Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
फक्त एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल

व्हीएस न्यूज - शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपसोबतराष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने आतापर्यंत भाजपच्या नेत्यांवर अनेकदा थेटपणे टीका केलीअसली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून संघावर मात्र टीका करणे टाळले जात असे. पण बुधवारीनागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्यामुळे शिवसेना भविष्यात संघाच्या धोरणांवरही टीका करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणीकरू शकतो, असे म्हटले होते. रावते यांनी या पार्श्वभूमीवर भागवतांना उपरोधिक टोला लगावला. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानची भीतीआता बाळगण्याची कोणतीही गरज नाही. तसेच सीमेवर लढण्यासाठी सैन्य भरतीची आणि सैनिकांना प्रशिक्षित करण्याची गरज नाही.फक्त एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल, असे रावते यांनी म्हटले. सीमेवर लढणारे सैनिक जीवाची पर्वा नकरता शत्रूशी लढतात. मोठ्या परिश्रमातून आणि मेहनतीतून सैन्य दलाची उभारणी करावी लागते, असे रावते यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
पर्यटकांनी गोव्यात यावे, पण घाण करू नये – मनोहर पर्रीकर

व्हीएस न्यूज - गोव्यात येणाऱ्या उत्तर भारतीय पर्यटकांबाबत कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. त्यांनी यावेळी म्हटले की, पर्यटनासाठी गोव्यात भारतातील लोकांनी जरुर यावे. पण त्यांनी यावेळी काही गोष्टींचे भान बाळगणे गरजेचे असून रस्त्यावर पर्यटकांनी लघवी करू नये, कुठेही कचरा टाकू नये असे अपेक्षित
आहे. केवळ पर्यटकच नव्हे तर स्थानिकांनी देखील रस्त्यावर कचरा टाकू नये, असे अपेक्षित असतेच व आहे, असे पर्रीकर म्हणाले.मिरामार-दोनापॉल मार्गावर काही दिवसांपूर्वी एक पर्यटक बसमधून लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी यावरून उत्तर भारतीय पर्यटकांना धारेवर धरले होते. हे पर्यटक म्हणजे पृथ्वीवरची घाण असल्याचे त्यांनी म्हटले होते. सरदेसाई यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पर्रीकर यांनी या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका मांडली. पर्यटकांविषयी जे काही सरदेसाई यांना म्हणायचे होते, त्यामागील हेतू योग्य असावा. फक्त त्यांनी वापरलेली भाषा कठोर होती. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पण त्याविषयी सरदेसाई यांनी स्वत:हून दिलगिरी व्यक्त केल्याचे पर्रीकर यांनी म्हटले.
तसेच ज्या साधनसुविधा सध्या गोव्यात आहेत, त्या पाहता पन्नास ते साठ लाख पर्यटकांचा भार गोवा पेलू शकतो. मात्र तिसरा मांडवी

पुल, नवा जुवारी पुल, पत्रदेवी ते पोळे महामार्ग अशा अनेक साधनसुविधा उभ्या राहिल्यानंतर दीड कोटी पर्यटकांना गोवा सामावून घेऊ

शकेल. पर्यटन व्यवसायाचा विस्तार व्हायला हवा. तो अंतर्गत भागांमध्ये विस्तारायला हवा. एका खनिज व्यवसायावर आम्ही अवलंबून

राहू शकत नाही आणि केवळ पर्यटनावरच सुद्धा अवलंबून राहू शकत नाही, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
पोलिसांच्या बदल्यांसाठीच्या राजकीय शिफारसी बंद

व्हिएस न्यूज - सार्वत्रिक बदल्यांमध्ये मोक्याची तसेच मनासारखी नियुक्ती मिळावी, यासाठी आतापासूनच पोलीस अधिकाऱ्यांकडून मंत्री वा आमदारांच्या शिफारशी राज्याच्या पोलीस महासंचालक तसेच आयुक्तालय वा अधीक्षक कार्यालयाला पाठविल्या जातात. अशा शिफारशी यावेळी मात्र संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना महाग पडणार आहेत. अशा शिफारशी आलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तूर्तास या पोलिसांना १५ फेब्रुवारीपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

