Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
पंकजा मुंडे यांच्या भावाच्या कारचा अपघात ; एक ठार, चार जखमी

व्हीएस न्यूज - राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांच्या गाडीचा रविवारी रात्री अंबेजोगाई शहाराजवळील अंबासाखर रोडवरील वळणावर अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला असून चौघे जखमी झाले आहेत.

रामेश्वर मुंडे त्यांच्या त्यांच्या कारमधून अंबेजोगाईच्या दिशेने जात होते. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील धनराज कचरू बिडगर यांचा मृत्यू झाला. तर रामेश्वर व्यंकटराव मुंडे ज्ञानोबा नाथराव कराड, विलास सोपान जाधव आणि परमेश्वर दवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रामेश्वर मुंडे पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
‘बेटी बचाओ’ उपक्रमाचे ३० लाख अर्ज बोगस

व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाच्या नावाखाली अनेक राज्यांमध्ये सामान्य लोकांची फसवणूक सुरू असल्याची बाब समोर आली आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याकडे आलेल्या एकूण अर्जांपैकी ३० लाख अर्ज बोगस निघाले आहेत. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये अनेकजण या योजनेविषयीचा खोटा प्रचार करत आहेत. तुम्ही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचा फक्त अर्ज भरलात तरी सरकार तुमच्या खात्यात २ लाख रूपये जमा करेल, असे सांगून लोकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. या प्रत्येक अर्जासाठी लोकांकडून २० ते ५० रूपयांची रक्कम उकळण्याचा गोरखधंदा काहीजणांनी सुरू केलाय. त्यामुळे आता महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी चांगलेच चिंतेत पडले आहेत.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापासून केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याकडे उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधून असे अर्ज येण्यास सुरूवात झाली. त्यानंतर पंजाबमधूनही मोठ्याप्रमाणावर बोगस अर्ज आले आहेत. महिला व बालकल्याण खात्याच्या दिल्लीतील गोदामात सध्या अशा बोगस अर्जांचा खच पडला आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाची केंद्र सरकारने अनेक माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली होती. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमातंर्गत कोणतीही रोख रक्कम मिळणार नाही, असे वारंवार या जाहिरातींमधून सांगण्यात आले होते. मात्र, तरीही ही गोष्ट मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचली नसल्याची बाब यानिमित्ताने सिद्ध झाली आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्याच महिन्यात केंद्रीय महिला व बालकल्याण खाते, गृह मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जे बोगस अर्ज संबंधित राज्यांकडे परत पाठवण्यात आले होते, ते आता परस्पर नष्ट करण्यात येतील. संबंधित लोकांना याची माहिती देण्यापेक्षा लोकांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाविषयी आणखी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमातंर्गत कोणतेही वैयक्तिक लाभ मिळत नाहीत किंवा कोणताही थेट रक्कम बँक खात्यांमध्ये वळती केली जात नाही, हे पुन्हा एकदा जाहिरातींच्या माध्यमातून बिंबवण्याचा प्रयत्न होईल.

केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याने यापूर्वीच केंद्रीय अन्वेषण खात्याला (सीबीआय) या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही मंत्रालयाकडे अशाप्रकारचे बोगस अर्ज येण्याचे प्रमाण कमी झाले नाही. यापैकी बहुतांश अर्ज हे पोस्टाने येत असल्याने आता सरकारने स्थानिक टपाल कार्यालयांना याबद्दल कळवण्याचा निर्णय घेतला आहे.

...Read More

V. S. News
लालूंचा तुरुंगात व्हीआयपी थाट

व्हीएस न्यूज - चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांची रवानगी आता बिरसा मुंडा तुरूंगात करण्यात आली आहे. दरम्यान, तुरूंगात लालूप्रसाद यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे सांगण्यात येते. तुंरूग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यांना वृत्तपत्रे, टीव्ही पुरवण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लालूप्रसाद सध्या तुरूंगात न्यायालयीन कारवाईशी संबंधित माहिती घेत आहेत. बिरसा मुंडा तुरूंगाचे अधीक्षक अशोककुमार चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे, तुरूंग नियमावलीनुसार लालूप्रसाद यांना आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी १२ दरम्यान ते कोणालाही भेटू शकतात.

