयर बुक या पुस्तकाच्या २० व्या वर्धापनदिनी पत्रकारांशी बोलत होता. मंगळवारी भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २०३ धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे.
गांगुलीने यावेळी शुभमन गिल, कमलेश नागरकोटी, शिवम मावी आणि ईशान पोरेल हे खूप प्रतिभावान खेळाडू संघात असल्याचे मत मांडले. भारतीय क्रिकेट व्यवस्थेची संरचना खूप चांगली आहे आणि या संरचनेशिवाय तुम्ही क्रिकेटपटू तयार करू शकत नाही. भारतीय क्रिकेटच्या या संरचनेतून हे खेळाडू तयार झाले आहेत. भारतीय क्रिकेट पुढील पाच वर्षांत ऑस्ट्रेलिया व इंग्लंडला मागे टाकून जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघ बनेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. इंडियन प्रीमियर लीगची क्रिकेटप्रेमींमध्ये खूप आवड आहे, ते स्टेडियम गच्च भरू शकतात. आयपीएल क्रिकेटप्रेमींच्या पाठिंब्यामुळे खूप पुढे जाईल, असे गांगुली म्हणाले. भारत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली नक्की जिंकेल. भारताने प्रत्येक सामन्यात सहज विजय मिळविला असून ऑस्ट्रेलियाचा १०० धावांनी पराभव केला होता. त्याची पुर्नरावृत्ती अंतिम सामन्यात भारताने करावी, अशी आशाही गांगुलीने व्यक्त केली. बंगालचा मध्यमगती गोलंदाज इशान पोरेलने उपांत्य फेरीत ६ षटकात १७ धावात ४ बळी घेतल्याबद्दल विचारले असता गांगुली म्हणाला की, तो बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या व्हिजन २०२० चा खेळाडू आहे.
व्हीएस न्यूज – भाजप नेते एकनाथ खडसे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करणाऱ्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिले असून सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही. आधी सत्तेतून त्यांनी बाहेर पडावे आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ खडसेंवर बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून विखारी टीका करण्यात आली होती. काँग्रेस- राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना खुली ऑफर आहे. पण अशी ऑफर पदर ढळल्यावर येणारच. याच जन्मात या जन्मातली कर्माची फळ फेडायची असतात, अशा शब्दात शिवसेनेने एकनाथ खडसेंवर निशाणा साधला होता. आता शिवसेनेवर एकनाथ खडसेंनीही पलटवार केला आहे. शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे, मग आमच्यावर टीका करावी, असे त्यांनी म्हटले आहे. सत्ता सोडण्याची शिवसेनेची हिंमत नसून ते सत्तेत राहुनच भाजपवर टीका करत राहतील, असे सांगत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला.
व्हीएस न्यूज - टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने प्रवेश केल्यापासून इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. ग्राहकांना जिओकडून मोफत इंटरनेट मिळत असल्याने इतर टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्लॅनमध्ये वारंवार बदल करावे लागत आहेत. आता आपल्या १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये व्होडाफोनने नुकताच एक बदल केला आहे. १९८ रुपयांमध्ये आता ग्राहकांना १.४ जीबी डेटा मिळू शकणार आहे. यासोबतच युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल, रोमिंग कॉल आणि दिवसाला १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत.
जिओ, एअरटेल, आयडीया आणि व्हो़डाफोन या कंपन्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार स्पर्धा सुरु आहे. व्होडाफोनने आता जाहीर केलेल्या प्लॅनची स्पर्धा एअरटेलच्या १९९ रुपये आणि जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानशी आहे. ग्राहकांना या दोन्ही प्लॅनमध्ये इंटरनेट आणि इतर सुविधा देऊन खूश करण्यात येत आहे. ग्राहकांना व्होडाफोनच्या १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये आधी दिवसाला १ जीबी डेटा मिळत होता. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दिवसाला १०० मेसेजेस फ्री मिळत होते. दरम्यान या प्लॅनमध्ये कॉलसाठी दिवसाला २५० मिनिटे आणि आठवड्याला १००० मिनिटांची लिमिट ठरवण्यात आली असल्यामुळे व्होडाफोन ग्राहकांना जास्त इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे.
व्हीएस न्यूज - नवीन चलनी नोटा आणि नाणी तपासणी करावी, असे आदेश भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारला दिले आहेत. यात मुख्यतः 50 व 200 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नवीन नोटा ओळखणे दृष्टिहिनांना कठीण आहे, असा आक्षेप न्यायालयाने घेतला आहे.
ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ ब्लाईंड ही स्वयंसेवी संस्था, एक कंपनी सेक्रेटरी आणि तीन वकीलांनी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. केंद्र आणि रिझर्व्ह बँकेने 200 रुपये आणि 50 रुपये किमतीच्या नवीन चलनी नोटांची पाहणी करावी कारण त्यांचा आकार व त्यावरील संकेत यांमुळे दृष्टीहीन लोकांना त्यांचा वापर करताना अडचणी येत आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
“हा मुद्दा तुम्ही (केंद्र सरकार, आरबीआय आणि याचिकाकर्ता) एकत्रितपणे सोडविण्याजोगा आहे. तुम्ही एकत्र बसा आणि तो सोडवा,” असे खंडपीठाने स्पष्ट केले. पूर्वी वापरात असलेल्या नोटांसारखा त्यांचा आकार का करता येत नाही, असा प्रश्नही न्यायालयाने केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) संजय जैन यांना विचारला.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी असून त्यापूर्वी आपले मत मांडण्यास न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले आहे. या नवीन 50 रुपयांच्या नोटांवरदृष्टिहिन लोकांनी अन्य नोटांपासून त्या वेगळ्या ओळखण्यासाठी कोणतीही खूण नाही, असे या याचिकेत म्हटले आहे. तसेच या नोटांची छपाई थांबवावी आणि विद्यमान नोटा रद्द कराव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज – भाजपने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांना घातलेल्या महागड्या जॅकेटमुळे लक्ष्य केले. यावर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत असल्यानेच भाजप निराश झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भाजप नेत्यांना राहुल गांधींच्या जॅकेटच्या किमती पाहण्याशिवाय दुसरे काम नाही का, अशा शब्दांत भाजपची खिल्ली उडवली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी हे मेघालयामध्ये प्रचार करत आहेत. त्यांनी यावेळी घातलेले जॅकेट हे ब्रिटनच्या प्रसिद्ध ब्रँडचे असून त्याची किंमत सुमारे ७० हजार रुपये असल्याचा दावा भाजपने केला. यावर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या आरोपाची खिल्ली उडविली. ते जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना हवे असेल तर मी ७०० रुपयांमध्ये आणू शकते. त्यांच्या छातीचे ५६ इंचाशिवाय दुसरे माप आपल्याला माहीत नसल्याचेही त्यांनी उपरोधिकपणे म्हटले.
मला यावर हसावे की रडावे ते कळत नाही. राहुल गांधींच्या जॅकेटच्या किमती पाहण्याशिवाय भाजप कार्यकर्त्यांना दुसरे काम नाही का? भारतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले असताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नावाचे जॅकेट घातले होते. त्यानंतर या जॅकेटचा कोट्यवधी रुपयांत लिलाव करण्यात आला होता. तेच सरकार राहुल गांधींच्या जॅकेटवरून राजकारण करत आहे, असेही चौधरी म्हणाल्या.
व्हीएस न्यूज - केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या घोषणेमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी घटवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे पेट्रोल-डिझेल २ रूपयांनी स्वस्त झाले आहे. क्रूड तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने आणि भारतीय रूपयात आलेल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. आयओसीच्या वेबसाईटवर मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत दिल्लीत पेट्रोलचे दर २.९५ रुपयांनी वाढले आहे. दरम्यान पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी सरकारने २ रूपयांनी घटवून ४.४८ रूपये प्रति लिटर केली आहे. तेच डिझेलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ६.३३ रूपये प्रति लिटर केली आहे.
व्हीएस न्यूज – भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर कोणते राजकीय पर्याय उपलब्ध असतील हे येणारा काळच ठरवेल, असे सुचक वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आपला आगामी लोकसभा निवडणूकही लढवण्याचा निर्धार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. कारण आपल्याला भाजप तिकीट देईल का नाही याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी शत्रुघ्न सिन्हा यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचामध्ये सामील झाले होते. यामध्ये अभिनेते आणि दुखावलेले अनेक राजकारणातील व्यक्ती सामील झाल्या आहेत. मला मत व्यक्त करण्याचा अधिकार भाजपमध्ये नसल्यामुळे या राष्ट्रीय मंचामध्ये मी सामील झालो असल्याचे सिन्हा म्हणाले. राजकारणात एक स्वतंत्र विचार मांडण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ उभे केले असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना सिन्हा म्हणाले की, भाजप मला तिकिट देईल कि नाही हे मला माहीत नाही. परंतु, मला त्यांना हेच विचारावे लागेल की ते मला तिकीट का देऊ शकणार नाहीत. माझ्याजवळ मोठा मतदार वर्ग असल्यामुळे मला निवडणुकीची भीती नाही. त्यामळे मी काय निर्णय घ्यावा हा येणारा काळच ठरवेल असे सूचक वक्तव्य सिन्हा यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज – गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात राष्ट्रपतींसह संसदेतील लोकप्रतिनिधींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार राष्ट्रपतींचे मानधन आता पाच लाख, उपराष्ट्रपतींचे मानधन ४ लाख आणि राज्यपालांना प्रत्येक महिन्याला ३ लाख एवढे घसघशीत मानधन मिळेल. जेटलींनी यावेळी खासदारांनाही नाराज केले नाही. २०१८ सालापासून खासदारांचे मानधनात वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच हे मानधन दर पाच वर्षांनी महागाईचा दर लक्षात घेऊन वाढवण्यात येईल, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.