मंत्री वा आमदारांची शिफारसपत्रे सादर करून हव्या त्या ठिकाणी नियुक्ती घेण्याची पद्धत पोलीस दलात नवी नाही. त्यामुळे सार्वत्रिक बदल्यांचा मोसम सुरू झाल्यानंतर अशा शिफारशींचा पाऊस महासंचालक, आयुक्त तसेच अधीक्षक कार्यालयात पडू लागतो. असा दबाव आणणे हे शिस्तभंगाच्या कारवाईत मोडत असल्याची बाब सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर २०१७ च्या परित्रकाद्वारे स्पष्ट केलेली असतानाही अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी शिफारसपत्रे सादर केली आहेत वा अशी शिफारसपत्रे महासंचालक कार्यालयाला मिळाली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मात्र अशा शिफारशी सादर झालेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. या सर्व अधिकाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काही अधिकारी गृहखात्याकडेही अशा शिफारशी सादर करतात. गृहखात्याने अशा ४२ अधिकाऱ्यांची एक यादीही तयार केली आहे. या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. संबंधित शिफारसपत्राशी आपला काहीही संबंध नाही, असे त्यांना या खुलासाद्वारे स्पष्ट करावयाचे आहे.

नियुक्तीसाठी दबाव आणणे हे नागरी सेवाशर्ती कायद्याचे उल्लंघन आहे. अशा शिफारशी आणणाऱ्या अधिकाऱ्यांकडून खुलासा घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.

राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना)

...Read More

V. S. News
गारपीटीने शेतकरी चिंताग्रस्त, विदर्भातील शेतकऱ्यांचारास्ता रोको

व्हिएस न्यूज – गारपिटीचा तडाखा बसल्याने विदर्भासह मराठवाड्यातील अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत,या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारी सकाळी नागपूर-अमरावती मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी यावेळी शेतक-यांनी केली आहे. या आंदोलनात भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुखही सहभागी झाले होते.

राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी,कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत माहिती दिली. शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ,मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे आणि काढणी झालेल्या मालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश सोमवारीच कृषीमंत्र्यांनी दिले होते. या बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिका-यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन आणि कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित ११ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती,अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.

विदर्भात अमरावती, बुलडाण्याला फटका

तालुक्यातील २७० गावातील २६ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे. अकोला जिल्ह्याती मुर्तीजापूर, बार्शी टाकळी,अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील १०१ गावांमधील ४ हजार ३६० हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झालं आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ३६ गावांमधील ८ हजार ५०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीने एकूण १०८६ गावातील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानीचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

...Read More

V. S. News
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मोदींची तज्ज्ञांशी चर्चा

व्हिएस न्यूज – देशातल्या शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. येत्या १९ आणि २० फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी देशभरातील २५० तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत.

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करुन मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेकदा या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळेच आता सरकारकडून पावलं टाकण्यास सुरुवात झाल्याचं दिसतं आहे. त्यासाठी येत्या १९ व २० फेब्रुवारीला दिल्लीत या विषयावर देशभरातल्या २५० तज्ज्ञांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महामंथन करणार आहेत. दिल्लीतल्या पुसा इन्सिट्यूटमध्ये यावर शेतीशी संबंधित तज्ज्ञांची मतं ऐकून घेणार आहेत,अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. या कार्यक्रमासाठी एकूण सात टीमची रचना करण्यात आली आहे. यात शेतीच्या उत्पादन ते विक्री या साखळीतल्या विविध विषयांवर फोकस ठेवून या टीम बनवल्या गेल्या आहेत. त्यातल्या एका टीमचं नेतृत्व पाशा पटेल करत असून, ते स्वत: पंतप्रधानांसमोर प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातली ही महापरिषद बोलवायला इतका उशीर का झाला? यावर याची घोषणा झाल्यापासूनच, विविध स्तरांवर काम सुरु आहे. आता त्याला आणखी मूर्त स्वरुप देण्यासाठी ही परिषद असल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं.