वर्ष २०१४ मध्ये लालूप्रसाद यांच्यावर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या आहारावर खूप बंधने आहेत. ते सध्या शाकाहरी जेवण करत आहेत. लालूप्रसाद यांना पहिल्या दिवशी तुंरूगातील जेवण देण्यात आल्याचे पक्षाच्या झारखंड राज्याच्या अध्यक्षा अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत त्यांना घरचं जेवणही दिले जाऊ शके, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी पक्षाच्या १०० हून अधिक नेत्यांसह बिरसा मुंडा तुरूंगाबाहेर आंदोलन केले. हे सर्वांना नियमबाह्य पद्धतीने लालूप्रसाद यांना भेटायचे होते. पण नियमानुसार कामकाजाच्या दिवशीच तुरूंगातील कैद्यांची भेट घेता येते.

भेटण्यास परवानगी नाकारल्यानंतर नेत्यांनी घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. जेल का फाटक टूटेगा, लालू यादव छूटेगा, या घोषणेसह ‘दम है कितना दमन में तेरे देख लिया है देखेंगे, जगह है कितनी जेल में तेरे देख लिया है देखेंगे, कितनी लंबी जेल है तेरी देख लिया है देखेंगे’ अशा घोषणा आंदोलनकर्त्या नेत्यांनी दिल्या. त्यानंतर पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर महत्प्रयासाने आंदोलनकर्ते शांत झाले.

...Read More

V. S. News
विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छतेसाठी प्रवृत्त करावे – दिलीप गावडे

व्हीएस न्यूज – राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविलेला स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम कौतुकास्पद असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच मित्र परिवार, नातेवाईक यांनाही स्वच्छ सर्वेक्षण ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना व डॉ. डी. वाय. पाटील आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी यांच्या सहकार्याने स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ जनजागृतीपर रॅलीतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी नगरसदस्या सुलक्षणा धर, डॉ. डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, प्रभाग अधिकारी आशा राऊत, प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राध्यापिका डॉ, मानसी कुर्तकोटी, इंदीरा अवसरे, निता मोहिते, डॉ. किशोर निकम, प्रा. जयवंत बाबर, कार्यालयीन अधिक्षक डी. डी. गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सह आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, या रॅलीमध्ये विद्यार्थीनींचा मोठ्या प्रामाणात सहभाग असून महिलाच ख-या अर्थाने स्वच्छतेची काळजी घेत असतात. ओला कचरा व सुका कचरा विलगिकरण करण्याची महिलांनी जबाबदारी घ्यावी. केंद्रशासनाने विकसीत केलेला स्वच्छ सर्वेक्षण ॲपचा वापर करुन अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी महानगरपालिकेला ॲप द्वारे कळवाव्यात. स्वच्छ सर्वेक्षण ॲप मुळे शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी फार मोठी मदत होईल व शहरातील नागरिक पर्यावरण पुरक श्वास घेईल. शहरातील रोगराई व साथिचे आजार कमी होतील असेही ते म्हणाले. स्वच्छता विषयक घोषणा देत रॅलीची सुरुवात डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयापासूनझाली. या रॅलीचा मार्ग शनि मंदिर, विरंगुळा केंद्र, संततुकाराम महाराज पुतळा, एच.ए.मैदान चौपाटी, रोहन हाईट्स, डॉ. डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज, वाय.सी.एम. हॉस्पिटल, शनि मंदिरा मार्गे पुन्हा महाविद्यालय असा होता. या रॅली मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विद्यार्थ्याँनी स्वच्छते बाबत जनजागृतीपर विविध घोषणा दिल्या. नगरसदस्या सुलक्षणा धर म्हणाल्या, डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या, सर्व प्राध्यापक व प्रशासन आणि विद्यार्थी व विद्यार्थीनी नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेत असतात. शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी आपण तरुण पिढीने घेतली पाहिजे. तरुणांच्या सहभागा शिवाय शहर स्वच्छ व सुंदर होणे शक्य नाही. आपण सर्वांनी मिळून या राष्ट्रीय कामामध्ये सक्रीय व्हावे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील व प्रभाग अधिकारी आशा राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले यांनी केले. तर आभार प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री यांनी मानले.