दरम्यान खासदार वरुण गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच खासदारांच्या वेतनात वाढ करू नये अशी मागणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे केली होती. सुमारे ४४० कोट्यधीश खासदार सोळाव्या लोकसभेत असल्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ करू नये, अशा आशयाचे पत्र त्यांनी महाजन यांना दिले आहे. याचवेळी त्यांनी खासदारांनाही आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या खासदारांनी आपले उर्वरित काळातील वेतन सोडावे, असे आवाहन केले होते. लोकसभेतील प्रत्येक खासदाराकडे सरासरी १४.६१ कोटी रूपयांची तर राज्यसभेतील प्रत्येक खासदाराकडे २०.१२ कोटींची संपत्ती आहे. अशावेळी महाजन यांनी लोकसभेच्या अध्यक्ष या नात्याने कोट्यवधींची संपत्ती असलेल्या खासदारांना वेतन घेऊ नये असे अपील करावे. वरूण यांनी आपल्या पत्रात एक उदाहरणही दिले आहे.
यापूर्वीच ३ लाखांहून अधिक बनावट कंपन्यांचे परवाने रद्द
कंपन्यांनाही काढावे लागणार ‘आधार कार्ड’
व्हीएस न्यूज - देशातील बहुतांश नागरिकांकडे स्वत:चा एक क्रमांक आहे म्हणजेच आधार कार्ड आहे. पण आता सरकार लवकरच कंपन्यांना त्यांचा स्वतंत्र ओळख क्रमांक देणार आहे. देशातील बहुतांश नागरिकांकडे स्वत:चा एक क्रमांक आहे म्हणजेच आधार कार्ड आहे. पण आता सरकार लवकरच कंपन्यांना त्यांचा स्वतंत्र ओळख क्रमांक देणार आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी वर्ष २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना आता कंपन्यांनाही आधार कार्ड काढावे लागणार असल्याची घोषणा केली.
सरकार सर्व कंपन्यांना स्वत:चे एक ओळखपत्र देण्यासाठी आधारसारखी एक योजना आणणार आहे. सरकारला आधारच्या माध्यमातून सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार आणि सबसिडीतील गळती कमी करण्यास मदत झाली. आता सरकार आधार कार्डच्या माध्यमातून खासगी कंपन्यांमधील भ्रष्टाचार आणि बनावट कंपन्यांवर लगाम लावण्यासाठी सरसावले आहे. सरकारने यापूर्वीच तीन लाखांहून अधिक बनावट कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. सरकारने नोटाबंदीनंतर संशयित व्यवहार झालेल्या कंपन्यांविरोधातमोठी कारवाई केलेली आहे.
व्हीएस न्यूज - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. गेल्या वर्षी १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीसटी) लागू करण्यात आल्याने आधीच्या ८८ अर्थसंकल्पांपेक्षा यंदाचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वसामान्य माणसांचे लक्ष लागून असते. पण, जीसटीमुळे जवळपास यावरूनही पडदा उठला आहे. ज्या वस्तू जीसटीमध्ये मोडत नाहीत त्यांच्याच किंमतींमध्ये सर्वाधिक फरक दिसून येणार आहे. उदा. पेट्रोल आणि डिझेल.
काय स्वस्त…
१. कच्चा काजूवरील सीमा शुल्क ५ वरुन अडीच टक्के करण्यात आल्याने काजू स्वस्त होतील.
२. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने इंधन २ रुपयांनी स्वस्त
३. आरोग्य सेवा स्वस्त.
काय महाग….
मोबाईलवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के करण्यात आल्याने आता मोबाईल खरेदी महागणार आहे.