...Read More

V. S. News
नाशिक महापालिकेत देवदेवतांवर बंदी

व्हिएस न्यूज - पुण्यभूमी असा लौकिक असलेल्या नाशिक महापालिकेत मात्र देवदेवतांना नो एंट्री करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेल्या नव्या आदेशामुळे ही देवबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचा कारभार हाती घेताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देव-देवतांचे फोटो महापालिकेतून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार विविध दालनांमध्ये,कक्षांमध्ये, कर्मचाऱ्याच्या टेबलवर असलेले देवदेवतांचे फोटो काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करत तातडीने कर्मचाऱ्यांनी देवदेवतांचे फोटो हटवण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही नकार दिला आहे. एवढेच नाही तर नाशिक महापालिकेत स्वच्छता असलीच पाहिजे असेही त्यांनी बजावले आहे.‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी नाशिक महापालिकेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. देवांचे फोटो काढण्यामागे विचारांची स्वच्छता होणे हा उद्देश असल्याचे स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. मात्र तुकाराम मुंढे देवबंदीच्या निर्णयामुळे काय साधणार याची चर्चा सध्या नाशिक महापालिकेत सुरु झाली आहे.

...Read More

V. S. News
पंजाब नॅशनल बँकेत १.१३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा

व्हिएस न्यूज - बँकेतील एखादा घोटाळा समोर येणे हे आता म्हणावे तितके नवीन राहीले नाही. पण दिवसागणिक या घटनांमध्ये भर पडत असल्याचे पहायला मिळत आहे. नुकताच पंजाब नॅशनल बँकेतील एक मोठा घोटाळा समोर आला असून मुंबईतील बँकेच्या एका शाखेतून १.१३ लाख कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र इतक्या जास्त रकमेचा व्यवहार नेमका कोणाकडून करण्यात आला आहे त्याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हे व्यवहार काही खातेधारकांच्या फायद्यासाठी कोणाकडून तरी मुद्दामहून करण्यात आल्याचे सकृतदर्शनी आढळले आहे. त्यानुसार इतर बँकांकडून आगाऊ रक्कम घेण्यात आल्याचे बँकेचे म्हणणे आहे. कर्जवितरणाच्या बाबतीत पंजाब नॅशनल बँक ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची तर एकूण मालमत्तेच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाची बँक आहे. या घोटाळ्याबाबत मुंबईतील बँकेचे अधिकारी म्हणाले, ”बँकेत अशाप्रकारे समोर येणारे व्यवहार हे गुंतागुंतीचे असतात, त्यामुळे या गोष्टीची योग्य ती चौकशी करुन मगच त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे योग्य होईल. तसेच या व्यवहाराबाबतची संपूर्ण माहिती चौकशीनंतर समोर येईल, त्यामुळे त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही.”

याआधीही पंजाब नॅशनल बँकेमध्ये काही अनियमित व्यवहार झाल्याने त्यांची चौकशी झाली होती. यावेळी ज्वेलर्सचा व्यवसाय असणाऱ्या देशातील श्रीमंतांपैकी निरव मोदी यांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी २८२ कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे आताचा घोटाळा हा खूप जास्त रकमेच्या असल्याने बँकिंग क्षेत्रातील सर्वांसाठीच ही मोठी घटना असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप या घोटाळ्यात कोणाचेही नाव समोर आलेले नाही. या वृत्ताचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. बँकेच्या शेअरचा भाव बुधवारी जवळपास पाच टक्क्यांनी घसरला.

...Read More

V. S. News
पाकच्या प्रत्युत्तरासाठी भारताने सज्ज राहावे –पाकिस्तानचे संरक्षण मंत्री

व्हिएस न्यूज – सुंजवान हल्ल्यावरील संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान जणू वेडापिसा झाला आहे. भारताचे आक्रमक वागणे, रणनीतिक चूक किंवा कोणतीच चुकीची कारवाई सहन केली जाणार नाही. त्यांच शब्दात भारताला त्यांच्या प्रत्येक कारवाईचे उत्तर दिले जाईल,असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी दिला आहे.