...Read More

V. S. News
भारतानं पाकिस्तानचा विक्रम मोडला

व्हिएस न्यूज - मुंबईच्या वानखेडे मैदानात अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. या विजयासह 2017 वर्षाचा शेवट भारतीय संघाने गोड केला आहे. हे वर्ष भारतीय संघासाठी लाभदायी ठरले आहे. यावर्षभरात भारतीय संघानं अनेक विक्रम आपल्या नावे केलं.

2017 वर्षभरात खेळलेल्या सर्वच 14 द्विपक्षीय मालिकेत भारतानं विजय मिळवला आहे. टी-20 मालिकेत विजय मिळवताच भारतानं पाकिस्तानचा वर्षभरात सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. 2011मध्ये पाकिस्तान संघानं 13 मालिका विजय मिळवले होते. भारतानं 2017 मध्ये चार कसोटी, सहा वन-डे आणि चार टी-20 मालिकेत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मानं भारतीय संघाचे नेतृत्व केलं. 2018 च्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन हात करणार आहे. त्यामुळे होम ग्राऊंडवर मिळवलेला विजयी सिलसिला परदेशात कायम राखणार का? हा प्रश्न क्रीडारसिकांना पडलेला असेल.

2017 तील भारताचे कसोटी मालिका विजय -

बांगलादेशविरोधात एकमेव कसोटी मालिका भारतानं जिंकली होती.

ऑस्ट्रेलियाविरोधातील चार कसोटी सामन्याची मालिका भारतानं 2-1नं जिंकली.

श्रीलंकेमध्ये ऑगस्टमध्ये भारतानं तीन कसोटी सामन्याती मालिका 3-0नं जिंकली.

भारतात झालेली तीन सामन्याची कसोटी मालिकाही भारतानं जिंकली.

2017तील भारताचे वन-डे मालिका विजय -

इंग्लंडविरोधात तीन सामन्याच्या मालिकेत 2-1नं विजय

वेस्टइंडीज विरोधातील पाच सामन्याती मालिका 3-1नं जिंकली.

ऑगस्टमध्ये विराटसेनेनं 5-0नं लंकादहन केलं.

पाच सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1नं पराभव केला.

न्यूझीलंडचा 2-1नं पराभव केला.

वर्षाच्या शेवटी लंकेचा 2-1नं पराभव

2017तील भारताचे टी-20 मालिका विजय -

इंग्लंडचा 2-1नं फडशा पाडला

लंकेचा 1-0नं पराभव केला.

न्यूझीलंडचा 2-1नं पराभव.

वर्षाखेरीस लंकेचा 3-0नं फडशा पाडला.
...Read More

V. S. News
सलमानच्या आणखी एका चित्रपटाचा रिमेक, वरुण साकारणार मुख्य भूमिका

व्हिएस न्यूज - आपल्या वडीलांप्रमाणे बॉलिवूड अभिनेता वरूण धवन हा इंडस्ट्रीत हिट ठरला आहे. एकेकाळी लागोपाठ अनेक हिट चित्रपट दिग्दर्शक डेविड धवनने दिले होते. वरूण धवन आता तेच काम करत आहे. आतापर्यंत वरूणचे ९ चित्रपट रिलीज झाले असून त्यातील सर्वच चित्रपट हिट ठरले आहेत.