एलईडी, एलसीडी
तंबाखूजन्य वस्तूंवरील उत्पादन शुल्कात वाढ
फळं आणि भाज्यांचे ज्यूस
परफ्युम, सौंदर्यप्रसाधने आणि टॉयलेटरिज
ट्रक आणि बसचे टायर
सिल्क कपडा
गॉगल
चप्पल आणि बूट
इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड
खेळणी, व्हिडीओ गेम
क्रीडा साहित्य
मेणबत्त्या
खाद्यतेल
मासेमारी जाळं
खाद्यतेल / वनस्पती तेल जसे ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल
व्हीएस न्यूज - सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून दिलासा मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या नोकरदार वर्गाचा हिरमोड झाला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैयक्तिक कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे मोबाईल आणि टीव्हीवरील कस्टम ड्यूटी वाढवून सरकारने ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुरुवारी संसदेत सादर केला. वैयक्तिक कररचनेत बदल करुन मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देईल, अशी आशा होती. मात्र, जेटलींनी कररचनेत कोणताही बदल न करता नोकरदार वर्गाची निराशा केली. वैयक्तिक कररचनेतील टप्पे जैसे थे आहे. यामुळे या वर्षीही पूर्वीप्रमाणेच अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. तर अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर, पाच ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के, १० लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर भरावा लागणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवरील ५० हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त असेल. या वर्षी ८.२७ कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ लाख करदाते वाढले, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी कस्टम ड्यूटी वाढवली आहे. मोबाईल फोन, टीव्ही वरील कस्टम ड्यूटी १५ टक्क्यांवरुन २० टक्क्यावर नेण्यात आली. याशिवाय शैक्षणिक उपकर ३ टक्क्यांवरुन ४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. यातून अतिरिक्त ११ हजार कोटी रुपयांचे संकलन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा वेगाने विकास
चार वर्षांपूर्वी सत्तेवर येताना आम्ही जनतेला प्रामाणिक, स्वच्छ आणि पारदर्शी सरकार देऊ असे आश्वासन दिले होते. त्यावेळी भारताला भ्रष्टाचाराने ग्रासले होते. पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा सर्वाधिक वेगाने विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. भारतात व्यवसाय करणे आणखी सोपे झाले आहे, असे जेटलींनी सांगितले.
भारत जगातील सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
भारताचा आर्थिक विकास दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला असून अर्थव्यवस्था २.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. भारत जगातील सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी आणि ग्रामीण क्षेत्रावर भर…
केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. २०१६-१७ या वर्षात २७५ मिलियन टन खाद्यान्न आणि लगभग ३०० मिलियन टन फळ आणि भाजीचे विक्रमी उत्पादन झाले, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट बाजारात विकता येत नाही. आम्ही २२ हजार ग्रामीण कृषी बाजारांचा विकास करु. तसेच ५८५ एपीएमसी मार्केटमधील विकासासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. उद्योग क्षेत्राप्रमाणेच शेतीमध्येही क्लस्टर पद्धतीने विकास केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी ऑपरेशन्स ग्रीन ही मोहीम राबवली जाईल. तसेच बांबू हे हिरवे सोनेच आहे. त्यासाठी बांबू बांबू शेतीच्या विकासासाठी १,२९० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
गरीबांना २०२२ पर्यंत हक्काचे घर…
गोरगरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. २०२२ पर्यंत प्रत्येक गरीब कुटुंबाचे हक्काचे घर असावे, असा आमचा संकल्प आहे. यासाठी शहरीभागात पंतप्रधान आवास योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २०१८ या वर्षात ५१ लाख घरे आणि २०१८-१९ या वर्षात ५१ लाख असे एकूण १ कोटी घरे बांधण्यात येतील. देशात सर्वात कमी सिंचन असलेल्या जिल्ह्यांसाठी २, ६०० कोटी रुपयांची तरतुद केली जाणार आहे.
आरोग्य आणि शिक्षण…
राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमासाठी यंदा ९, ९७५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. प्री- स्कूल ते बारावीपर्यंत समान शैक्षणिक धोरण असेल, असे जेटलींनी सांगितले. शिक्षणाचा दर्जा हा अजूनही चिंतेचा विषय असून शिक्षकांसाठी एकीकृत कार्यक्रमच राबवला जाईल, असे जेटली म्हणालेत. १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण तसेच डिजिटल शिक्षणावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. आदिवासी भागात एकलव्य शाळा सुरु केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. देशभरात २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये तसेच आरोग्य सुविधेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आयुष्मान योजनेची घोषणाही त्यांनी केली.
रेल्वे आणि रस्ते…
मोदी सरकारने रेल्वेसाठी यंदाच्या बजेटमध्ये १ लाख ४८ हजार रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय बडोद्यात रेल्वे विद्यापीठ सुरु केले जाणार आहे. ६०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. २५ हजार पेक्षा जास्त प्रवासी असलेल्या रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसवले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक ट्रेनमध्ये आणि स्थानकात वायफाय सुविधा दिली जाणार आहे.
व्हिएस न्यूज- जामखेडा परिसरात पुर्व वैमनस्यातुन डॉक्टरसह एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. डॉ. सादिक मोहम्मद खान पठाण, वय- ४० रा जामखेड आणि त्यांचा जोडीदार कय्युम पठाण, वय- ३५ वर्षे या असे गोळीबारात गंभीर झालेल्यांची नावे आहेत्र. या दोघांवर शहरातील नगर रोडवरील पंचायत समितीसमोर गाडी अडवुन हल्ला करत गोळीबार झाला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. आरोपी बीड जिल्ह्य़ातील नाळवंडी येथीलअसल्याचे सुत्रांकडून समजते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002