निर्मला सीतारामन यांनी सुंजवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल, असे म्हटले होते. पाकिस्तान सरकारने यावर मंगळवारी भारताला त्याच शब्दांत प्रत्युत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर म्हणाले, भारताचे आक्रमक वागणे,रणनीतिक चूक किंवा कोणतीच चुकीची कारवाई सहन केली जाणार नाही. त्यांच शब्दांत भारताला त्यांच्या प्रत्येक कारवाईचे उत्तर दिले जाईल. अजूनही भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची भीती पाकिस्तानमध्ये असल्यामुळे भारताने सर्जिकल स्ट्राईकची तयारी देखील करु नये. ११ वर्षांपूर्वी समझौता एक्सप्रेसमध्ये मारले गेलेल्या ४२ पाकिस्तानी नागरिकांना न्याय देण्यात भारत अपयशी ठरले.

भारताने आधी आपला गुप्तहेर कुलभूषण जाधव यांच्याबद्दल कोणत्याही पुराव्यांशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्यापूर्वी बोलावे, असे यांचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले,पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांनी सुंजवान येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास पाकिस्तानने नकार देत पूर्ण चौकशी केल्यानंतर भारताने पाकिस्तावर आरोप करावे, असेही ते पुढे म्हणाले.

...Read More

V. S. News
येत्या जूनपासून बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

व्हिएस न्यूज – मुंबई - अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रवास साहसी ठरणार असून मुंबईतील ठाणे-विरार टप्प्यातून जाताना समुद्रातून २१ कि.मी. लांबीच्या बोगद्यातून या बुलेट ट्रेनचा प्रवास होणार आहे. मुंबई-अहमदाबाद हे ५०८ कि.मी.चे अंतर अगदी कमी काळात पार करणारी बुलेट ट्रेन ठाणे खाडीनजीक सागराखालील बोगद्यातून जाणार आहे.

या बोगद्यासाठी आवश्यक असणारी १५ दिवसांची स्टेसमिक रजिटिव्हीटी टेस्ट पुर्ण करण्यात आली असून, जपानला तसा अहवाल पाठविण्यात आलेला आहे. ही चाचणी ११ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आली आहे. १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च बुलेट ट्रेनसाठी अपेक्षित आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्रदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. येत्या जुन महिन्यापासून बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असणारे सिव्हिल काम सुरु करण्यात येणार आहे. या गाडीचा वेग ताशी साडेतीनशे किलोमीटर असला तरी प्रत्यक्ष सरासरी वेग ताशी ३२० किलोमीटर असेल. ५०८ किलोमीटर अंतर ही गाडी दोन तासात कापणार आहे. सध्या दुरांतो एक्सप्रेस सात तासात हे अंतर कापते. मुंबई-अहमदाबाद रेल्वेचा बहुतांश मार्ग हा उन्नत असला तरी ठाणे खाडी ते विरार दरम्यान ही गाडी सागरी बोगद्यातून जाईल.

बुलेट ट्रेनची माहिती देण्यासाठी मॅग्नेट महाराष्ट्रामध्ये इ ५ सिरीजचे कोच दाखविण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला जपानमधील संकेशनमधील बुलेट ट्रेनसाठी या प्रकारचे कोच चालविण्यात येत आहेत. बुलेट ट्रेनसाठी जे टेंडर काढण्यात येणार आहे, त्यामध्ये २० टक्के जपानसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. तर उरलेल्या ८० टक्क्यामध्ये देशातील किंवा परदेशातील कोणत्याही कंपन्या सहभागी होऊ शकणार आहेत. बुलेट ट्रेनसाठी ठाणे जिल्ह्यातील जी जमीन आवश्यक आहे, त्यासाठी जमिन हस्तांतरणासाठीचा प्रस्ताव स्थानिक जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राष्टीय हाई स्पीड रेल निगम लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी दिली. बुलेट ट्रेनच्या एकुण मार्गात ८ बोगदे असणार आहेत. त्यामध्ये ठाण्यातील खाडीतून जाणारा बोगदा सर्वात मोठा असणार आहे. बुलेट ट्रेनसाठी एकुण २९ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी २५ हजार कर्मचारी हंगामी तत्वावर असणार आहेत तर ४ हजार कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या वडोदरा येथील रेल्वे विद्यापठात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गात एकूण ४७ आरओबी असणार आहे. त्यापैकी २७ आरओबी राज्यात असणार आहेत.