वरूणचे यावर्षी दोन चित्रपट रिलीज झाले. बॉक्स ऑफिसवर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘जुडवां २’ हे दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले. डेविड धवन आणि वरूण धवन या जोडीने ‘जुडवां २’ मध्ये धमाल केली आणि सलमान खानचा ९० च्या दशतकातील या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाला या दशकातही सुपरहिट केले. पण आता असे वाटत आहे की, सलमानच्या चित्रपटाची चटक दोघांना लागली.

याबाबात मिळालेल्या माहितीनुसार सलमान आणि करिश्माच्या एका सुपरहिट चित्रपटाचा रिमेक करण्याच्या तयारीत वरूण धवन आणि डेविड धवन आहे. दोघेही बरेच ‘बीवी नंबर १’ या चित्रपटाबाबत सिरीअस असल्याचे समजते. सलमानचे या चित्रपटात करिश्मासोबत लग्न होते आणि दिलफेक सलमानचे मन ऑफिसमधील एका मॉडलवर येतो. या मॉडलची भूमिका सुष्मिता सेनने साकारली होती. या चित्रपटात अनिल कपूर आणि तब्बूचीही भूमिका आहे.

आता ‘बीवी नंबर १’चा रिमेक बनवला जाणार आहे. वरून धवन ज्यात सलमानची भूमिका साकारेल. चित्रपटाचे चित्रीकरण २०१८ च्या मध्यात सुरू होईल. पण सध्याच या चित्रपटात करिश्मा आणि सुश्मिता सेनची भूमिका कोण साकारणात हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
...Read More

V. S. News
पिवळ्या रेषेबाहेरील वाहनांवर टोल आकारल्यास कारवाई

एकनाथ शिंदे यांचा इशारा

व्हिएस न्यूज – टोलनाक्यावर टोल भरणा-या वाहनांची रांग तेथील पिवळ्या रेषेच्या बाहेर गेल्यास टोल न आकारताच वाहने सोडायला हवीत. यानुसार वाहने न सोडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

टोलवसुलीमुळे विविध महामार्गांवर वाहतुकीची रोजच्या रोज कोंडी होऊन वेळ आणि इंधन मोठय़ा प्रमाणावर वाया जाते. या विषयच्या सततच्या तक्रारीनंतर त्यावर उपाय म्हणून टोलनाक्यांवर पिवळ्या रेषेचा नियम करण्यात आला. त्यानुसार, टोलनाक्यापासून दहा वाहने उभी राहतील इतक्या अंतरावर एक पिवळी रेषा आखण्यात आली. या रेषेबाहेर वाहनांची रांग लागल्यास टोलवसुली न करता वाहने सोडा, असा नियम करण्यात आला. मात्र, अनेक टोलनाक्यांवर हा नियम पाळला जात नाही.

पिवळ्या रेषेच्या नियमाबाबतचा सरकारचा जीआर आम्हाला मिळाला नसल्याचे सांगत ऐरोली टोलनाक्यावरही शनिवारी नियमबाह्य पद्धतीने वसुली केली जात होती. त्यामुळे मनसेने तिथे आंदोलन करून टोलवसुली बंद पाडली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी वरील आदेश दिले. टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली आहे. नियमांचे पालन न करता टोलवसुली करणा-या कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई करू, असे शिंदे यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
मद्यपी चालकाला ७ वर्षे तुरुंगवास

सुधारित मोटार वाहन कायद्यात बदल

व्हिएस न्यूज – मद्यपी वाहनचालकांमुळे होणा-या वाढत्या अपघातांची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवताना एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-या चालकास यापुढे थेट सात वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तशी तरतूद सुधारित मोटार वाहन कायद्यात करण्यात येणार आहे.

सध्याच्या कायद्यानुसार, दारूच्या नशेत गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणा-यांवर कलम ३०४अ खाली (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत) गुन्हा नोंदवला जातो. त्या अंतर्गत दोन वर्षाचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जातात. मात्र, ही शिक्षा अपुरी असून अशा गुन्ह्यांसाठी अधिक कठोर शिक्षा व्हायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी व्यक्त केले आहे.

संसदेच्या स्थायी समितीनेही असेच मत मांडले आहे. मृत्यूस कारणीभूत ठरणा-या मद्यपी वाहनचालकांवर १० वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद असणारा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस या समितीने केंद्रीय परिवहन खात्याला केली होती. गृहखात्यापुढेही तसा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या सा-याला अनुसरून मोटार वाहन (सुधारणा) विधेयकात काही सुधारणा अपेक्षित आहेत. शिक्षेतील वाढ ही त्यातील प्रमुख शिफारस आहे.

देशातील एकूण वाहनांपैकी अध्र्या वाहनांचे थर्ड पार्टी इन्शुरन्स काढण्यात आलेले नाही. यात दुचाकींची संख्या मोठी आहे. अशा वाहनांमुळे झालेल्या अपघातातील जखमींना कसलीही भरपाई मिळत नाही. त्यामुळे नोंदणीच्या वेळीच थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक करण्याचाही सरकारचा विचार आहे.
...Read More

V. S. News
डबेवाल्यांची रोटी बँक भारतभर पसरणार

व्हिएस न्यूज – आपण अन्न वाया घालवितो पण तेच अन्न कोणाचे तरी पोट भरू शकते. एकदम साधा विचार मुंबईच्या डबेवाल्यांनी मांडला जगाची एकूण लोकसंख्या ७०० कोटी आहे. यापैकी ११ टक्के म्हणजेच ७९ कोटी ५० लाख लोक उपाशी आहेत. अमेरिका, इंडोनेशिया आणि ब्राझिल या जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणा-या देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे लोक जगात उपाशी असतात. यापैकी भारतात उपाशी राहणा-यांची संख्या तब्बल १९ कोटी ५० लाख एवढी आहे. म्हणजेच २० लाख लोक आणखी मिळवून अख्खा पकिस्तान देश उपाशी राहील एवढी ही प्रचंड संख्या आहे. भारतात तर दररोज ३ हजार मुले कुपोषणाने मरतात.

मुंबईत यापेक्षा वेगळी स्थिती नाही. एका बाजूला नवकोट नारायणांच्या मोठमोठय़ा पाटर्य़ा, विवाह सोहळे होतात. या सोहळ्यात मोठय़ा प्रमाणात अतिरिक्त जेवण बनवले जाते. पार्टी संपली की मग हे अतिरिक्त जेवण कच-यात फेकले जाते, तर दुस-या बाजूला उपाशीपोटी फुटपाथवर झोपणा-यांची संख्या लक्षणीयरीत्या मोठी आहे. काही ठिकाणी तर गरीब अनाथ मुले कच-याच्या डब्यातून अन्न वेचून खातात.

ही परिस्थिती बदलण्यासाठी सुभाष तळेकर आणि त्यांच्या डबेवाल्या सहका-यांनी पुढाकार घेतला आणि रोटी बँकेची स्थापना केली. यासाठी तळेकर यांनी अतिरिक्त शिल्लक अन्न फेकून न देता आम्हा डबेवाल्यांना तुम्ही फोन करा. फोन केल्यानंतर आमचा डबेवाला आपल्याकडे सायकलवरून येत आपले अतिरिक्त जेवण जवळील भुकेलेल्यांना वाटील, असे मुंबईकरांना आवाहन केले. सुभाष तळेकर यांच्या या संकल्पनेनुसार दोनशेहून अधिक डबेवाले हे काम करण्यासाठी आपणहून पुढे आले.