...Read More

V. S. News
द. आफ्रिकेत वन डे सिरीज जिंकून भारताचा इतिहास

व्हिएस न्यूज - गेल्या २५ वर्षांपासून द.आफ्रिकेचे दौरे करत असलेल्या आणि आत्तापर्यंत एकही सिरीज जिंकू न शकलेल्या टीम इंडियाने यंदा सहा सामन्याच्या एक दिवसीय मालिकेत ४-१ ने आघाडी घेत मालिका जिंकून नवा इतिहास रचला आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या पाचव्या वनडे मध्ये भारताने ७३ धावांनी सामना जिंकून ४-१ अशी आघाडी घेतली आहे. या विजयाचा शिल्पकार कप्तान विराट कोहली ठरलाच पण त्याला चायनामन कुलदीप आणि चहल या फिरकी गोलंदाजांनीही महत्वाची साथ दिली.

या विजयाने द.आफ्रिकेत मालिका जिंकणारा विराट पहिला कप्तान बनला तसेच वन डे मध्ये द.आफ्रिकेत ४०० पेक्षा अधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. डर्बन येथे झालेला सामना भारताने ६ विकेत्ने, सेंच्युरीयन येथील सामना ९ विकेटनी तर केपटाऊन येथील सामना १२४ रन्सनी जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली होती. मात्र शनिवारी पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताला हरवून ३-१ अशी स्थिती केली होती. या मालिकेत कुलदीपने ५ सामन्यात १६ तर चहलने १४ विकेट घेतल्या आहेत. तर विराटने ५ सामन्यात ४२९ धावा फटकावताना दोन शतके व एक अर्धशतक ठोकले आहे.

...Read More

V. S. News
राहुल गांधींकडे मणिशंकर अय्यरना बरखास्त करण्याचीकाँग्रेस नेत्याची मागणी

व्हिएस न्यूज - वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे नेते व माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना पक्षातून बरखास्त करा, अशी मागणी एका काँग्रेस नेत्याने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. पाकिस्तानबाबत अय्यर यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.

“मणिशंकर अय्यर यांनी अशा मुद्द्यांवर टिप्पणी करणे बंद करायला हवे. त्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी आता गप्प राहायला हवे. भारतीय जनता पक्ष याचा फायदा घेऊ शकते. अय्यरना पक्षातून काढावे, यासाठी मी राहुल गांधींना पत्र लिहिणार आहे,” असे काँग्रेस नेते व्ही. हनुमंत राव यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. हनुमंत राव हे तेलंगाणातील खासदार आहेत.

‘भारत आणि पाकिस्‍तान यांच्या दरम्यानच्या मद्द्यांचा एकच मार्गच आहे – निरंतर आणि विना-अडथळा चर्चा. पाकिस्‍तानने या धोरणाचा स्वीकार केला आहे याचा मला अभिमान आहे. परंतु भारताने धोरण म्हणून त्याचा स्वीकार केलेला नाही, याचे दुःखही आहे. मी पाकिस्‍तानवर प्रेम करतो कारण मी भारतावर प्रेम करतो, ’ असे कराचीतील एका कार्यक्रमात भाषण करताना अय्यर म्हणाले होते.

...Read More

V. S. News
समविचारी पक्षांनी भाजपविरोधात वज्रमूठ बांधणे गरजेचे – शरद पवार

व्हिएस न्यूज – २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी समविचारी पक्षांनी युती करणे गरजेचे आहे. भाजपला आव्हान द्यायचे असेल तर समविचारी पक्षांनी वज्रमूठ बांधणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समविचारी पक्षांच्या एकत्र येण्याने तगडे आव्हान निर्माण होईल आणि भाजपला पराभूत करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की शेतकरी, मध्यमवर्गीय आणि तरुणाईमध्ये सद्यस्थितीत असंतोष खदखदत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही. हे सरकार लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरू शकलेले नाही. मोदींना तरुणांना रोजगार देण्यात अपयश आले, असे पवार म्हणाले. आजच्या स्थितीनुसार संसदेत मोदी यांची स्थिती मजबूत आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. पण शेतीप्रधान समाज, मध्यमवर्गीय, अल्पसंख्याक, तरुण वर्ग या सरकारवर नाखूश आहे, असे शरद पवार म्हणाले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!