मुंबईकरांचाही डबेवाल्यांवर विश्वास असल्यामुळे दररोज शिल्लक राहिलेले अन्न घेऊन जा, असे सांगणारे २० ते २५ फोन दररोज येऊ लागले. शनिवार व रविवारी तर हा आकडा ४० ते ५०च्या घरात जातो. अशा प्रकारे मुंबईचा डबेवाला दररोज सरासरी ३०० लोकांना अन्न वाटतो. शनिवार-रविवारी तर सरासरी ६०० लोकांना अन्न वाटतो. भुकेल्यांची भूक भागविण्याचे स्तुत्य काम सुभाष तळेकर व त्यांचे डबेवाले सहकारी करत आहेत.

विषेश म्हणजे पाच-सहा लोकांचे अन्न असेल तर डबेवाला ते अन्न सायकलवर सहज आणतो व त्याचे वाटप करतो. पण हेच अन्न वीस-पंचवीस जणांचे असले की डबेवाल्यांची पंचायत होते. हे अन्न सायकलवर नेता येत नसे त्यासाठी त्याला टॅक्सी किंव्हा रिक्षा करावी लागे. त्याचे भाडे आपल्या खिशातून द्यावे लागे. विनामोबदला काम करणा-या डबेवाल्याच्या मदतीला महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक शिवानंदनसाहेब आले.

त्यांनी एक व्हॅन रोटी बॅन्केला देऊन त्यांचा खर्चही त्यांनी उचलला आहे. याचे अनावरण शनिवारी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक शिवानंदनसाहेब यांच्या हस्ते झाले. तसेच ही रोटी बँकेची चळवळ स्थानिकांच्या मदतीने संपूर्ण भारतभर पसरवण्यात येईल. या कामासाठी रोटी बँकेचा २४ तास उपलब्ध असलेल्या ८६५५५८०००१या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क करा, वा www.rotibankindia.org या संकेतस्थळाला भेट द्या.
...Read More

V. S. News
सर्वाना हक्काचे घर; दोन विधेयके मंजूर

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

व्हिएस न्यूज – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एकूण २५ विधेयके विचारात घेतली. महत्त्वाचे विधेयक झोपडपट्टीधारकांना दिलासा देणारे होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात साडेबारा लाख लोक घरापासून वंचित आहेत. त्या सर्वाना घरे मिळावीत यासाठी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी दोन विधेयके संमत करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अधिवेशनाच्या समारोपानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. विरोधकांनी एक यात्रा काढली. काही मागण्या केल्या. मात्र त्यांनी मागण्या करण्याच्या अगोदरच आम्ही काही घोषणा केल्या होत्या. शेतक-यांच्यापाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शेतक-यांना मदत करणा-या काही घोषणाही करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आतापर्यंत २३ हजार कोटींच्या अर्जाना मंजुरी दिली आहे. मागील सरकारने १५ वर्षात केलेली मदत आणि आम्ही तीन वर्षात केलेली मदत यात खूप फरक आहे. सरकारवर कुणीही नाराज नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
...Read More

V. S. News
आता फेसबुकच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे बुकिंग

व्हिएस न्यूज - केवळ सोशल मीडियाला आणि मोबाईलला सध्याची तरूण मंडळी चिकटून बसले असल्याचा आरोप सर्रास केला जातो. सोशल मीडियावर अनेकजण टीका करतात. पण स्मार्टली सोशल मीडियाचा वापर केल्यास अनेक गोष्टींची उत्तर आणि महत्त्वाची कामेदेखील अगदी चुटकीसरशी पूर्ण होऊ शकतात.

सोशल मीडियाच्या म्हणजेच फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आता तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकणार आहात. गॅस सिलेंडरची बुकिंग करण्याची सुविधा इंडियन ऑयल कार्पोरेशन (IOCL)च्या ऑफिशिएअल पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिलेंडर बुकिंगसोबतच फेसबुकवर तीन हिस्ट्रीदेखील पाहू शकणार आहात. ही सुविधा गॅस सिलेंडर बुकिंग आणि डिलेव्हरी या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा उपभोग देशभरातील ११.५० करोड नागरिक घेऊ शकणार आहेत.

गॅस सिलेंडर फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून बुक करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाऊंटवर लॉगिंग करावे लागणार आहे. त्यानंतर इंडियन ऑयल कार्पोरेशन लिमिटेडचे ऑफिशियल पेज (@indianoilcorplimited)ओपन करा. या पेजवर उजव्या कोपर्‍यात BOOK NOWचे बटण देण्यात आले आहे. त्यावर क्लिक करा. त्यानंतर नवे पेज ओपन होईल. नव्या पेजवर कन्टिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एलपीजी आय डी क्रमांक मागितला जाईल. एलपीजी आय डी क्रमांक दिल्यानंतर बुक नाऊचा ऑप्शन दिला जाईल. बुकिंग झाल्यानंतर त्याचं कन्फरमेशन मोबाईलवर दिले जाईल.
...Read More

V. S. News
रिलायन्सचा वीज व्यवसाय अदानींच्या ताब्यात

व्हिएस न्यूज -अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कंपनीचा मुंबई उपनगरासाठीचा वीज निर्मिती, वीज पारेषण आणि वीज वितरणाचा व्यवसाय गुजरातमधील प्रख्यात अदानी समूह विकत घेणार आहे. या समूहातील अदानी ट्रान्स्मिशन लिमिटेड कंपनी त्यासाठी तब्बल १३,२५१ कोटी रुपये रिलायन्सला देणार आहे. मार्च २०१८ पर्यंत हा व्यवहार पूर्ण होऊन एप्रिल २०१८ पासून अदानी या व्यवसायाचा ताबा घेईल, असा अंदाज आहे.

अनिल धीरूभाई अंबानी समूह आर्थिकदृष्ट्या संकटात असून मार्च २०१७ अखेर समूहातील विविध कंपन्यांवर एकूण सव्वा लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे आपले विविध व्यवसाय विकून कर्जातून मुक्त होण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अखत्यारीतील डहाणूचा ५०० मेगावॉटचा वीज प्रकल्प, वीज पारेषण यंत्रणा आणि मुंबईतील वीज वितरण व्यवसाय असा एकात्मिक वीज व्यवसाय विकण्यासाठी उभय समूहांत बोलणी सुरू होती. मुंबई उपनगरात रिलायन्सचे सुमारे ३० लाख वीज ग्राहक असून सरासरी विजेची मागणी १८०० मेगावॉट आहे. वीज वितरणातून वर्षाला सरासरी ७५०० कोटी रुपयांचा महसूल कंपनीला मिळतो.

रिलायन्सने गुंतवलेल्या भागभांडवलपोटीचे ५५० कोटी रुपयेही अदानी समूह रिलायन्सला देईल. याशिवाय वीजदरवाढीसारख्या महसुली विषयावरील सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या अर्जाची सुनावणी विविध नियामक संस्थांकडे सुरू आहे. ते मंजूर झाल्यावर सर्व पाच हजार कोटी रुपये रिलायन्सकडे येतील. अशा रितीने या व्यवहारातून रिलायन्सला एकूण १८ हजार ८०० कोटी रुपये मिळणार आहेत, असे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिका-यांनी सांगितले.

सध्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे या व्यवहारानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कर्जमुक्त होईलच शिवाय तीन हजार कोटी रुपयांची गंगाजळी कंपनीच्या तिजोरीत येईल. कर्जमुक्तीसाठीचा कार्पोरेट क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे सांगण्यात आले. या व्यवहारानंतर कर्जमुक्त झालेली रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर संरक्षण उत्पादनांच्या उद्योगावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

आर्थिक चणचणीतूनच मेसर्स रिलायन्स एनर्जीने वीजग्राहकांकडून वसूल केलेली विद्युत शुल्क आणि वीजकराची तब्बल १४५२ कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारकडे जमा न करता थकवल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!